अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूवर वडेट्टीवार आक्रमक; आठ दिवसांत चौकशी अहवाल जाहीर करण्याची मागणी

अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागाला लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी रुग्णालयाची पाहणी करून घटनेची माहिती घेतली. रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी आणि कालबाह्य फायर सेफ्टी ऑडिटवरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. या दुर्घटनेपूर्वीच अग्निशमन विभागाने फायर सेफ्टी […]

अधिक वाचा..

आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करा; अन्यथा रस्त्यावर उतरू; हर्षवर्धन सपकाळ

१३ दिवसांपासून उपोषण सुरू; महायुती सरकारवर आदिवासीविरोधी असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप मुंबई: राज्यातील पुणे, नाशिक, वर्धा, पालघरसह विविध ठिकाणी आदिवासी विद्यार्थी गेल्या १३ दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी उपोषण करत आहेत. मात्र, राज्यातील भाजपा-महायुती सरकारला त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास वेळ नाही, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करा; अन्यथा काँग्रेसला […]

अधिक वाचा..

MMRDA भरती परीक्षेच्या निकालावर काँग्रेसचा आक्षेप; उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी

मुंबई: भाजपा सरकारच्या काळात परीक्षांना पेपरफुटीचे ग्रहण लागले असून सरकार एकही परीक्षा व्यवस्थित घेऊ शकत नाही. नीट, टीईटी पेपरफुटीनंतर आता MMRDAच्या अभियांत्रिकी भरती परीक्षेतही मोठा घोटाळा झाल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस धनंजय शिंदे यांनी केला आहे. १४ ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या निकाल आणि गुणवत्ता यादीबाबत विद्यार्थ्यांमध्ये गंभीर अस्वस्थता असून, या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली […]

अधिक वाचा..

स्वाभिमानीच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर १२ ठराव; कर्जमाफीसह शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी

पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्षाच्या दोन दिवसीय राज्य कार्यकारिणी बैठकीत शेतकरी, शेतमजूर आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर १२ महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आले. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान, थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतमजूर कल्याण महामंडळाची स्थापना, हळदीला वायदेबाजारातून वगळणे तसेच शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी या ठरावांद्वारे करण्यात आली. पुण्यातील किवळे […]

अधिक वाचा..

NEET आंदोलनावरील कारवाईच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे मुंबईत बॅनर आंदोलन; अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई: NEET पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस कारवाईच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसने वांद्रे आणि बोरीवली (पश्चिम) येथे बॅनर फडकावून निदर्शने केली. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पेलेट गनचा वापर आणि गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करत युवक काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली. युवक काँग्रेसने पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर […]

अधिक वाचा..

‘गुंगी गुडिया’वरून राष्ट्रवादीचा काँग्रेसवर पलटवार; महिलांचा अवमान थांबवा, उमेश पाटील यांची मागणी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यावरील काँग्रेसच्या सोशल मीडिया पोस्टवरून नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत, “‘गुंगी गुडिया’ हा शब्दप्रयोग करून काँग्रेस स्वतःच आपल्या इतिहासालाच नाकारत आहे का?” असा सवाल उपस्थित केला. उमेश पाटील म्हणाले की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी […]

अधिक वाचा..

MPSC च्या CBT आणि Normalization विरोधात काँग्रेसचे बेमुदत उपोषण; मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्पर्धा परीक्षा CBT (Computer Based Test) पद्धतीने घेण्याच्या आणि Normalization प्रणाली लागू करण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सीबीडी बेलापूर येथील MPSC मुख्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाला विद्यार्थी, विविध विद्यार्थी संघटना तसेच काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काँग्रेसने या निर्णयामुळे राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा […]

अधिक वाचा..

इथेनॉल धोरणावर काँग्रेसचे प्रश्न; वाहनधारकांच्या तक्रारींची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित इंधन (E20) धोरणावर गंभीर प्रश्न उपस्थित करत, वाहनधारकांच्या तक्रारींची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. पक्षाच्या माध्यम समन्वयकांनी प्रसिद्ध केलेल्या मतलेखात म्हटले आहे की, पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय ऊर्जा स्वावलंबन आणि पर्यावरण संरक्षणाच्या नावाखाली राबविला जात असला, तरी त्यासाठी पुरेशी तयारी झालेली नाही. त्यामुळे […]

अधिक वाचा..

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक; लवकरच दिलासादायक निर्णय होणार

मुंबई: राज्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून मानधन, सेवा संरक्षण आणि प्रशासकीय अधिकारांसंदर्भातील प्रश्नांवर लवकरच दिलासादायक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मंत्रालयात ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत मंत्रीद्वयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी […]

अधिक वाचा..

वांद्रा अतिक्रमण प्रकरणात १५ जण अटकेत; भूमाफिया आणि भ्रष्ट साखळीवर कारवाईची मागणी जोरात

मुंबई : वांद्रा रेल्वे स्टेशनजवळील गरीब नगर परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान झालेल्या दगडफेक प्रकरणात पोलिसांनी १५ जणांना अटक केली असून सुमारे १५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर केवळ दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करून प्रश्न सुटणार नसल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत […]

अधिक वाचा..