१) खसखसचा काढा: सांधेदुखीवर हा काढा अत्यंत फायदेशीर ठरतो. यात १५ ग्रॅम म्हणजेच ३ चमचे खसखस ४ कप पाण्यात उकळायची. हे पाणी एक कप उरेल तेव्हा ते गाळून घ्यायचे. त्यात थोडी खडीसाखर घालायची आणि ती विरघळल्यावर हे पाणी प्यायचे. तुम्हाला मधुमेह असेल तर साखर न घालता हे पाणी प्यावे. हे पाणी घेतल्यावर १५-२० मिनिटे काहीही खाऊ पिऊ नये. हा उपाय सकाळी व संध्याकाळी ५,६ वाजता उपाशी पोटी करावा. या उपायाने शरीरात ताकद भरुन येण्यास मदत होते. ज्यांना अशक्तपणा जाणवतो त्यांनीदेखील हा उपाय अवश्य करावा.
२) खसखसचे दूध: ज्यांना निद्रनाशाची समस्या आहे, त्यांनी रात्री झोपण्याआधी एक कप दुधात अर्धा चमचा खसखस घालून दूध चांगले उकळावे. हे दूध गरम असतानाच प्यावे. मधुमेह नसेल तर त्यात आवडीनुसार खडीसाखर घालावी.
३) काढ्यामध्ये गूळ: ज्यांना थकवा अधिक जाणवतो त्यांनी वर सांगितलेल्या काढयात गूळ घालून प्यावे. त्यामुळे थकवा दूर होण्यास मदत होते. आपल्याला ज्या प्रकारची समस्या आहे त्याप्रमाणे यातील प्रयोग करावा नक्कीच फायदा होतो.
(सोशल मीडियावरून साभार)