‘कुणाचाही हक्क न काढता मराठा समाजाला न्याय देणार’; शिंदेंचा निर्धार, परभणीत उबाठाला मोठा धक्का

परभणी: मराठा समाजाला न्याय देतानाच ओबीसी, बहुजन, आदिवासी आणि इतर सर्व समाजघटकांच्या हक्कांचे संरक्षण करून सर्वसमावेशक विकास साधणे, हीच महायुती सरकारची भूमिका आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. “कुणाचाही हक्क काढून न घेता मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे,” असे सांगत सामाजिक सलोखा आणि कायदेशीर मार्गाने प्रश्न सोडविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. परभणीत आयोजित शेतकरी […]

अधिक वाचा..

‘मराठीवर सक्ती नव्हे, भक्ती करा’; हिंदी भाषिक रिक्षा-टॅक्सी चालकांना एकनाथ शिंदेंचे आवाहन

मुंबई : “मराठीवर सक्ती करणारी नव्हे, तर मराठीवर भक्ती करणारी गर्दी आज येथे पाहायला मिळत आहे. जन्मभूमी उत्तर प्रदेश, बिहार किंवा अन्य राज्य असले तरी कर्मभूमी महाराष्ट्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मराठी भाषेवर प्रेम करा,” असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. बोरिवली येथील कोरा केंद्र ग्राउंडवर २० हजार हिंदी भाषिक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी […]

अधिक वाचा..

एमएमआरमध्ये २० वर्षांत ३० लाख परवडणारी घरे; विकासाला गती देण्याचे सरकारचे धोरण

मुंबई : राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागाचा सुनियोजित विकास साधताना येत्या २० वर्षांत मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) तब्बल ३० लाख परवडणारी घरे उभारण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट महायुती सरकारने ठेवले आहे. ‘कामास स्थगिती नाही, तर कामाला गती’ हे सरकारचे धोरण असून, मजबूत पायाभूत सुविधा, आधुनिक वाहतूक व्यवस्था आणि परवडणारी घरे हे विकासाचे प्रमुख आधार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ […]

अधिक वाचा..

बळीराजा, महिला आणि तरुणांसाठी महायुती सरकार कटिबद्ध; कर्जमाफीचा शब्द टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार; एकनाथ शिंदे

मुंबई: शेतकरी, महिला, तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत महायुती सरकार काम करत आहे. “महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा” या भूमिकेतून शेतकऱ्यांना दिलेला कर्जमाफीचा शब्द टप्प्याटप्प्याने पूर्ण केला जात असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. कर्जमाफीच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम आज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असल्याचे शिंदे […]

अधिक वाचा..

मच्छीमारांच्या नुकसानभरपाईचा मार्ग मोकळा; TISS अहवालानंतर दोन महिन्यांत निर्णय

मुंबई: वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू आणि कोस्टल रोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छीमारांच्या प्रलंबित नुकसानभरपाईचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. नुकसानभरपाईचे निकष निश्चित करण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) मार्फत सविस्तर अभ्यास सुरू असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोन महिन्यांत मच्छीमारांना भरीव नुकसानभरपाई देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. उपमुख्यमंत्री […]

अधिक वाचा..

अकोल्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल? डॉ. अभय पाटील यांची एकनाथ शिंदेंशी भेट चर्चेत

अकोला : राजकारणात एखादी भेट औपचारिक असू शकते; मात्र भेटीची वेळ आणि त्यामागची राजकीय पार्श्वभूमी महत्त्वाची असेल, तर त्यावर चर्चा होणे स्वाभाविक आहे. अकोल्यातील वैद्यकीय तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि २०२४च्या लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांनी मुंबईतील ‘नंदनवन’ येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली सदिच्छा भेट सध्या अकोल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली […]

अधिक वाचा..

आरोग्यसेवा हीच ईश्वरसेवा; महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार उपचार पोहोचवणार; एकनाथ शिंदे

मुंबई: “हे सरकार केवळ आदेश देणारे नाही, तर जनतेच्या दारात जाऊन प्रश्न सोडवणारे सरकार आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती आणि आरोग्यसेवा हीच ईश्वरसेवा मानून महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार उपचार पोहोचवत आहोत,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आरोग्य विभागाच्या वतीने राज्यभरातील १२४ नवीन आरोग्य संस्था, रुग्णालये आणि उन्नतीकरण झालेल्या आरोग्य सुविधांचे ऑनलाईन […]

अधिक वाचा..

रामदास आठवले सामाजिक न्यायाची मशाल; एकनाथ शिंदेंकडून तोंडभरून कौतुक

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या दशकपूर्ती सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दहा वर्षांच्या कार्याचा गौरव केला. आठवले यांना “सामाजिक न्यायाची मशाल, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बाबासाहेबांच्या विचारांचे सच्चे अनुयायी आणि नीडर मास लीडर” अशा शब्दांत शिंदे यांनी गौरविले. राज्यातील १३ कोटी जनता तसेच शिवसेना परिवाराच्या वतीने त्यांनी आठवले यांना […]

अधिक वाचा..

लाल किल्ल्यावरून मोदींचा ‘वंदे मातरम्’चा जयघोष; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना थेट सल्ला

मुंबई : स्वातंत्र्यलढ्यात असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी ‘वंदे मातरम्’चा जयघोष करत देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. याच ऐतिहासिक ‘वंदे मातरम्’चा जयघोष यंदाच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून करणार आहेत. हा क्षण संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक आणि अभिमानास्पद असेल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मुंबईत पार पडलेल्या **‘ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह २०२६’**नंतर पत्रकारांशी संवाद […]

अधिक वाचा..

मनपातील १० वर्षांहून अधिक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; सेवेत सामावून घेण्याचे एकनाथ शिंदेंचे निर्देश

ठाणे: सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना पालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. शासनाच्या नियमानुसार ही पदे भरण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव डी. गोविंदराज यांना दिल्या. सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेतील एकूण १,१९८ कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीला सांगलीचे […]

अधिक वाचा..