परमिट महाराष्ट्राचे, कमाई महाराष्ट्रातून; मग मराठीचा नियम का नको?

पुणे : महाराष्ट्रात राहून रिक्षा-टॅक्सी व्यवसाय करणाऱ्या चालकांना सार्वजनिक वाहतूक सेवेसाठी मराठीचे किमान कार्यज्ञान आवश्यक करण्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे. काही चालकांकडून ‘आम्ही मराठी बोलणार नाही’ अशी भूमिका घेतली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर आता या भूमिकेवरून कायदा आणि नागरिकांच्या जबाबदारीचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालवण्यासाठी परमिट, परवाना, बॅज, वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र यांसह […]

अधिक वाचा..

शालेय पोषण आहारही तुकाराम मुंढेंच्या रडारवर; महाराष्ट्रभर तपासणीचे आदेश

मुंबई : अन्नाच्या गुणवत्तेबाबत कठोर भूमिका घेणारे अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचा मोर्चा आता अंगणवाडी आणि शालेय पोषण आहाराकडे वळला आहे. राज्यातील अंगणवाडी, शाळांचा मिड-डे मील आणि सेंट्रल किचन्समधून पुरवण्यात येणाऱ्या अन्नाची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे अन्न दिल्याच्या घटना यापूर्वी समोर […]

अधिक वाचा..

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाच्या चर्चेला वेग; महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी नव्या टीमची घोषणा केल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चेला वेग आला आहे. पुढील काही महिन्यांत केंद्रातील मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता असून, तरुण आणि महिला नेत्यांना अधिक संधी देण्याबरोबरच काही राज्यांना अतिरिक्त प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या पंतप्रधान […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राला देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनविण्याचा संकल्प; विकासासोबत पर्यावरण आणि सर्वसामान्यांना प्राधान्य

मुंबई: जगभरात वेगाने विकास होत असताना महाराष्ट्रानेही देशाच्या गतिशील विकासाचे ‘चेंज मेकर्स’ बनावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुंबईपुरता विकास मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्राला देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनविण्यासाठी सरकार विविध पातळ्यांवर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘इकॉनॉमिक टाइम्स बिझनेस कॉनक्लेव्ह अँड अवॉर्ड्स २०२६’मध्ये बोलताना शिंदे यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप मांडला. राज्याची प्रगती […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात ‘महा सीएसआर प्राधिकरण’ स्थापन होणार; CSR निधीसाठी प्रकल्प बँक तयार करणार

मुंबई : महाराष्ट्रातील कॉर्पोरेट सामाजिक दायित्व अर्थात CSR निधीचा अधिक प्रभावी, पारदर्शक आणि नियोजनबद्ध वापर करण्यासाठी राज्यात ‘महा सीएसआर प्राधिकरण’ स्थापन करण्याच्या दिशेने राज्य सरकारने पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत या प्राधिकरणाच्या स्थापनेसंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. राज्यात CSR अंतर्गत विविध उपक्रम वेगवेगळ्या पातळ्यांवर राबविले […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा 28 ऑगस्टपासून लागू; धर्मांतरासाठी 60 दिवस आधी सूचना बंधनकारक

मुंबई : महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच 28 ऑगस्ट 2026 पासून या कायद्याची अंमलबजावणी होणार आहे. यासंदर्भातील राजपत्र अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्य विधिमंडळाच्या मार्च 2026 मधील अर्थसंकल्पीय अधिवेशनात धर्मस्वातंत्र्य विधेयक विधानसभेसह विधान परिषदेत मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर हे विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आले होते. जबरदस्ती, […]

अधिक वाचा..

गावाजवळ उद्योग, युवकांच्या हाताला काम; ग्रामीण महाराष्ट्रासाठी ‘वन तालुका–वन इंडस्ट्रियल क्लस्टर’ची गरज

मुंबई : महाराष्ट्राची औद्योगिक वाटचाल देशात आघाडीवर असली, तरी या प्रगतीचा समान लाभ ग्रामीण महाराष्ट्राला मिळालेला नाही. मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिक या औद्योगिक पट्ट्यांमध्ये गुंतवणूक व रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध असताना मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि राज्यातील अनेक ग्रामीण तालुक्यांमध्ये स्थानिक रोजगाराच्या संधींची कमतरता कायम आहे. परिणामी शिक्षण पूर्ण केल्यानंतर युवकांचे शहरांकडे स्थलांतर वाढत आहे. […]

अधिक वाचा..

आरोग्यसेवा हीच ईश्वरसेवा; महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार उपचार पोहोचवणार; एकनाथ शिंदे

मुंबई: “हे सरकार केवळ आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात जाऊन प्रश्न सोडवणारे सरकार आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती आणि आरोग्यसेवा हीच ईश्वरसेवा मानून महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार उपचार पोहोचवत आहोत,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आरोग्य विभागाच्या वतीने राज्यभरातील १२४ नवीन आरोग्य संस्था, रुग्णालये आणि उन्नतीकरण झालेल्या आरोग्य सुविधांचे ऑनलाईन […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील 10 प्रमुख MIDC; पुणे ठरतेय औद्योगिक केंद्र, उद्योजकांच्या स्थलांतराने राजकारण तापले

मुंबई : महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाचा विचार केला तर पुणे जिल्ह्याचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. पुण्याला राज्याचे ‘ऑटो हब’ म्हणूनही ओळखले जाते. मात्र, औद्योगिक क्षेत्रातील विविध अडचणी आणि समस्यांमुळे काही उद्योजक पुण्यातून इतर ठिकाणी स्थलांतर करत असल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील औद्योगिक विकास आणि MIDC क्षेत्रांबाबत राजकीय वातावरणही तापले आहे. महाराष्ट्रात केवळ […]

अधिक वाचा..

एका वर्षात हजारो सरकारी शाळा घटल्या; महाराष्ट्रातही ३५७ शाळांना फटका

नवी दिल्ली : देशातील सरकारी प्राथमिक शाळांच्या संख्येत एका वर्षात तब्बल ९,८६६ ने घट झाल्याची धक्कादायक आकडेवारी लोकसभेत सादर करण्यात आली आहे. ‘युडायस प्लस’ (UDISE+) च्या आकडेवारीनुसार, २०२४-२५ मध्ये देशात सरकारी प्राथमिक स्तरावरील ८,८९,८०६ शाळा होत्या. २०२५-२६ मध्ये ही संख्या घटून ८,७९,९४० वर आली आहे. म्हणजेच एका वर्षात सुमारे १.१ टक्क्यांनी सरकारी प्राथमिक शाळांची संख्या […]

अधिक वाचा..