फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; म्हणाले…

मुंबई: उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांना मत द्यावे, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोनवरून केली. भाजपच्या सूत्रांनी व उद्धवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल असून इथले मतदार आहेत. आपले राज्यपाल उपराष्ट्रपती होत असताना आपल्या […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांनी मुंबई मनपासाठी कंबर कसली; पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी बैठकांचा धडाका सुरू…

मुंबई: मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनपा निवडणूक व्यवस्थापन समितीची दुसरी बैठक आज समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई प्रदेश कार्यालयात पार पडली. मुंबई महानगरपालिका निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्यानंतर नवाब मलिक यांनी पक्षासाठी कंबर कसली आहे. पहिली बैठक व्यवस्थापन समितीची घेतल्यानंतर आज विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे सेवादल, महिला, […]

अधिक वाचा..

हर्सूलमध्ये पुन्हा पाडापाडी! सोमवारपासून तिसऱ्या टप्प्याला सुरुवात

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातील रस्ता रुंदीकरण मोहिमेला आता अधिक गती मिळणार आहे. सोमवार, २८ जुलैपासून तिसऱ्या टप्प्याची मोहीम हर्सूलपासून सुरू होणार आहे. मागील काही दिवसांत मनपाच्या नगर रचना विभागाने शहरातील मुख्य रस्त्यांवर मार्किंग केली होती. काही जागाधारकांनी स्वखुशीने अतिक्रमण काढले असले तरी आता उर्वरित अतिक्रमणे हटवण्यासाठी महापालिका थेट कारवाई करणार आहे. सोमवारपासून हर्सूल टी पॉइंट […]

अधिक वाचा..

रेल्वे दुहेरीकरणासाठी भूसंपादनाला सुरुवात, संभाजीनगर जिल्ह्यातील ‘या’ गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर-अंकाई या ९२ किमी लांबीच्या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण वेगाने सुरू असून, त्यासाठी गंगापूर, वैजापूर व संभाजीनगर तालुक्यातील शेतजमिनींचे अधिग्रहण सुरू झाले त्यात सुमारे ३५० शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होणार आहेत. हरकती मागविण्याची प्रक्रिया सुरू जिल्हा भूसंपादन अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांकडून हरकती मागवण्यात येत असून, मिटमिटा, माळीवाडा, बनेवाडी, वंजारवाडी, वाघलगाव, परसोडा, चांडगाव, पानवी खंडाळा, बेंदवाडी, वाघलगाव, खडक नारळा, […]

अधिक वाचा..

भारतीय नौदल अग्निवीर भरती सुरू, ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक ऍक्टिव

मुंबई: भारतीय नौदलाने अग्निवीर योजना 2025-26 अंतर्गत अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर जाऊन अर्ज करावा. भरतीसंबंधी संपूर्ण माहिती पदाचे नाव: अग्निवीर (MR) भरती बॅच: MR 02/2025, 01/2026 & 02/2026 नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत (भारतीय नौदल) निवड प्रक्रिया लेखी परीक्षा (CBT) शारीरिक चाचणी (PFT) वैद्यकीय तपासणी शैक्षणिक पात्रता: […]

अधिक वाचा..

विश्व मराठी संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची लोककलेने रंगतदार सुरुवात

मुंबई: विश्व मराठी संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेने झाली. यावेळी श्री. गणेश चंदनशिवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पारंपरिक वाद्यांच्या साथीने गोंधळ, पिंगळा आणि पोवाडा सादर करून रसिकांची मने जिंकली. कोकणातील प्रसिद्ध लोककलांचेही प्रभावी सादरीकरण करण्यात आले. बालमित्र नाट्य नमन मंडळ, संगमेश्वर यांनी गण, गवळण, तसेच पेंद्या-सुदाम जोडीचे सादरीकरण केले. नवलादेवी नाट्य मंडळ, उपळे, विरगांव […]

अधिक वाचा..

शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; जाणून घ्या नोंदणी करण्याची प्रक्रिया

20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू मुंबई: बेरोजगार तरुणांसाठी महत्वाची बातमी बीएड धारक आणि शिक्षक होण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची आणखी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. उद्या म्हणजेच 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल पुन्हा सुरू होत असून, पहिल्या टप्प्यात भरती होऊ न शकलेल्या उमेदवारांसाठी आता शिक्षक होण्याची […]

अधिक वाचा..

थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची १० जानेवारी पासून सुरुवात

मुंबई: महाराष्ट्रातील चित्रपट संस्कृतीचा मानदंड असणारा ‘२१ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव’ १० जानेवारी ते १६ जानेवारी २०२५ या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे आयोजित केला जाणार आहे. महोत्सवात निवडलेले ६१ चित्रपट मुव्हीमॅक्स अंधेरी, सायन आणि ठाणे येथे दाखवले जातील. कान महोत्सवात अ-सर्टन रिगार्ड विभागात सर्वोत्तम ठरलेल्या ‘द ब्लॅक डॉग’ या चायनीज चित्रपटाच्या प्रदर्शनाने […]

अधिक वाचा..

छ. संभाजीनगरात पुन्हा कोरोना; तीन दिवसात आढळले 15 रुग्ण! संशयितांच्या चाचण्या सुरु…

औरंगाबाद: सध्या शहरात कोरोनासारखीच लक्षणे असलेल्या एच-३ एन-२ संसर्गाचेही रुग्ण शहरात आढळून येत आहेत. महापालिकेने प्रत्येक आरोग्य केंद्रावर आरटीपीसीआर व अँटिजन टेस्टची सुविधा उपलब्ध करून दिली. दररोज संशयित रुग्णांची टेस्ट करण्यात येत असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले. मागील दोन-तीन दिवसांत केलेल्या अँटिजन आणि आरटीपीसीआर टेस्टमधून १५ जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. यातील […]

अधिक वाचा..