सोनेसांगवी सभामंडप प्रकरणी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे चौकशीचे आदेश; ग्रामपंचायत कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील सोनेसांगवी येथील अनुसूचित जाती-जमाती समाजासाठी मंजूर करण्यात आलेल्या सभामंडपाच्या कामातील कथित अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारीची राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी गंभीर दखल घेतली आहे. समाजकल्याण आयुक्त आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती तक्रारदार अमोल बोऱ्हाडे यांनी […]

अधिक वाचा..

हत्ती–मानव संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना करा; विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये वाढत चाललेल्या हत्ती–मानव संघर्षाचा गंभीर प्रश्न काँग्रेस विधानमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत उपस्थित करत सरकारने तातडीने ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. वडेट्टीवार यांनी सांगितले की, चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात व्याहाड–सोनापूर मार्गावर २ जुलै रोजी रानटी हत्तीच्या हल्ल्यात अतुल गोहने (वय ३०) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू […]

अधिक वाचा..

शेतकरी आत्महत्यांवरील चर्चा नाकारल्याने विरोधकांचा विधानसभेत सभात्याग.

मुंबई: राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांचा अत्यंत गंभीर मुद्दा आज विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे उपस्थित केला. मात्र, या विषयावर चर्चा घेण्यास परवानगी नाकारण्यात आल्याने काँग्रेससह विरोधी पक्षांच्या आमदारांनी सभागृहातून सभात्याग केला. विजय वडेट्टीवार यांनी पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच लातूरमध्ये दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा उल्लेख करत, राज्यातील शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती, वाढते आर्थिक […]

अधिक वाचा..

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर ममता बॅनर्जींना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका

मुंबई: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदारयादींची पुनर्पडताळणी सुरू असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः सुप्रीम कोर्टात युक्तिवाद केल्याने हा प्रकार चर्चेत आला होता. मात्र, निवडणूक आयोगावर टीका करणाऱ्या ममतांना आज सुप्रीम कोर्टानेच जोरदार झटका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने पश्चिम बंगाल सरकारला […]

अधिक वाचा..

राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या ५१ व्या अभ्यासवर्गात डॉ. नीलम गोऱ्हे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

संसदीय आयुधे म्हणजे जनतेशी थेट दुवा साधण्याची साधने; डॉ. नीलम गोऱ्हे नागपूर: राष्ट्रकुल संसदीय मंडळ (CPA) आयोजित ५१व्या संसदीय अभ्यासवर्गात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विद्यार्थ्यांना “संसदीय आयुधे आणि लोकशाही प्रणालीमध्ये त्यांचे महत्व” या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, संसदीय आयुधे ही केवळ विचार मांडण्याची साधने नसून लोकशाही […]

अधिक वाचा..

राष्ट्रकुल संसदीय मंडळातर्फे (CPA) ५१ व्या संसदीय अभ्यासवर्गाचा भव्य शुभारंभ

मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते उद्घाटन; विद्यार्थ्यांना राष्ट्रीय लोकशाही प्रक्रियेचे मार्गदर्शन नागपूर: राष्ट्रकुल संसदीय मंडळ (CPA) तर्फे राज्यातील विविध विद्यापीठांतील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयाच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित ५१ व्या संसदीय अभ्यासवर्गाचे उद्घाटन आज महाराष्ट्र विधानपरिषद सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या अडचणी सोडून मंत्री विधानसभेत पत्ते खेळतो…

जालना: स्वातंत्र्य दिनी जालना जिल्ह्यातील रेवल गावातील जिल्हा परिषद शाळेत चौथी वर्गात शिकणाऱ्या कार्तिक वजीर उर्फ भोऱ्या या विद्यार्थ्याने आपल्या भाषणाने उपस्थित प्रेक्षकांची मनं जिंकलीच, पण त्याहीपेक्षा त्याने समाजातील विषमतेवर, राजकारणातील दुटप्पीपणावर आणि शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांवर थेट भाष्य करून अनेकांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडलं. देशाच्या प्रगतीचा आढावा घेत जबाबदाऱ्यांची जाणीव कार्तिकने भाषणाची सुरुवात देशाच्या शैक्षणिक, वैज्ञानिक, […]

अधिक वाचा..

भाजपा युती सरकारने महाराष्ट्राचा तमाशा बनवला, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला, गृहराज्य मंत्र्यांच्या आईच्या नावानेच डान्सबार सुरु मुंबई: महाराष्ट्राला मोठी राजकीय संस्कृती लाभलेली आहे. यशवंतराव चव्हाण ते विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात महाराष्ट्राचे नाव देशात अभिमानाने घेतले जात होते. पण भाजप सरकारने मागील १० वर्षापासून महाराष्ट्राचा तमाशा करून ठेवला आहे. विधानसभेत पत्याचा क्लब सुरु आहे तर बाहेर WWF चा आखाडा […]

अधिक वाचा..

मी कोणाचा विनयभंग केला की चोऱ्यामाऱ्या? राजीनामा देण्यासारखं घडलं काय

मुंबई: सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ असो किंवा शेतकऱ्यांबद्दलची आक्षेपार्ह विधाने.. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना चर्चेत कसं रहायचं ते नीट समजतं. काही दिवसांपूर्वीच कोकाटे यांचा सभागृहात रमी ( पत्ते) खेळतानाचा एक व्हिडीओ समोर आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी तो व्हिडीओ ट्विट केल्यावर प्रचंड खळबळ माजली, विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला, राज्यातील […]

अधिक वाचा..

मोठी बातमी! पुण्यातील या विधानसभा मतदारसंघात होणार फेरमतमोजणी

पुणे: लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं होतं. मात्र, या निवडणुकीत इव्हीएम मशीनवर अनेक प्रश्न उपस्थित करत मतांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांनी केला होता. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणच्या मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवारांनी फेरमतदानाची मागणी केली होती.आता या विषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या 105 उमेदवारांनी फेर मतमोजणीची […]

अधिक वाचा..