वांद्रा अतिक्रमण प्रकरणात १५ जण अटकेत; भूमाफिया आणि भ्रष्ट साखळीवर कारवाईची मागणी जोरात

मुंबई : वांद्रा रेल्वे स्टेशनजवळील गरीब नगर परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान झालेल्या दगडफेक प्रकरणात पोलिसांनी १५ जणांना अटक केली असून सुमारे १५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर केवळ दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करून प्रश्न सुटणार नसल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत […]

अधिक वाचा..

होमगार्ड जवानांच्या मागण्यांसाठी आझाद मैदानावर महाआंदोलन

मुंबई: पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावणाऱ्या होमगार्ड जवानांना नियमित काम आणि वेळेवर मानधन मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बसव प्रतिष्ठानच्या वतीने सोमवार, दि. ११ मे रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे महाआंदोलन करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन […]

अधिक वाचा..

बीडसह राज्यात अल्पवयीनांवरील अत्याचारांच्या घटनांनी खळबळ; जलद न्याय आणि कडक कारवाईची मागणी तीव्र

पालकांची वाढती चिंता, समाजजागृती आणि यंत्रणांच्या जबाबदारीवर पुन्हा प्रश्नचिन्ह मुंबई: महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या सलग घटनांमुळे राज्यभर संताप आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बीड जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर प्रकरणासह पुणे जिल्ह्यातील भोर, चाकण, नसरापूर या भागांतील घटनांनी समाजमन हादरले आहे. अल्पवयीनांवरील गुन्ह्यांमध्ये काही प्रकरणांमध्ये आरोपी हे ओळखीचे किंवा नातेवाईक असल्याचे समोर आल्याने सुरक्षिततेबाबत नव्याने […]

अधिक वाचा..

साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांच्या बदल्यांवर वाद; शिवसेनेची चौकशीची मागणी

मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून आला आहे. बदलीच्या दिवशीच त्यांनी ‘पॉवर प्ले’ करत जिल्ह्यातील सहा ते सात पोलीस अधिकाऱ्यांच्या कथित नियमबाह्य बदल्या केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून शिवसेना सातारा जिल्ह्याने थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली आहे. […]

अधिक वाचा..

अंबाजोगाईत चिमुरडीवर अत्याचारानंतर मृत्यू; डॉ. नीलम गोऱ्हे यांची कडक कारवाईची मागणी

मुंबई: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे अवघ्या २ वर्षे ५ महिन्यांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली असून, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनावर कठोर कारवाईसाठी दबाव आणला आहे. प्राथमिक तपासात मृत्यू अपघाती असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, शवविच्छेदन अहवालातून लैंगिक अत्याचार स्पष्ट झाल्यानंतर प्रकरणाला […]

अधिक वाचा..

लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचे नाव द्यावे; आमदार अमोल मिटकरी यांची मागणी

मुंबई: महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण योजना’ मुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडला असून, वाढत्या राजकोषीय तुटीच्या पार्श्वभूमीवर सरकारने खर्चावर कडक निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 15 फेब्रुवारी 2026 नंतर कोणत्याही नवीन खरेदी प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार नाही, असे स्पष्ट आदेश वित्त विभागाने दिले आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली […]

अधिक वाचा..

मनोज जरांगे पाटीलांवर अमोल खुणेचा खळबळजनक आरोप; एसआयटी चौकशी व नार्को टेस्टची मागणी

जालना: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत त्यांचा जुना सहकारी आणि घातपाताच्या प्रयत्न प्रकरणातील संशयित आरोपी अमोल खुणे याने खळबळजनक दावे केले आहेत. नुकतीच जामिनावर सुटका झाल्यानंतर खुणेने जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेत थेट मनोज जरांगे पाटील आणि स्वतःची एसआयटी चौकशी व नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात […]

अधिक वाचा..

मुंबई निकालानंतर काँग्रेसमध्ये वाद! वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची भाई जगताप यांची मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप–शिवसेना (शिंदे गट) युतीने ऐतिहासिक विजय मिळवत पहिल्यांदाच मुंबईवर भाजपचा झेंडा फडकावला आहे. या पार्श्वभूमीवर महापौरपदाबाबत राजकीय हालचालींना वेग आला असताना काँग्रेस पक्षात मात्र अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. मुंबईत काँग्रेसला २४ जागा मिळाल्या असून अपेक्षेपेक्षा कामगिरी सुधारली असली तरी सत्तेच्या समीकरणात पक्षाची भूमिका मर्यादित राहिली आहे. निकालानंतर काही तासांतच काँग्रेसचे […]

अधिक वाचा..

महापालिका निवडणूकांसाठी नियमावली लवकर जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी मान्य

मुंबई: दि. १ डिसेंबर २०२५ रोजी राजकीय पक्ष प्रतिनिधींसोबत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त यांनी बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीत नगर परिषद व नगर पंचायत निवडणूकीत सुस्त असलेल्या आयोगाने अनेक आदेश निवडणूकीच्या दोन दिवसापर्यंत काढले. त्यामुळे अनेक ठिकाणी संभ्रम निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणूकासाठी नियमावली लवकर जाहीर करण्याची मागणी मी काँग्रेस पक्षातर्फे बैठकीत केली. […]

अधिक वाचा..

एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक; प्रताप सरनाईक

मुंबई: एस टी महामंडळ कामगारांच्या विविध मागण्या आहेत.त्या रास्त असून या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एस टी कामगार संघटना सोबत मंत्रालयात आयोजित बैठकीत सांगितले. बैठकीस एस. टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सहसचिव […]

अधिक वाचा..