जागतिक नेत्रदान दिनानिमित्त राज्यभर जनजागृती व नेत्र चिकित्सा शिबिरे; चंद्रकांत पाटील

मुंबई: “नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ शकते. समाजामध्ये नेत्रदानाबाबत व्यापक जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे,” असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.जागतिक नेत्रदान दिनानिमित्त १० जून रोजी राज्यभर नेत्रदान जनजागृती उपक्रम आणि नेत्र चिकित्सा शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. […]

अधिक वाचा..

राज्यात ३६ जिल्ह्यांत सुरू होणार सीईटी विद्यार्थी सहाय्यता केंद्रे; प्रवेश प्रक्रियेसाठी मिळणार जिल्ह्यातच मार्गदर्शन

मुंबई: राज्यातील विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (CAP), शिष्यवृत्ती योजना आणि विविध प्रवेश प्रक्रियांबाबत अचूक माहिती व योग्य मार्गदर्शन त्यांच्या जिल्ह्यातच उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘सीईटी विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी दिली. मंत्रालयात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत […]

अधिक वाचा..

बकरी ईदपूर्वी राज्यभर गोवंश वाहतुकीवर विशेष मोहीम; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई

मुंबई: बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गोवंशाच्या अवैध वाहतुकीविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गोमातेची तस्करी, बेकायदेशीर कत्तलखाने आणि जनावरांवरील अत्याचार कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नसल्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार २५ मे ते २८ मे २०२६ या कालावधीत राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. […]

अधिक वाचा..

भाजप देशभर दंगली घडवण्याचा कट रचत आहे; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशभरात धार्मिक तेढ निर्माण करून २०२९ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दंगली घडवण्याचे षडयंत्र भाजपाकडून सुरू असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी केला. २००२ च्या गुजरात दंगलीप्रमाणेच वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून पश्चिम बंगालमधील दंगली ही त्याची सुरुवात असल्याचा दावा त्यांनी केला. मुंबईतील Tilak Bhavan येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले की, पाच […]

अधिक वाचा..

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय पक्षांच्या भूमिकांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एकीकडे संसदेत महिला आरक्षणाबाबत जोरदार चर्चा आणि घोषणाबाजी होत असताना, दुसरीकडे प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत महिलांचे प्रतिनिधित्व अपेक्षेइतके दिसत नसल्याचे निरीक्षण समोर येत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, भारतीय जनता पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस […]

अधिक वाचा..

फुले द्विशताब्दी वर्षासाठी राज्यभर वर्षभर उपक्रम; शालेय शिक्षण विभागाचा व्यापक आराखडा जाहीर

मुंबई: महात्मा जोतीराव फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त सन 2027 हे द्विशताब्दी वर्ष राज्यभर विविध उपक्रमांनी साजरे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने 11 एप्रिल 2026 ते 10 एप्रिल 2027 या कालावधीत सर्व शाळांमध्ये शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यासाठी व्यापक कृती आराखडा जाहीर केला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे […]

अधिक वाचा..

मिलेटचे महत्व लक्षात घेऊन महोत्सवाची व्याप्ती राज्यभर वाढविणार; पणन मंत्री जयकुमार रावल

बोरीवली येथे तीन दिवसीय मिलेट महोत्सवाचे उद्घाटन मुंबई: राज्यात ज्वारी, बाजरी, नाचणी ही प्रमुख तृणधान्ये (मिलेट्स) आहेत. कमी पाण्यावर येणारी तसेच पर्यावरणपूरक असण्याबरोबरच आरोग्यासाठी लाभदायी असणाऱ्या मिलेट्सना शेतातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने मिलेट्स महोत्सवाचे आयोजन मुंबईत करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने मिलेट्स महोत्सव राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगत […]

अधिक वाचा..

महिंद्रा ग्रुपची विदर्भात १५०० एकरावर भव्य गुंतवणूक; हजारो रोजगाराच्या संधी निर्माण

मुंबई: महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने आणखी एक ऐतिहासिक प्रकल्पाची भर टाकली आहे. कंपनीने विदर्भ आणि मराठवाडा प्रांतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीची घोषणा केली असून, या प्रकल्पातून राज्यात हजारो थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. विदर्भातील नागपूर जिल्ह्यात तब्बल १५०० एकर जमिनीवर उभारला जाणारा हा देशातील सर्वात मोठा वाहन व ट्रॅक्टर उत्पादन प्रकल्प असेल. […]

अधिक वाचा..

मुंबईसह महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका:! भाजपाचे यश खरंच किती प्रामाणिक?

मुंबई: मुंबईसह महाराष्ट्रातील विविध महानगरपालिकांमध्ये अलीकडेच झालेल्या निवडणुकांनंतर, जवळपास सर्वच न्यूज चॅनेल्स व वर्तमानपत्रांतून “भाजपाची मुसंडी”, “दणदणीत यश”, “२६ महापौर भाजप-युतीचे” अशा मथळ्यांनी वार्तांकन करण्यात आले. मात्र, या वार्तांकनामध्ये खरी परिस्थिती आणि मूलभूत प्रश्नांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भाजपाचे यश: विकासाचे की पक्षांतराचे भाजपाच्या या यशामागील कारणे काय आहेत, हा गंभीर प्रश्न आहे. हे यश […]

अधिक वाचा..

देशभरात वाढला ‘सायलेंट किलर’चा धोका, मुलांमध्ये बीपीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ

पूर्वी केवळ प्रौढांमध्ये आढळणारा उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर) आता मुलांनाही ग्रासू लागला आहे. अलीकडील संशोधनांनुसार देशातील ६ ते १८ वयोगटातील शालेय मुलांमध्ये हायपरटेन्शनचे आणि हाय ब्लड प्रेशरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मध्य भारतातील एका अभ्यासात सुमारे १.४ टक्के किशोरांमध्ये उच्च रक्तदाब आढळला आहे. तर महाराष्ट्रातील १० शाळांमधील २६०० हून अधिक विद्यार्थ्यांवर झालेल्या सर्वेक्षणात हे […]

अधिक वाचा..