अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर एकनाथ शिंदेंचा संवेदनशील निर्णय, वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा ९ फेब्रुवारीला आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदेंनी आपल्या जवळच्या मित्र आणि सहकारी गमावल्याची व्यथा व्यक्त करत सर्व नियोजित सोहळे रद्द केले आहेत. त्यांनी सोशल मीडिया आणि प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले, “अजित पवार […]

अधिक वाचा..

प्रधानमंत्री आवास योजनेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

मुंबई: केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत नियमांमध्ये मोठे आणि महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. या बदलांचा थेट परिणाम घरकुलासाठी आधी अर्ज केलेल्या तसेच भविष्यात अर्ज करण्याच्या तयारीत असलेल्या नागरिकांवर होणार आहे. योजनेचा लाभ केवळ खऱ्या गरजू घटकांपर्यंतच पोहोचावा आणि गैरवापराला आळा बसावा, या उद्देशाने नियम अधिक स्पष्ट व कठोर करण्यात आल्याचे केंद्र […]

अधिक वाचा..

UGC चा निर्णय म्हणजे विद्यार्थ्यांविरोधातील षडयंत्र

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची केंद्र सरकारला थेट चेतावणी मुंबई: देशातील उच्च शिक्षण व्यवस्थेला राजकीय नियंत्रणाखाली आणण्याचा आणि विद्यार्थी वर्गात जाणूनबुजून फूट पाडण्याचा प्रयत्न केंद्र सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) करत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने केला आहे. “Promotion of Equity in Higher Education Institutions Regulations – 2026” ही नियमावली म्हणजे […]

अधिक वाचा..

राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय; ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफीची घोषणा

मुंबई: राज्यातील आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने गुरुवारी (दि. २२) एक ऐतिहासिक आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. ३० जून २०२६ पूर्वी राज्यातील पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे राज्य सरकारचे कर्तव्य असल्याचे स्पष्ट करताना भरणे म्हणाले की, कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी विशेष समितीची […]

अधिक वाचा..

मुंबई महापौरपदावर सस्पेन्स कायम; फडणवीस शिंदे बसून निर्णय घेणार

मुंबई: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणूक निकालात बहुसंख्य ठिकाणी भाजप–शिवसेना महायुतीने सत्ता मिळवली आहे. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, नाशिक, जळगाव, धुळे, अमरावती, अकोला, अहिल्यानगर आदी महापालिकांमध्ये महायुतीचा झेंडा फडकला आहे. मात्र, या सत्तेनंतर आता सर्वांचे लक्ष मुंबईच्या महापौरपदाकडे लागले आहे. महापौर कोणाचा होणार, या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सस्पेन्स कायम ठेवणारे वक्तव्य केले […]

अधिक वाचा..

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल; रमेश चेन्नीथला

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी टिळक भवन येथे आढावा बैठक संपन्न मुंबई: राज्यात नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या असून आता महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. काँग्रेस पक्षाने निवणुकीसाठी सर्व तयारी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, या निवडणुकीत इंडिया आघाडीच्या घटक पक्षांशी चर्चा सुरु असून जेथे गरज असेल तेथे आघाडी करण्याचा निर्णय स्थानिक नेतृत्व […]

अधिक वाचा..

राज्य सांस्कृतिक पुरस्काराला वामनदादा कर्डक यांचे नाव; सांस्कृतिक कार्य विभागाचा निर्णय

मुंबई: लोककला क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा गौरव करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या राज्य सांस्कृतिक पुरस्काराला आता लोककवी वामनदादा कर्डक यांचे नाव देण्यात आले आहे. या संदर्भात सांस्कृतिक कार्य विभागाने दि. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘ शासन निर्णय’ जारी केला. यापुढे या पुरस्काराला ‘लोककवी वामनदादा कर्डक राज्य सांस्कृतिक पुरस्कार – लोककला क्षेत्र’ असे नावाने ओळखले जाईल. लोककलेला योग्य प्रतिष्ठा […]

अधिक वाचा..

ओबीसी तरुणांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी २ सप्टेंबरचा शासन निर्णय तात्काळ रद्द करवा

नागपूर: अकोल्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर विजय बोचरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलीय.२ सप्टेंबर रोजी सरकारने काढलेल्या शासन निर्णयानंतर ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे आणि त्यातून आत्महत्यांचे सत्र निर्माण झाले आहे. या आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारने हा काळा शासन निर्णय रद्द केलाच पाहिजे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळनेते विजय वडेट्टीवर यांनी केली. नागपूर इथे उद्या विदर्भातील ओबीसी […]

अधिक वाचा..

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा दिलासा, परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय

शैक्षणिक संस्थांनी पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी पुढे यावे; मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन मुंबई: राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला आहे. पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी पुरामुळे कागदपत्रे, शैक्षणिक साहित्य वाहून गेलेल्या एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण बाधित होणार नाही, याची दक्षता घेतली जात असून परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या सोबतच शैक्षणिक संस्थांनीही […]

अधिक वाचा..

टी. ई. टी. करा अन्यथा निवृत्ती घ्या..! सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने शिक्षण क्षेत्रात खळबळ

बारामती: देशभरातील शिक्षकांनी टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) दोन वर्षात उत्तीर्ण करावी अन्यथा सक्तीची सेवा निवृत्ती घ्यावी असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर रोजी दिल्यामुळे शिक्षकांमध्ये नोकरी सोडावी लागण्याची भीती निर्माण झाली आहे. राज्य शासनाने तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केल्याची माहिती राज्याध्यक्ष बाळासाहेब […]

अधिक वाचा..