तळपायांची, हाताची सतत आग होणे कारणे व लक्षणे 

आरोग्य

कारणे

१) नर्व्हस सिस्टममध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड झाल्यास

२) मधुमेहाची शक्यता असल्यास. व्हिटँमीनबी १२ ची कमी.

3) उच्चरक्तदाबामुळे शरीरामध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होऊ शकत नाही. त्यामुळे त्वचेच्या रंगात फरक दिसू लागणे, हात पाय थंड पडणे, या बरोबरच तळपायांची आग होऊ शकते.

4) लिव्हरशी निगडीत समस्या असल्यास. थायरॉईड ग्रंथीचे कार्य सामान्य नसल्यास. रक्त वाहिन्यांमध्ये संक्रमण झाल्यास.

5) तसेच ज्या व्यक्ती एचआयव्ही किंवा कर्करोगासाठी औषधोपचार घेत असतील त्यांच्या बाबतीतही सातत्याने तळपायांची आग होण्याची समस्या आढळून येत असते.

6)फोलिक अ‍ॅसिड किंवा कॅल्शिअमची कमतरता असेल तर ही समस्या होऊ शकते.

7)बध्दकोष्ठाचा त्रास पोटसाफ नसेल तरीही. मद्यपानाचे व्यसन. किडनी संबंधित आजार. एखाद्या किटकाचा दंश.

उपाययोजना

1) गाईच्या दुधापासून बनविल्या गेलेल्या तुपाने तळपायांची मालिश केल्याने शरीरातील उष्णता कमी होऊन तळपायांची आग कमी होते.

2) एका मोठ्या टबमध्ये गरम पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा कप सैंधव घालावे. या पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनिटे पाय बुडवून ठेवल्याने तळपायांची आग कमी होते, तसेच पायांवर सूज असल्यास ती ही कमी होते.हा उपाय उच्चरक्तदाब, मधुमेह किंवा हृदयाशी निगडीत काही समस्या असणाऱ्या व्यक्तींनी करू नये.

3) दोन चमचे मोहरीचे तेल व दोन चमचे पाणी एकत्रित करून ते बर्फाच्या तुकड्याने पायाला लावणे.

4) दोन चमचे अँपलव्हेनिगर गरमपाण्यात घेतल्यास तात्काळ रिझल्ट येतो.

5) पायाला कोकम तेल लावायच! हे तेल कोकणात मिळेल, हे तेल मळकट पांढर्या रंगाच असुन , सर्व साधारण

खुप घट्ट असत हे तेल, ह्या तेल खडु पेक्षा जरा जाडसर आकारात उपलब्ध असत .

6) कोहळा, पाव किलो साल काढुन,पांढरा दुधी पाव किलो साल काढुन,आवळा गर पाव हि किलो आलं १२५ ग्रॅम साल काढुन एकत्रित करून ज्युस करून रोज घेत जा.

7) शतधौत घ्रुत पायाला लावत जा. धनेजीरे पाणी पीत जा. कैलास जीवन लावून माँलीश केल्यास.