भाजपशिवाय राष्ट्रवादीचे विलीनीकरण अशक्य; अजितदादांनंतर नेतृत्वावरही भुजबळांचे मोठे संकेत

नाशिक: राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या अस्थी कलशाच्या दर्शनासाठी जनसागर उसळला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) भवितव्याबाबत आणि दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत चर्चांना उधाण आले आहे.या चर्चांवर ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना अत्यंत स्पष्ट आणि […]

अधिक वाचा..

पार्थ पवारांच्या राज्यसभेवरून भाजप-राष्ट्रवादीत वाद! देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट भाष्य

मुंबई: सुनेत्रा पवार यांच्या जागी पार्थ पवार यांना राज्यसभेत पाठवण्याच्या चर्चांना वेग आलेला असतानाच, भाजपाने पार्थ पवारांना विरोध केल्याचा दावा राजकीय वर्तुळात केला जात होता. मात्र, या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडत भाजपाने कोणालाही विरोध केलेला नसल्याचं ठामपणे सांगितलं आहे. पार्थ पवारांच्या राज्यसभा उमेदवारीला भाजपाचा विरोध असल्याच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, “भाजपाने […]

अधिक वाचा..

अजित पवारांच्या मृत्यूला धक्कादायक वळण! ज्या कंपनीच्या विमानाने प्रवास केला, तिलाच युरोपमध्ये बंदी

मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर या प्रकरणाला धक्कादायक आणि गंभीर वळण मिळाले आहे. ज्या ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ कंपनीच्या विमानाने अजित पवारांनी प्रवास केला होता, त्या कंपनीची आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानके अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. युरोपियन हवाई नियामक संस्था EASA (European Union Aviation Safety Agency) ने या कंपनीवर तब्बल एक […]

अधिक वाचा..

सुनेत्रा पवारांचा शपथविधी म्हणजे भाजपचा मोठा डाव! बच्चू कडूंचा खळबळजनक आरोप

लातूर: प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. लातूर येथे प्रहारच्या जिल्हा परिषद उमेदवाराच्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी राष्ट्रवादीतील तीन बड्या नेत्यांवर थेट हल्लाबोल केला. बच्चू कडू म्हणाले, “राष्ट्रवादीचे तीन बडे नेते जरी पक्षात असले, तरी ते […]

अधिक वाचा..

भाजपाला सत्तेचा अहंकार, राजकीय स्वार्थासाठी जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रचार सभांचा धडाका मुंबई: भारतीय जनता पक्ष हा सत्तेसाठी जाती धर्मात भांडणे लावून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधत आहे. केवळ हिंदू मुस्लीम असा धार्मिक वाद निर्माण करण्यापर्यंतच ते थांबले नाहीत तर मराठा-ओबीसी, आदिवासी, दलित समाजातही भांडणे लावून महाराष्ट्रातील सामाजिक सलोख्याचे वातावरण बिघडवण्याचे पाप भाजपाने केले […]

अधिक वाचा..

अजित पवारांनंतर सत्ता-संघर्ष टोकाला! सुनेत्रा पवारांची एंट्री पण अर्थखात्याला भाजपचा ‘नकार’

अजित पवारांनंतर उपमुख्यमंत्रिपद कुणाकडे? सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तबाची शक्यता, अर्थखात्यावर भाजपचा दावा मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदाची जागा कोण घेणार आणि महत्त्वाचे अर्थखाते कुणाकडे जाणार, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची उद्या (शुक्रवारी) […]

अधिक वाचा..

उमेदरीवरून राजकीय उलथापालथ! काळे गटाचा भाजमध्ये प्रवेश; भाजप–राष्ट्रवादी थेट आमनेसामने

पंढरपूर: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यात बुधवारी मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला. राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे, समाधान काळे व गणेश पाटील यांनी समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. उमेदवारीवरून राष्ट्रवादीत झालेल्या कोंडीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. भाजपकडून समाधान काळे यांच्या पत्नी मोनिका काळे यांना वाखरी तर गणेश पाटील […]

अधिक वाचा..

रांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद गटात भाजपचे शक्तीप्रदर्शन; हजारोंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील रांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाने निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून, पक्षाचे अधिकृत उमेदवार स्वाती पाचुंदकर पाटील , मनिषा पाचंगे आणि सागर देवकर यांनी भव्य आणि शिस्तबद्ध शक्तीप्रदर्शन करत सोमवार (दि १९) रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या कार्यक्रमामुळे संपूर्ण गटात भाजपची संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली […]

अधिक वाचा..

महापालिका निकालानंतर महायुतीत खळबळ! माझा पराभव जनतेने नाही, भाजपच्या गद्दारीने केला

शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा भाजपवर गंभीर आरोप मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीमधील अंतर्गत कलह उघडकीस आला आहे. मुंबईतील वॉर्ड क्रमांक १९४ मधून पराभूत झालेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार समाधान सरवणकर यांनी भाजपवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. आपला पराभव हा जनतेने दिलेला कौल नसून भाजपच्या स्थानिक पातळीवरील गद्दारीचा परिणाम असल्याचा […]

अधिक वाचा..

महापालिका निवडणुकीनंतर भाजपला मोठा धक्का: फडणवीसांचे निकटवर्ती संदीप जोशी यांचा राजकारणातून संन्यास

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आणि भाजपचे मानद सचिव संदीप जोशी यांनी महापालिका निवडणूक संपताच भारतीय जनता पक्षाला तडकाफडकी रामराम ठोकत सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांनी लिहिलेल्या भावनिक पत्रातून हा निर्णय जाहीर करत राजकारणातील वाढता संधीसाधूपणा, पक्षांतराची स्पर्धा आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होणारी अस्वस्थता याकडे स्पष्टपणे बोट दाखवले आहे. राजकारण हे पद, प्रतिष्ठा […]

अधिक वाचा..