रोहयोच्या कामांना गती द्या; पात्र नागरिकांना कामाची कमतरता भासू देऊ नका; भरत गोगावले

मुंबई: ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कामांची संख्या वाढवावी आणि मंजूर कामांच्या अंमलबजावणीला गती द्यावी, असे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या बैठकीत गोगावले यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमधील योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला. नंदुरबार जिल्ह्याच्या उल्लेखनीय कामगिरीचे त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच […]

अधिक वाचा..

उल्हासनगर-कल्याणमध्ये वारंवार वीज खंडित; नागरिक संतप्त

उल्हासनगर : उल्हासनगर आणि कल्याण शहरासह ग्रामीण परिसरात दिवसातून अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. वारंवार वीज जाण्यामुळे घरातील विद्युत उपकरणांचे नुकसान होत असून, नागरिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. वीज वितरण विभागाकडून सातत्याने देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी वीजपुरवठा बंद केला जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, वर्षभरात देखभालीच्या कामांवर […]

अधिक वाचा..

ठाणे अंतर्गत मेट्रोबाबतचे गैरसमज दूर करा; नागरिकांशी संवाद साधा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महारेलला जनजागृती, चर्चासत्रे आणि तीन आठवड्यांत पर्यायी मार्गाचा अभ्यास करण्याचे निर्देश ठाणे : ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महारेल प्राधिकरणाला दिले. प्रकल्पावरील आक्षेप समजून घेऊन ते तातडीने सोडवण्यासाठी विविध ठिकाणी चर्चासत्रे आयोजित करण्यासही त्यांनी सांगितले. १२,२०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पात २६ किलोमीटरचा […]

अधिक वाचा..

नागरिकांच्या सतर्कतेने आठवडे बाजारातील सलग सात चोरटे जेरबंद

मदत करणाऱ्या नागरिकांचा शिक्रापूर पोलिसांकडून सत्कार शिक्रापूर (): शिक्रापूर पोलीस ठाण्याने गेल्या दीड महिन्यापासून शिक्रापूर, कोरेगाव भीमा आणि तळेगाव ढमढेरे येथील आठवडे बाजारांमध्ये सुरू केलेल्या विशेष चोरीविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. पोलिसांच्या सातत्यपूर्ण गस्त, ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती आणि नागरिकांच्या सतर्क सहकार्यामुळे सलग सात चोरट्यांना रंगेहात पकडून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आठवडे बाजारातील वाढत्या […]

अधिक वाचा..

दुधातील भेसळ कशी ओळखाल? तुकाराम मुंढेंचा नागरिकांना महत्त्वाचा सल्ला

मुंबई: राज्यात दुधातील भेसळीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ग्राहकांनी दूध खरेदी करताना अधिक सतर्क राहावे, असे आवाहन केले आहे. भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी पाम ऑईल, स्किम मिल्क पावडर, विविध रसायने, साबण, शॅम्पू आणि डिटर्जंटचा वापर होत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. कृत्रिम गायीचे […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलिसांनी नागरिकांना दिले ‘सरप्राईज गिफ्ट’

३.७५ लाखांचे हरवलेले मोबाईल मूळ मालकांना केले परत रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कारेगाव, रांजणगाव परिसर तसेच आठवडे बाजार आणि प्रवासादरम्यान हरवलेल्या मोबाईल फोनबाबत अनेक तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या होत्या. हरवलेले मोबाईल शोधून ते मूळ मालकांना परत मिळवून देण्याबाबत नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी सूचना दिल्यानंतर तपास […]

अधिक वाचा..

हरित इंधन की महागडा प्रयोग? नागरिकांच्या खिशाची जबाबदारी कोणाची?

मुंबई: देशाला हरित ऊर्जा हवी, पर्यावरणाचे संरक्षण झाले पाहिजे आणि परदेशी तेलावरील अवलंबित्व कमी झाले पाहिजे, याबद्दल दुमत नाही. मात्र, खरा प्रश्न असा आहे की हा विकास जनतेच्या हिताचा आहे की जनतेच्या खिशावरचा? अनेक वाहनचालकांचा दावा आहे की इथेनॉल-मिश्रित पेट्रोल वापरल्यानंतर फ्यूल पंप, इंजेक्टर, रबर सील आणि इंधन यंत्रणेतील काही भाग अपेक्षेपेक्षा लवकर खराब होत […]

अधिक वाचा..

विठ्ठल मंदिरातील भाविकांच्या सुविधा आणि नागरिकांच्या हक्कांसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार; नीलम गोऱ्हे

पंढरपूर: शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रविवारी पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेत मंदिर परिसरातील विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी पावसाळ्यापूर्वी मंदिरातील अपुरी राहिलेली कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या. मंदिर परिसरात काही ठिकाणी अद्याप पाणी गळती होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत पुरातत्त्व विभागाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे […]

अधिक वाचा..

राज्यात जनगणना मोहिमेला सुरुवात; नागरिकांना ‘स्व-गणना’ची सुविधा

मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात घरगणना करण्यात येणार असून कुटुंबातील भौतिक सुविधांची माहिती ३३ प्रश्नांच्या माध्यमातून नोंदवली जाणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने स्वतःची माहिती भरण्याची ‘स्व-गणना’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. १ मे ते १५ मे […]

अधिक वाचा..

शेखचिल्लींच्या विकासात गुदमरतेय मुंबई; निसर्ग, नागरिक आणि नियोजनाचा प्रश्न

मुंबई: मुंबईच्या विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या अनियोजित बांधकामांमुळे शहराचा नैसर्गिक समतोल ढासळत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. खारफुटींचा नाश, मोकळ्या जागांचे कमी होत चाललेले प्रमाण आणि मोठ्या पायाभूत प्रकल्पांमुळे मुंबईकरांच्या सुरक्षेचा व भविष्यातील अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असल्याची भावना स्थानिक नागरिकांमध्ये वाढत आहे. मुंबई विकास आराखडा २०३४ अंतर्गत शहराचा सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधा सुधारणा […]

अधिक वाचा..