रामरक्षेपूर्वी स्वतःची रक्षा करा”; उबाठाच्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

राहुल गांधी, सोनिया गांधी, अखिलेश यादव यांना आधी निमंत्रण द्या; बाळासाहेबांच्या विचारांचा उल्लेख करत शिंदेंची टीका मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठाच्या ‘रामरक्षा आंदोलनावर’ जोरदार टीका करत, “रामरक्षेपूर्वी स्वतःची रक्षा करा,” असा टोला लगावला. हिंदुत्व ही गरजेनुसार वापरण्याची गोष्ट नसून ती विचारसरणी असल्याचे सांगत त्यांनी उबाठाने काँग्रेससोबत युती करून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी तडजोड केल्याचा […]

अधिक वाचा..

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा पुनर्जन्म

२०१९ नंतरच्या राजकीय घडामोडींवर समर्थकांच्या दृष्टिकोनातून सविस्तर मतप्रदर्शन मुंबई: राष्ट्रीय सह समन्वयक व प्रसार माध्यम समन्वयक (शिवसेना) दिनेश शिंदे यांनी “ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेला शिवसेनेचा पुनर्जन्म” या शीर्षकाचा सविस्तर मतलेख प्रसिद्ध केला आहे. या लेखात त्यांनी २०१९ नंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, शिवसेनेतील फूट आणि त्यानंतर झालेल्या पक्षाच्या पुनर्बांधणीबाबत आपली भूमिका मांडली आहे. मतलेखात […]

अधिक वाचा..

‘ईशान सेतू’ने महाराष्ट्र-ईशान्य भारत जोडला; मणिपूरमध्ये सिद्धिविनायकाची प्रतिकृती उभारणार; एकनाथ शिंदे

ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची घोषणा मुंबई: महाराष्ट्र सदनात आयोजित ‘ईशान सेतू – सांस्कृतिक एकात्मता व राष्ट्रनिर्माण’ सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ईशान्य भारताशी सांस्कृतिक आणि भावनिक नाते अधिक दृढ करण्याचा निर्धार व्यक्त केला. या वेळी त्यांनी मणिपूरमध्ये मुंबईच्या श्री सिद्धिविनायक मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्याची […]

अधिक वाचा..

शिंदे मुख्यमंत्री होणार? चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांचा पूर्णविराम; म्हणाले…

मुंबई: राज्यातील अलीकडील राजकीय घडामोडींमुळे मुख्यमंत्रीपदाबाबत विविध चर्चा रंगू लागल्या असतानाच मुख्यमंत्री यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी बंडखोरी करून यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा सत्तासमीकरणांबाबत चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना फडणवीस म्हणाले, “ज्या राज्यात बहुमतासाठी १४७ जागांची आवश्यकता असते आणि […]

अधिक वाचा..

शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यावर महायुती सरकार ठाम; एकनाथ शिंदे

माळशिरस येथे जाहीर पक्षप्रवेश; विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचाही शिवसेनेत प्रवेश मुंबई: महायुती सरकारच्या विकासाभिमुख आणि लोकहिताच्या कामांवर विश्वास व्यक्त करत अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार ॲड. किरण सरनाईक यांनी शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षकांच्या न्याय मागण्या सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध असून उर्वरित प्रश्नांवरही लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री […]

अधिक वाचा..

संघर्षातून नेतृत्वापर्यंत! एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

सामान्य कार्यकर्त्यापासून राज्याच्या नेतृत्वापर्यंतचा प्रवास, संघटनशक्ती, निर्णयक्षमता आणि विकासाभिमुख कार्यशैलीची चर्चा मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे हे गेल्या काही वर्षांत सर्वाधिक चर्चेत राहिलेले नेते ठरले आहेत. सामान्य कार्यकर्त्यापासून राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वापर्यंतचा त्यांचा प्रवास हा संघर्ष, संघटनशक्ती, निर्णयक्षमता आणि जनसंपर्क यांच्या जोरावर घडल्याचे त्यांच्या समर्थकांचे मत आहे. तर त्यांच्या काही राजकीय निर्णयांवर विरोधकांकडून सातत्याने […]

अधिक वाचा..

टीईटी पेपरफुटीतील मुख्य सूत्रधारांवर मकोकाअंतर्गत कारवाईचा विचार; एकनाथ शिंदे

मुंबई: टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत गंभीर आणि संतापजनक असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि कठोर चौकशी केली जाईल. दोषी कोणत्याही पदावरील असो किंवा संघटित टोळीचा […]

अधिक वाचा..

अपघातग्रस्त बाईकस्वारांच्या मदतीला धावले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रायगड: छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर रायगडावरून महाडकडे परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्त बाईकस्वारांच्या मदतीसाठी तत्काळ आपला शासकीय ताफा थांबवून संवेदनशीलतेचे दर्शन घडवले. रायगड किल्ल्यावरचा कार्यक्रम आटोपल्यानंतर शिंदे महाडकडे रवाना झाले होते. महाड-पाचाड मार्गावरील निर्जन रस्त्यावर एका दुचाकीचा रस्त्याच्या कडेला साचलेल्या मातीमुळे घसरून अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. क्षणाचाही विलंब न […]

अधिक वाचा..

बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आणि जनतेशी नाळ; एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचा आढावा

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघर्षातून नेतृत्व घडवत स्वतंत्र राजकीय स्थान निर्माण केल्याची भूमिका त्यांच्या समर्थकांकडून मांडली जाते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या जनसेवेच्या कार्यपद्धतीचा वारसा पुढे नेत त्यांनी कार्यकर्ता-केंद्रित राजकारणाला प्राधान्य दिल्याचे समर्थकांचे मत आहे. मराठी अस्मिता, हिंदुत्व, राष्ट्रहित आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्याची प्रेरणा बाळासाहेब ठाकरे […]

अधिक वाचा..

जागतिक नेतृत्वाच्या शर्यतीत मोदी अव्वल; नव्या भारताच्या सामर्थ्याला जगाची मान्यता; एकनाथ शिंदे

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक राजकारण, अर्थव्यवस्था आणि सामरिक क्षेत्रात प्रभावी झेप घेतली असून, आता जगातील महासत्तांनाही भारताच्या वाढत्या प्रभावाची दखल घ्यावी लागत आहे. ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित ‘लोवी इन्स्टिट्यूट’च्या ताज्या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेतृत्वाच्या शर्यतीत अव्वल स्थान पटकावत नवा विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. […]

अधिक वाचा..