अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राचे नेतृत्व पोरके; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अकाली निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक व सुन्न करणारी आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने धडाडीचे, कर्तबगार आणि लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र शोकभावना व्यक्त केल्या.अजित दादा पवार हे स्पष्टवक्तेपणा, प्रशासनावर मजबूत पकड, जनतेच्या प्रश्नांची सखोल जाण आणि ते प्रभावीपणे सोडवण्याच्या […]

अधिक वाचा..

अजितदादांच्या जाण्याने माझे वैयक्तिक नुकसान; डॉ. विश्वजीत कदम यांच्याकडून शोक व्यक्त

मुंबई: महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाची बातमी ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी तसेच कदम कुटुंबासाठी अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. अजितदादांच्या जाण्याने राज्याने एक खंबीर, अनुभवी आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व गमावले आहे. गेल्या सुमारे ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात त्यांनी आपल्या प्रशासकीय अभ्यास, ठाम निर्णयक्षमता आणि नेतृत्वगुणांच्या बळावर महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळे […]

अधिक वाचा..

आज माझा मोठा भाऊ हरपला! अजित पवारांच्या निधनावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक

विमान अपघातात अजित पवार यांच्या निधनावर उपमुख्यमंत्री शिंदेंची साश्रू नयनांनी श्रद्धांजली ठाणे: “आज माझा मोठा भाऊ हरपल्यासारखी भावना आहे. अजित पवार हे केवळ नेते नव्हते, तर ते एक अभ्यासू, वेळेचं भान ठेवणारे आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले व्यक्तिमत्त्व होते,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या निधनावर तीव्र शोकभावना व्यक्त केली. बारामतीजवळ विमान […]

अधिक वाचा..

विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; १४ वर्षांच्या मुलीसह चौघांचा मृत्यू

सोलापूर: मंगळवेढ्याजवळ पंढरपूर–सोलापूर महामार्गावर सोमवारी (२६ जानेवारी २०२६) सायंकाळी भीषण अपघात झाला. देवदर्शनासाठी पंढरपूरला गेलेल्या मुंबईच्या भाविकांच्या क्रुझर गाडीला एका मालवाहतूक कंटेनर ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात तीन महिला आणि १४ वर्षांच्या मुलासह चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास […]

अधिक वाचा..

पुण्यात पुन्हा हुंडाबळी! सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; जबरदस्तीच्या गर्भपाताचा गंभीर आरोप

पुणे: वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्यभरात हुंडाबळीच्या घटना सातत्याने समोर येत असतानाच, पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक अत्यंत संतापजनक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून सातत्याने होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ […]

अधिक वाचा..

७ तास झोप घेत नसाल तर तुम्ही डेंजर झोनमध्ये आहात, अकाली मृत्यू, हार्ट अटॅक, नैराश्य येण्याची भीती

रात्री झोप पूर्ण न झाल्याने दुसऱ्या दिवशी सर्वांनाच थकवा आणि अस्वस्थता जाणवत राहते. जास्त वेळ झोप न घेता राहणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. प्रौढांनी दररोज रात्री सात तासांपेक्षा जास्त झोप घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुरेशी झोप न मिळाल्याने नैराश्य, मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब आणि पक्षाघात, अकाली मृत्यू यांसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढत असल्याचे […]

अधिक वाचा..

GST अधिकारी सचिन जाधवर मृत्यू प्रकरणाला नवे वळण; सुसाईड नोटमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव

बीड: बीड येथील वस्तू व सेवा कर (GST) कार्यालयातील अधिकारी सचिन नारायण जाधवर यांच्या मृत्यू प्रकरणाने आता खळबळजनक वळण घेतले आहे. “माझे पती कधीच आत्महत्या करू शकत नाहीत. गेल्या महिनाभरापासून त्यांना सातत्याने मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले,” असा गंभीर आरोप त्यांच्या पत्नी मयुरी जाधवर यांनी केला आहे.शक्रवारी त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेत या […]

अधिक वाचा..

कर्तव्यावर असतानाच वीरमरण! डोडात लष्करी वाहनाचा भीषण अपघात;10 जवान शहीद, 7 जखमी

डोडा: जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील भदेरवाह भागात लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. खानी टॉप परिसरात भारतीय लष्कराचे एक बुलेटप्रूफ वाहन अनियंत्रित होऊन सुमारे 200 फूट खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत 10 जवान शहीद झाले असून 7 जवान गंभीर जखमी झाले आहेत. लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे वाहन 17 जवानांना घेऊन उंच […]

अधिक वाचा..

फाशीच्या शिक्षेला पर्याय! गळफास पद्धतीविरोधातील जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली: भारतामध्ये अत्यंत क्रूर गुन्ह्यांसाठी दिल्या जाणाऱ्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी वापरल्या जाणाऱ्या गळफास पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ही पद्धत अतिशय वेदनादायी आणि अमानुष असल्याचा युक्तिवाद करत, त्याऐवजी अधिक मानवी आणि कमी वेदनादायी पर्यायांचा विचार करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर अलिकडेच न्या. विक्रम नाथ […]

अधिक वाचा..

डॉक्टरांचा निष्काळजीपणा! छातीतील वेदना दुर्लक्षित केल्याने तरुणाचा मृत्यू…

नातेवाइकांची सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पुणे: छातीत तीव्र वेदना होत असलेल्या ३० वर्षीय तरुणाला औंध येथील जिल्हा रुग्णालयात पहाटे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी हृदयविकाराची शक्यता नाकारत पित्त व मळमळीचे निदान करून वेदनाशामक उपचार करत घरी पाठवले. घरी गेल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांतच संबंधित तरुणाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी पहाटे घडली. […]

अधिक वाचा..