डॉक्टरांचा निष्काळजीपणा! छातीतील वेदना दुर्लक्षित केल्याने तरुणाचा मृत्यू…

नातेवाइकांची सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पुणे: छातीत तीव्र वेदना होत असलेल्या ३० वर्षीय तरुणाला औंध येथील जिल्हा रुग्णालयात पहाटे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी हृदयविकाराची शक्यता नाकारत पित्त व मळमळीचे निदान करून वेदनाशामक उपचार करत घरी पाठवले. घरी गेल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांतच संबंधित तरुणाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी पहाटे घडली. […]

अधिक वाचा..

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने कष्टकरी व श्रमिकांचा बुलंद आवाज हरपला

मुंबई: असंघटित कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणारे कृतीशील समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने कष्टकरी व श्रमिकांचा बुलंद आवाज हरपला आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्या आहेत. डॉ. बाबा आढाव यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, गेल्या सोमवारीच पूना हॅास्पीटलला […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा यांचे अमरावती येथे निधन

अमरावती: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी ,हास्यसम्राट, ‘मिर्झा एक्सप्रेस ‘फेम डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे आज २८ नोव्हेंबर शुक्रवारला सकाळी ६.३० वाजता दीर्घ आजाराने निधन झाले.ते ६८ वर्षांचे होते. यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील धनज -माणिकवाडा हे त्यांचे मूळ गाव आहे. सध्या अमरावती येथील वलगाव रोडवरील नवसारी परिसरात ‘ मिर्झा एक्सप्रेस ‘ या घरात त्यांचे वास्तव्य होते.त्यांच्या […]

अधिक वाचा..

अनोळखी पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू; शिरूर पोलिसांकडून नातेवाईकांचा शोध सुरु

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील न्हावरा – केडगाव चौफुला रोडवरील आंधळगाव येथील सीएनजी पंपाजवळ सापडलेल्या एका अनोळखी पुरुषाला गंभीर अवस्थेत ससून हॉस्पिटल, पुणे येथे दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सदर व्यक्तीचा मृत्यू झाला असून, शिरूर पोलीस ठाण्याकडून त्याच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे. शिरूर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या संदर्भात पोलीस हवालदार व्ही.एस. […]

अधिक वाचा..

मराठी वाचकांना भुरळ पाडणारे कादंबरीकार भैरप्पा यांच्या निधनाने साहित्याचे एक पर्व संपले;

मुंबई: देशातील ज्येष्ठ कन्नड साहित्यिक आणि प्रख्यात कादंबरीकार एस.एल. भैरप्पा यांच्या जाण्याने देशातल्या साहित्य विश्वातले पर्व संपले अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. भैरप्पा यांच्या अनेक कादंबऱ्यांचा मराठीमध्ये देखील अनुवाद झाला असून या कादंबऱ्यांनी मराठी म्हणाला अक्षरशः भुरळ पाडली असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणतात की, भैरप्पा यांच्या कादंबऱ्यांनी वाचकांना एका वेगळ्या […]

अधिक वाचा..

प्रशासकीय कारवाईच्या धास्तीने निरगुडीमधील शिक्षकाचा मृत्यू

फलटण: निरगुडी येथील प्राथमिक शिक्षक सचिन काकडे यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. मात्र, त्यांचा मृत्यू हा जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कारवाईच्या धास्तीने आणि त्यामुळे आलेल्या प्रचंड मानसिक दडपणातून झाल्याची चर्चा शिक्षक वर्तुळात आणि सामाजिक माध्यमांवर सुरू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक सचिन काकडे हे जिल्हा परिषदेच्या सुरू असलेल्या एका […]

अधिक वाचा..

एक चूक अन् अख्खं घर उद्धवस्त

कोल्हापूर: कोल्हापुरातील कळंबा येथील एलआयसी कॉलनीमध्ये घरगुती गॅस पाईपलाईनमुळे भीषण स्फोट झाला होता. या भीषण स्फोटात जखमी झालेल्या पाच वर्षांच्या प्रज्वल भोजनेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या तीनवर पोहोचली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. गॅस कंपनीच्या कामातील निष्काळजीपणाबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी […]

अधिक वाचा..

डोळा लागला अन् घात झाला; PSI अश्विनीचा मृत्यू कसा झाला

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) २०२३ मधील पोलिस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवणारी अश्विनी बाबुराव केदारी (वय ३०) यांचा एका दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. नाशिक येथे PSI प्रशिक्षण घेत असताना गणेशोत्सवासाठी दोन दिवसांच्या सुट्टीवर गावी आलेल्या अश्विनीवर काळाने घाला घातला. २८ ऑगस्ट रोजी सकाळी आंघोळीसाठी पाणी गरम करताना हिटरमुळे झालेल्या अपघातात ती […]

अधिक वाचा..

पुण्यात गणपती विसर्जन पाहण्यासाठी गेलेल्या मामी-भाचीचा ट्रकच्या धडकेत मृत्यू

पुणे: पुणे जिल्ह्यातील भोसरी येथे गणेश विसर्जन पाहण्यासाठी गेलेल्या नांदेडच्या मामी-भाचीचा ट्रकच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ६ सप्टेंबर रोजी रात्री १० च्या सुमारास घडली. या अपघातात मामी प्रतिभा आंबटवार (वय ३२) आणि भाची कादंबरी गादेकर (वय १८, दोघी रा. बळीरामपूर, ता. नांदेड) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. बळीरामपूर […]

अधिक वाचा..

विरार इमारतीच्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू 

वसई: विरार इमारत दुर्घटनेत मागील वीस तासांपासून राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक व पालिकेच्या अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत 17 जणांचा शोध लागला असून त्यात 14 जणांचा मृत्यू तर 1 जण जखमी झाले आहे. तर 2 जणांना वाचवण्यात यश आले आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढत आहे. मंगळवारी रात्री विरार पूर्वेच्या विजयनगर परिसरातील रमाबाई अपार्टमेंट या […]

अधिक वाचा..