राष्ट्रीय जनता दलात मोठा भूकंप; कुटुंबात पडणार मोठी फूट

बिहार: महाराष्ट्राच्या दोन वर्षांपूर्वी मोठा भूकंप झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. या फूटीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथीही घडल्या. यानंतर देशाच्या राजकारणात आणखी एक मोठी घडामोड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव (१८ जुलै) त्यांच्या नवीन पक्षाची घोषणा करू शकतात. ते […]

अधिक वाचा..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून संजय देशमुख यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे जनसंपर्क अधिकारी दिवंगत संजय देशमुख यांच्या कुटुंबीयांची वरळी येथील ‘दर्शना’ या शासकीय निवासस्थानी सांत्वनपर भेट घेत त्यांना धीर दिला. शनिवारी (दि. १२ जुलै) संजय देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. दहा वर्षांहून अधिक काळ त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांच्या निधनाने एक कर्तव्यनिष्ठ, […]

अधिक वाचा..

लैंगिक अत्याचार सहन केला जाणार नाही; पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे

सांगलीतील अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची गंभीर दखल सांगली: करगणी (ता. आटपाडी, जि. सांगली) येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील सामूहिक लैंगिक अत्याचाराच्या संतापजनक घटनेनंतर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून कठोर कारवाईची मागणी केली. अत्याचारानंतर मानसिक व सामाजिक दबावामुळे पीडित मुलीने आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर […]

अधिक वाचा..

सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेस प्रयत्न करणार

परभणीतील सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांना बडतर्फ कधी करणार मुंबई: परभणीतील आंबेडकरी विचारांचा सुशिक्षित तरुण सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू पोलीसांच्या मारहाणीमुळे झाला असताना त्याची आकस्कित मृत्यू अशी नोंद करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. हा मृत्यू कोठडीत असताना पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला असा शवविच्छेदन अहवाल असतानाही सरकारने ते गांभिर्याने घेतले नाही. आता न्यायदंडाधिकारी यांच्या अहवालातही सोमनाथ सुर्यंवंशी […]

अधिक वाचा..

बाळासाहेब थोरात यांनी बीडच्या मस्साजोग येथे घेतली स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट

संतोष देशमुखच्या मारेक-यांना व सुत्रधारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे मुंबई: बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या ही संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. या हत्याकांडातील आरोपी आणि सुत्रधारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी मंत्री बाळासाहेब थोरात केली […]

अधिक वाचा..

शिक्रापुरातील कुटुंब मनालीला तर चोरट्यांचा घरावर डल्ला

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण रोडलगत असलेले कुटुंब कुलूमनाली शिमला येथे फिरायला गेलेले असताना चोरट्यांनी बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून बंगल्यातील सोन्या चांदीचे दागिन्यांसह रोख रक्कम असा साडे आठ लाखांचा ऐवज चोरून नेला असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे 4 अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील येथील सुभाष धुमाळ […]

अधिक वाचा..

कासारीतील कुटुंब लग्नाला तर चोरट्यांचा घरात डल्ला

दरवाजाचे कुलूप तोडून लांबवला तब्बल चार लाखांचा ऐवज शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) येथील कुटुंब शेजारील मुलीच्या लग्नासाठी कोरेगाव भीमा येथे गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून तब्बल 4 लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कासारी (ता. शिरुर) अमित सातपुते […]

अधिक वाचा..

विठ्ठलवाडीत शेतातील पिके नांगरुन कुटुंबाला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथे शेताच्या वादातून शेतकऱ्याच्या शेतातील पिकांसह जनावरांचा चारा 3 ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरून नुकसान करत शेतकऱ्यासह त्याच्या कुटुंबियांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे योगेश पांडुरंग गवारी, दिपक दत्तात्रय गवारी, महेश दत्तात्रय गवारी, संभाजी पांडुरंग गवारी, भूषण गुरुनाथ गवारी, गुरुनाथ केरबा गवारी यांच्या विरुद्ध […]

अधिक वाचा..

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना आलेल्या धमकीप्रकरणाची कारवाई तीव्रतेने करावी

मुंबई: आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना धमकी प्रकरणाचा मुद्दा विशेष बाब अंतर्गत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परिषद सभागृहात उपस्थित करत याप्रकरणाची कारवाई तीव्रतेने करावी, अशी मागणी केली. या प्रकरणात धमकी देणाऱ्या पालिकेतील अधिकाऱ्यास मुख्यमंत्री यांचे सुरक्षा कवच आहे. ही बाब योग्य नाही. संबंधित त्या अधिकाराच्या मालमत्तेची चौकशी करावी अशी मागणी देखील दानवे यांनी सभागृहात […]

अधिक वाचा..

मयत पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत देण्याची घोषणा…

मयत वारिसे यांच्या मुलाला कायम स्वरूपाची नोकरी देण्याची जबाबदारीही स्वीकारली रत्नागिरी: पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबातील त्यांचा एक मुलगा आणि आजी यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी पत्रकार संघटनांकडून संपूर्ण महाराष्ट्रातून करण्यात येत होती. आज रत्नागिरीत रोजगार महामेळाव्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत येथील पत्रकारांनीही पत्रकार वारिसे यांच्या […]

अधिक वाचा..