Portrait of a leopard (Panthera pardus), Sabie-Sand nature reserve, South Africa?
शिंदोडी (तेजस फडके) : शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात बिबट्याची दहशत समोर आली आहे. येथील एमआयडीसी रोड लगत राहणाऱ्या बालाजी गायकवाड यांच्या घराबाहेर बांधलेल्या दोन जर्सी कालवडींवर बिबट्याने आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास हल्ला केला. या हल्ल्यात एक कालवड जागीच ठार झाली तर दुसरी गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.
स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी रोड लगत भाऊसाहेब वाळुंज, संपतराव वाळुंज तसेच मोहन वाळुंज यांच्या शेताच्या तसेच घराच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला होता. येथील शेतकरी निवास वाळुंज हे द्राक्षाच्या बागात ट्रॅक्टरच्या साह्याने फवारणी करत असताना अचानक त्यांना समोर बिबटया दिसला. त्यांनी प्रसंगावधान राखत ट्रॅक्टरची रेस वाढविली. त्या आवाजाने बिबटया घाबरुन पळाला.
शेतकरी मोहन वाळुंज आठ दिवसांपुर्वी रात्री ८ च्या सुमारास गावात चालले असता. बिबट्याने त्यांच्या दुचाकी गाडीचा पाठलाग केला. त्यावेळी मोहन वाळुंज यांनीही गाडी वेगात पळविल्याने पुढील अनर्थ टळला. आज (ता. २५) रोजी पहाटे दोन जर्सी कालवडीवर झालेल्या हल्ल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने येथे तत्काळ सापळे लावण्याची तसेच गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.
शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; डरकाळ्यांनी धास्तावलेले ग्रामस्थ…
Video; शिरुर; वनमंत्री तालुक्यात असतानाच बिबट्याचा दिवसाढवळ्या १० शेळ्यांवर हल्ला
चिंताजनक! बिबट्याने आईच्या डोळ्यादेखत चिमुकलीला नेलं उचलून…
शिरूर! निमगाव म्हाळुंगी ग्रामस्थांचा संयम लागला सुटू; बिबट्यांचा कळपच दिसला…
शिरूर! पिंपरखेड परिसरातील बिबट्याचा अखेर खात्मा…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…
दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…
ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…
मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…
मुंबई : राज्यातील जमिनीच्या आणि मालमत्तेच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता, सुरक्षितता आणि मालकी हक्क अधिक बळकट करण्यासाठी…
रात्रीचं जागरण, अवेळी झोपणं, उठणं, यामुळे पित्त होणं, पोट साफ न होणं, अपचन, बद्धकोष्ठता, उष्णता…