MPSC च्या CBT आणि Normalization विरोधात काँग्रेसचे बेमुदत उपोषण; मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्पर्धा परीक्षा CBT (Computer Based Test) पद्धतीने घेण्याच्या आणि Normalization प्रणाली लागू करण्याच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सीबीडी बेलापूर येथील MPSC मुख्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाला विद्यार्थी, विविध विद्यार्थी संघटना तसेच काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काँग्रेसने या निर्णयामुळे राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा […]

अधिक वाचा..

इथेनॉल धोरणावर काँग्रेसचे प्रश्न; वाहनधारकांच्या तक्रारींची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित इंधन (E20) धोरणावर गंभीर प्रश्न उपस्थित करत, वाहनधारकांच्या तक्रारींची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. पक्षाच्या माध्यम समन्वयकांनी प्रसिद्ध केलेल्या मतलेखात म्हटले आहे की, पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय ऊर्जा स्वावलंबन आणि पर्यावरण संरक्षणाच्या नावाखाली राबविला जात असला, तरी त्यासाठी पुरेशी तयारी झालेली नाही. त्यामुळे […]

अधिक वाचा..

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक; लवकरच दिलासादायक निर्णय होणार

मुंबई: राज्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून मानधन, सेवा संरक्षण आणि प्रशासकीय अधिकारांसंदर्भातील प्रश्नांवर लवकरच दिलासादायक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. मंत्रालयात ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत मंत्रीद्वयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी […]

अधिक वाचा..

वांद्रा अतिक्रमण प्रकरणात १५ जण अटकेत; भूमाफिया आणि भ्रष्ट साखळीवर कारवाईची मागणी जोरात

मुंबई : वांद्रा रेल्वे स्टेशनजवळील गरीब नगर परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान झालेल्या दगडफेक प्रकरणात पोलिसांनी १५ जणांना अटक केली असून सुमारे १५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर केवळ दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करून प्रश्न सुटणार नसल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत […]

अधिक वाचा..

होमगार्ड जवानांच्या मागण्यांसाठी आझाद मैदानावर महाआंदोलन

मुंबई: पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावणाऱ्या होमगार्ड जवानांना नियमित काम आणि वेळेवर मानधन मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बसव प्रतिष्ठानच्या वतीने सोमवार, दि. ११ मे रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे महाआंदोलन करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन […]

अधिक वाचा..

बीडसह राज्यात अल्पवयीनांवरील अत्याचारांच्या घटनांनी खळबळ; जलद न्याय आणि कडक कारवाईची मागणी तीव्र

पालकांची वाढती चिंता, समाजजागृती आणि यंत्रणांच्या जबाबदारीवर पुन्हा प्रश्नचिन्ह मुंबई: महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या सलग घटनांमुळे राज्यभर संताप आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बीड जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर प्रकरणासह पुणे जिल्ह्यातील भोर, चाकण, नसरापूर या भागांतील घटनांनी समाजमन हादरले आहे. अल्पवयीनांवरील गुन्ह्यांमध्ये काही प्रकरणांमध्ये आरोपी हे ओळखीचे किंवा नातेवाईक असल्याचे समोर आल्याने सुरक्षिततेबाबत नव्याने […]

अधिक वाचा..

साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांच्या बदल्यांवर वाद; शिवसेनेची चौकशीची मागणी

मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून आला आहे. बदलीच्या दिवशीच त्यांनी ‘पॉवर प्ले’ करत जिल्ह्यातील सहा ते सात पोलीस अधिकाऱ्यांच्या कथित नियमबाह्य बदल्या केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून शिवसेना सातारा जिल्ह्याने थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली आहे. […]

अधिक वाचा..

अंबाजोगाईत चिमुरडीवर अत्याचारानंतर मृत्यू; डॉ. नीलम गोऱ्हे यांची कडक कारवाईची मागणी

मुंबई: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे अवघ्या २ वर्षे ५ महिन्यांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली असून, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनावर कठोर कारवाईसाठी दबाव आणला आहे. प्राथमिक तपासात मृत्यू अपघाती असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, शवविच्छेदन अहवालातून लैंगिक अत्याचार स्पष्ट झाल्यानंतर प्रकरणाला […]

अधिक वाचा..

लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचे नाव द्यावे; आमदार अमोल मिटकरी यांची मागणी

मुंबई: महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण योजना’ मुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडला असून, वाढत्या राजकोषीय तुटीच्या पार्श्वभूमीवर सरकारने खर्चावर कडक निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 15 फेब्रुवारी 2026 नंतर कोणत्याही नवीन खरेदी प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार नाही, असे स्पष्ट आदेश वित्त विभागाने दिले आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली […]

अधिक वाचा..

मनोज जरांगे पाटीलांवर अमोल खुणेचा खळबळजनक आरोप; एसआयटी चौकशी व नार्को टेस्टची मागणी

जालना: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत त्यांचा जुना सहकारी आणि घातपाताच्या प्रयत्न प्रकरणातील संशयित आरोपी अमोल खुणे याने खळबळजनक दावे केले आहेत. नुकतीच जामिनावर सुटका झाल्यानंतर खुणेने जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेत थेट मनोज जरांगे पाटील आणि स्वतःची एसआयटी चौकशी व नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात […]

अधिक वाचा..