मच्छीमारांच्या नुकसानभरपाईचा मार्ग मोकळा; TISS अहवालानंतर दोन महिन्यांत निर्णय

मुंबई: वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू आणि कोस्टल रोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छीमारांच्या प्रलंबित नुकसानभरपाईचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. नुकसानभरपाईचे निकष निश्चित करण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) मार्फत सविस्तर अभ्यास सुरू असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोन महिन्यांत मच्छीमारांना भरीव नुकसानभरपाई देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. उपमुख्यमंत्री […]

अधिक वाचा..

पुणे–नाशिक सरळ रेल्वेसाठी तज्ज्ञ समिती स्थापन; सत्यजीत तांबे यांनी केला निर्णयाचे स्वागत

६० दिवसांत अहवाल सादर होणार; ९ ऑगस्टचे जनआंदोलन नियोजितप्रमाणेच होणार मुंबई: पुणे–नाशिक सरळ रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भात राज्य शासनाने तज्ज्ञ समितीची स्थापना केली असून, या निर्णयाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी स्वागत केले आहे. अनेक वर्षांपासून या रेल्वेमार्गासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या तांबे यांनी हा निर्णय प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले आहे. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या […]

अधिक वाचा..

‘कटू औषध’ पण काळाची गरज; महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत

नेतृत्वालाही आदर्श घालण्याचे आवाहन मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधनटंचाई, महागाई आणि परकीय चलन तुटवड्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या ऊर्जा बचत व खर्च नियंत्रणाच्या निर्णयांचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेले परिपत्रक हे केवळ प्रशासकीय आदेश नसून भविष्यातील संभाव्य आर्थिक संकटाची चाहूल ओळखून […]

अधिक वाचा..

NEET 2026 पुनर्परीक्षा निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक

“विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा” मुंबई: NEET 2026 परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या देशव्यापी पुनर्परीक्षेच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. पक्षाचे प्रदेश प्रवक्ता तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केंद्र सरकार आणि NTA वर जोरदार टीका केली आहे. देशातील तब्बल २२ लाख ७९ […]

अधिक वाचा..

पत्रा चाळ रहिवाशांना दिलासा; भाड्यात १०% वाढीचा निर्णय

मुंबई: गोरेगावमधील पत्रा चाळ रहिवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत रहिवाशांना मिळणाऱ्या भाड्यात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार विद्या ठाकूर, खासदार रवींद्र वायकर, तसेच म्हाडाचे अधिकारी उपस्थित होते. पत्रा चाळ प्रकरणात काही रहिवाशांनी […]

अधिक वाचा..

महिला सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी सर्व सेवा एकाच छताखाली आणण्याचा निर्णय; निलम गोऱ्हे

मुंबई: राज्यातील महिला सुरक्षेशी संबंधित शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधून महिलांना तातडीने न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. भरोसा सेल, कौटुंबिक संरक्षण अधिकारी आणि समुपदेशन केंद्र यांच्या सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी मानक कार्यपद्धती (Standard Operating Procedure) तयार करण्याच्या सूचना […]

अधिक वाचा..

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्याविरोधात FIR चे आदेश; पोक्सो विशेष न्यायालयाचा निर्णय

मुंबई: ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या अडचणी वाढल्या असून एडीजे अत्याचार आणि पोक्सो विशेष न्यायालयाने त्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात त्यांच्यासह शिष्य स्वामी मुकुंदानंद गिरी यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शाकुंभरी पीठाधीश्वर आशुतोष ब्रह्मचारी यांनी कलम १७४ (४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल […]

अधिक वाचा..

मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय: बलात्कार व पोक्सो प्रकरणातील विद्यार्थ्याला अटींसह जामीन

मुंबई: शिरगाव-परंद्वादी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्कार आणि पोक्सो प्रकरणातील 20 वर्षीय विद्यार्थ्याला मुंबई उच्च न्यायालयाने अटी व शर्थींवर जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्या खंडपीठाने आरोपी रुद्रा अरुण वाघाये यास जामीन मंजूर करण्याचे आदेश दिले. आरोपी पुण्यातील नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याची माहिती त्यांचे वकील अॅड. नितीन भालेराव यांनी न्यायालयास दिली. प्रकरणाची […]

अधिक वाचा..

सातारा बसस्थानकाबाबत महत्त्वाचा निर्णय; वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुढील बाजूने ‘आऊट गेट’चा प्रस्ताव

सातारा: सातारा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाबाहेर दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत. बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसेससाठी पुढील बाजूने (पारंगे चौक) स्वतंत्र ‘आऊट गेट’ काढण्याचा सुधारित आराखडा तातडीने तयार करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध प्रलंबित प्रश्नांवर महत्त्वाची बैठक […]

अधिक वाचा..

मुस्लीम ५% आरक्षण रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक; सरकार अल्पसंख्याकविरोधी; नसीम खान

मुंबई: राज्यातील भाजपा महायुती सरकारने मुस्लीम समाजाला देण्यात आलेले ५ टक्के शैक्षणिक व नोकरीतील आरक्षण रद्द करण्याचा घेतलेला निर्णय अन्यायकारक असून अल्पसंख्याक समाजाच्या विकासाला खीळ घालणारा आहे, असा आरोप माजी मंत्री तथा काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान यांनी केला आहे. टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना नसीम खान म्हणाले की, २०१४ साली काँग्रेस आघाडी […]

अधिक वाचा..