दूध:- कारले किंवा त्याचा रस प्यायल्यानंतर दूध पिऊ नये. यामुळे शरीराची मोठी हानी होते. कारलं खाल्ल्यानंतर दूध प्यायल्याने छातीत जळजळ होऊ शकते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.
आंबा:- लोकांना आंबा खायला खूप आवडतो. कारल्याच्या भाजीबरोबर खात असाल तर थांबा. यामुळे ॲसिडिटी, छातीत जळजळ, मळमळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
मुळा:- मुळा आणि कारले एकत्र खाऊ नये. यामुळे पोटाचे विकार वाढू शकतात. शिवाय पचनक्रियाही बिघडू शकते.
दही:- कारलं आणि दही शक्यतो एकत्र खाणं टाळावं. हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने त्वचेची ऍलर्जी होऊ शकते. शरीरावर पुरळ तयार होऊ शकतात.
(सोशल मीडियावरून साभार)