मुंबईसह महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका:! भाजपाचे यश खरंच किती प्रामाणिक?

मुंबई: मुंबईसह महाराष्ट्रातील विविध महानगरपालिकांमध्ये अलीकडेच झालेल्या निवडणुकांनंतर, जवळपास सर्वच न्यूज चॅनेल्स व वर्तमानपत्रांतून “भाजपाची मुसंडी”, “दणदणीत यश”, “२६ महापौर भाजप-युतीचे” अशा मथळ्यांनी वार्तांकन करण्यात आले. मात्र, या वार्तांकनामध्ये खरी परिस्थिती आणि मूलभूत प्रश्नांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भाजपाचे यश: विकासाचे की पक्षांतराचे भाजपाच्या या यशामागील कारणे काय आहेत, हा गंभीर प्रश्न आहे. हे यश […]

अधिक वाचा..

पुण्यात अजित पवारांना जोरदार धक्का; झेडपी निवडणुकीच्या तोंडावर दिग्गज नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला पुण्यात मोठा राजकीय धक्का बसला आहे. पिंपरी-चिंचवड आणि मावळ तालुक्यात प्रभाव असलेले इंदुरी–वराळे गटातील दिग्गज नेते प्रशांत भागवत आणि त्यांच्या पत्नी सौ. मेघा प्रशांत भागवत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत […]

अधिक वाचा..

पुणे महापालिकेत भाजपचे वर्चस्व कायम! वसंत मोरे यांच्या पराभवानंतरच्या पोस्टमुळे चर्चेला उधाण

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. १६५ प्रभाग रचना असलेल्या पुणे महापालिकेत भाजपने तब्बल ११९ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. या दणदणीत विजयात केंद्रीय मंत्री, भाजप नेते आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.या निवडणुकीत इतर पक्षांची अवस्था […]

अधिक वाचा..

ZP निवडणुक; कारेगावच्या ग्रामपंचायत सदस्यासह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश

रांजणगाव गणपती (तेजस फडके): पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील राजकारणात मोठी उलथापालथ घडली असून रांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद गटातील अत्यंत महत्त्वाचे आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या कारेगावच्या ग्रामपंचायत सदस्या जयश्री कोहकडे यांच्यासह अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल (दि १७) रोजी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. कारेगाव ग्रामपंचायतीचे माजी प्रभारी सरपंच व उपसरपंच, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार […]

अधिक वाचा..

मुंबई महापालिकेत महायुतीचा विजय; उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया भाजप कागदावर, शिवसेना जमिनीवर

मुंबई: राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीने निर्णायक विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ८९ तर शिवसेनेला २९ जागा मिळाल्या असून महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीला एकूण ७१ जागांवर समाधान मानावे लागले, तर काँग्रेसला २४ जागा मिळाल्या आहेत. इतर व अपक्षांचे मिळून १२ नगरसेवक निवडून आले […]

अधिक वाचा..

निकालानंतर शहरात तणाव! भाजपच्या विजयी उमेदवारावर हल्ल्याचा आरोप

नाशिक: नाशिक महापालिका निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर शहरातील वातावरण तापल्याचे चित्र आहे. नाशिकरोड परिसरातील प्रभाग क्रमांक 18 मधून भाजपचे विजयी उमेदवार शरद मोरे यांच्यावर शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शरद मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पराभूत उमेदवाराच्या समर्थकांनी त्यांना कानशिलात लगावत मारहाण केली. या घटनेदरम्यान मारहाण करण्यासाठी आलेल्या एका […]

अधिक वाचा..

पुणे महापालिकेत भाजपचा एकतर्फी झंझावात; ११० जागांवर आघाडी

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवत शहराच्या राजकारणात वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. भाजप ११० जागांवर आघाडीवर असून, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना मिळून केवळ १७ जागांपर्यंत मजल मारता आली आहे. काँग्रेसने १२ जागांवर आघाडी घेतली असली तरी ठाकरे गटाची शिवसेना आणि शिंदे गटाची शिवसेना या दोन्ही पक्षांना खातेही उघडता आलेले नाही. मनसेलाही एकही जागा […]

अधिक वाचा..

राज्यातील महापालिका निकालात भाजपची मोठी मुसंडी; मुंबईत २५ वर्षांची ठाकरे सत्ता संपुष्टात

मुंबई: राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निकालात भाजपने जोरदार कामगिरी करत बहुतेक महापालिकांवर वर्चस्व मिळवले आहे. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडसह अनेक महत्त्वाच्या शहरांत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने सत्ता मिळवली असून, मुंबई महापालिकेत तब्बल २५ वर्षांची ठाकरे गटाची सत्ता संपुष्टात आली आहे. मुंबईत भाजप-महायुतीला बहुमत, ठाकरे युगाचा अंत मुंबई महापालिकेत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने बहुमत मिळवले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार […]

अधिक वाचा..

भाजपाने राज्यात विषवल्ली जन्माला घातली, महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाची विषवल्ली कापा

महाराष्ट्राचा बिहार करू इच्छिणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या कूनितीची फळं महाराष्ट्र भोगतोय… मुंबई: भारतीय जनता पक्ष व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील वातावरण अत्यंत गढूळ करून ठेवले आहे. महाराष्ट्राचा बिहार करू इच्छिणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तयार केलेल्या निवडणूक कूनितीची फळं आज महाराष्ट्र भोगतोय, हे राज्यातील जनतेने लक्षात घ्यावे. देवेंद्र फडणवीस या व्यक्तीने व त्यांच्या भारतीय जनता […]

अधिक वाचा..

भाजपच्या भ्रष्ट, अपयशी कारभाराला जनता कंटाळली, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

चंद्रपूर मनपा निवडणुकीच्या सांगता सभेतून भाजपवर काँग्रेसचे टीकास्त्र चंद्रपूर: चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसने आज शहरातील विविध प्रभागातून रोड शो करीत जोरदार शक्तिप्रदर्शन करून भाजपविरोधात रणशिंग फुंकले. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर सडकून टीका करत म्हटले की, देशासह संपूर्ण राज्यात व महानगरपालिकेत भाजपने विकासाच्या नावाखाली फक्त लुटीचे राजकारण केले. रस्ते नाहीत, पाणी नाही, स्वच्छता नाही […]

अधिक वाचा..