संभाजीनगर: महसूल विभागात मोठी भरती प्रक्रिया सुरु होणार असून राज्यात तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) पदासाठी 1700 नव्या जागा भरल्या जाणार आहेत. ही संधी सरकारी नोकरीसाठी वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.
महत्त्वाचे मुद्दे
पदाचं नाव: तलाठी (गट क)
एकूण पदसंख्या: 4644 (त्यापैकी 1700 नवीन पदे)
पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
संगणक ज्ञान आवश्यक
माध्यमिक परीक्षेत मराठी/हिंदी विषय आवश्यक
वयोमर्यादा:
खुला गट: 18 ते 38 वर्षे
राखीव गट: 43 वर्षे
परीक्षा पद्धत: ऑनलाईन CBT (200 गुणांची)
विषय: मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित
फी:
खुला वर्ग – ₹1000
राखीव वर्ग – ₹900
अर्ज पद्धत: ऑनलाईन
अर्जासाठी अधिकृत वेबसाइट:
https://mahabhumi.gov.in
रिक्त पदांची जिल्हानिहाय वाटणी (संकेतस्थळानुसार अंदाज):
सर्वसाधारण – 1676
महिला – 1473
माजी सैनिक – 705
खेळाडू – 216
प्रकल्पग्रस्त – 213
भूकंपग्रस्त – 63
अंशकालीन पविधार – 447
महत्त्वाच्या सूचना: एका उमेदवाराला फक्त एका जिल्ह्यासाठीच अर्ज करता येणार.
TCS कंपनीमार्फत परीक्षा घेतली जाणार.
अर्ज प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे, अंतिम तारीख व परीक्षा दिनांकासाठी अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवा!
भरती का आवश्यक आहे
सध्या एका तलाठ्याकडे 3-4 गावांचा कारभार असल्यामुळे सातबारा, नोंदी, पंचनामे, रेती चोरी, महसूल वसुली यासाठी तलाठ्यांची उपस्थिती अत्यावश्यक आहे.त्यामुळे ही भरती केवळ रोजगार नव्हे, तर ग्रामविकासासाठी महत्त्वाची पावले ठरणार आहे.