परिवहन विभागाच्या भ्रष्ट कारभारामुळे राज्यात रस्ते अपघात व त्यातील बळींची संख्या उच्चांकी पातळीवर

मुंबई: राज्यभरातील रस्त्यांवर सातत्याने होत असलेले अपघात आणि त्यात मृत्यूमुखी पडणा-या नागरिकांची संख्या पाहता रस्ता सुरक्षेच्या बाबतीत राज्य सरकार पूर्णतः अपयशी ठरल्याचे स्पष्ट दिसत आहे. परिवहन विभागाच्या भ्रष्ट कारभारामुळेच राज्यात अपघातांची व बळींची संख्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी […]

अधिक वाचा..

राजस्थानात आमदारसंख्या वाढणार? 2028 निवडणुकीपूर्वी 200 वरून 270 जागांची चर्चा जोरात

जयपूर: देशात सध्या विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची चर्चा सुरू असताना राजस्थानच्या राजकारणातही अचानक वेग आला आहे. राज्याची पुढील विधानसभा निवडणूक 2028 मध्ये होणार असली तरी विधानसभेतील आमदारसंख्या वाढवण्याच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष Vasudev Devnani यांच्या एका वक्तव्यानंतर ही चर्चा सुरू झाली. त्यांनी विधानसभेत 280 सदस्य बसू शकतील असा […]

अधिक वाचा..

राज्यातील शिक्षणाचा झाला खेळखंडोबा, जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची पद मोठ्या प्रमाणावर रिक्त 

राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पद लवकरात लवकर भराव्या, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांची विधानसभेत मागणी नागपूर: राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये तब्बल ३७ हजार शिक्षकांची पद रिक्त आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे, त्यामुळे सरकारने या रिक्त जागा लवकरात लवकर भराव्यात काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत मागणी केली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात राज्यातील […]

अधिक वाचा..

शालेय विद्यार्थी – विद्यार्थीनींसाठी एसटीची १८००२२१२५१ हि’ हेल्पलाईन सुरू

मुंबई: शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी – विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी येताना एसटी प्रवासात काही अडचण आल्यास अथवा एसटी बसेस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द करण्यात आल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावी यासाठी एसटी महामंडळाची १८००२२१२५१ या क्रमांकाची हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी […]

अधिक वाचा..

शिरूर नगरपरिषद प्रभागनिहाय आरक्षण जाहीर नगरसेवक संख्या २१ वरून २४ वर

शिरूर (अरुणकुमार मोटे): दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १.०० या वेळेत शिरूर नगरपरिषदेच्या रसिकलाल धारिवाल सभागृहात प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काढण्यात आली. या वेळी प्रांताधिकारी पुनम अहिरे, मुख्याधिकारी प्रीतम पाटील, कार्यालयीन अधीक्षक राहुल पिसाळ, तसेच पंकज काकड, चंद्रकांत पठारे, विनोद उबाळे आदी अधिकारी उपस्थित होते. शिरूर नगरपरिषदेतील नगरसेवकांची संख्या यावेळी २१ वरून […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात साप निघण्याचं प्रमाण वाढतं! खबरदारी म्हणून ५ गोष्टी करा, सापांपासून बचाव होईल

पावसाळ्याच्या दिवसांत साप निघण्याचं प्रमाण बरंच वाढत असतं. त्यामुळे सापांपासून बचाव हाेण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी. ज्या ठिकाणी साप निघण्याचा धोका असतो त्यांनी बूटं कधीही उघड्यावर ठेवू नयेत. बुटांमध्ये साप जाऊन बसण्याची शक्यता असते. पावसाळ्यात घराभोवती गवत खूप वाढतं. हे सगळं रानगवत काढून टाका आणि घराच्या आजुबाजुचा परिसर स्वच्छ करून घ्या. स्वच्छ, मोकळ्या परिसरात […]

अधिक वाचा..

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्ष एक नंबरवर आणायचा असेल तर स्री शक्तीशिवाय शक्य नाही

लाडकी बहीण योजना अजितदादांनी आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या मुंबई: लाडकी बहीण योजना फसवी आहे असा आरोप विरोधक करत आहेत. महिलांचा स्वाभिमान १५०० रुपयात विकत घेण्यात आला असा आरोप करण्यात आला पण जी व्यक्ती सोन्याचा चमचा घेऊन आली आहे तिला लाडकी बहीण योजना काय समजणार आहे असा टोला लगावतानाच अजितदादांनी ही योजना आणल्यानेच महायुतीला २३८ […]

अधिक वाचा..

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, राज्यात काँग्रेस एक नंबरचा पक्ष बनवा

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत का निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता? पुणे: भारतीय जनता पक्ष देशातील लोकशाही व संविधान संपवण्याचे काम करत आहे. निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी केली जात आहे. महाराष्ट्र, हरियाणा, कर्नाटकातील मतचोरी राहुल गांधी यांनी उघड केली आहे. लोकशाही व संविधान आज धोक्यात असून ते वाचवण्यासाठी राहुल गांधी संघर्ष […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात 1700 नव्या तलाठी पदांची भरती! पात्रता, परीक्षा पद्धत आणि जिल्हानिहाय पदसंख्या जाणून घ्या…

संभाजीनगर: महसूल विभागात मोठी भरती प्रक्रिया सुरु होणार असून राज्यात तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) पदासाठी 1700 नव्या जागा भरल्या जाणार आहेत. ही संधी सरकारी नोकरीसाठी वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. महत्त्वाचे मुद्दे पदाचं नाव: तलाठी (गट क) एकूण पदसंख्या: 4644 (त्यापैकी 1700 नवीन पदे) पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी संगणक ज्ञान आवश्यक माध्यमिक परीक्षेत मराठी/हिंदी […]

अधिक वाचा..

निवडणूक पारदर्शक होण्यासाठी मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडा

मतदार यादींची छाननी करुन बांग्लादेशी नागरिकांना वगळण्याची मागणी नवी दिल्ली: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडणे आणि मतदार यादीची छाननी करुन त्यातून बांग्लादेशी नागरिकांना वगळण्याची मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. राज्याचे उद्योग मंत्री व शिवसेना नेते उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई, खासदार मिलिंद देवरा, माजी खासदार राहुल शेवाळे […]

अधिक वाचा..