Video; शेतात जायला रस्ताच नसल्याने पाच एकर द्राक्षबाग तोडण्याचा शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय

शिरुर (तेजस फडके) निजाम आणि इंग्रज काळापासुन अस्तित्वात असलेला ३३ फूट रुंदीचा दोन गावांना जोडणारा सार्वजनिक शिवरस्ता आज अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असुन त्याचा फटका थेट शेतकऱ्यांच्या उपजीविकेला बसू लागला आहे. या रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने शेतीच्या मालकी हक्काचा पुरेपूर उपयोग न करता आल्याने एका शेतकऱ्याने अखेर वैतागून आपली पाच एकर द्राक्ष बागा तोडून टाकण्याचा टोकाचा निर्णय […]

अधिक वाचा..
crime

शेतकऱ्याच्या कांद्याच्या वखारीला लावली आग; अडीचशे पिशव्यांचे नुकसान…

मंचर (कैलास गायकवाड): खडकवाडी (ता. आंबेगाव) येथील धुमाळस्थळ वस्तीमध्ये संदीप बबन धुमाळ (रा. धुमाळ स्थळ) या शेतकऱ्याच्या तात्पुरत्या लाकूड आणि बाजरीच्या सरमाडाने केलेल्या कांदा वखारीला अज्ञात व्यक्तीने आग लावून दिल्याने सुमारे अडीचशे पिशव्या कांद्याचे नुकसान झाले आहे. सध्याच्या चालू असलेल्या बाजारभावाप्रमाणे अंदाजे दोन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. अडीचशे पिशवी कांदा आगी पासून वाचण्यात यश […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात दुचाकी-चारचाकी अपघातात ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

श्रीगोंदा येथील चालकाविरुद्ध गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील तांदळी गावच्या हद्दीत कळसकरवाडी येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात एका ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात 1 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडला असून, श्रीगोंदा येथील आरोपी चालकाविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत व्यक्ती दिलीप दगडू शिंदे […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात वृद्ध शेतकऱ्याला कुदळीच्या दांडक्याने मारहाण करत तलवारीने कापून टाकण्याची धमकी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील चांडोह येथील पानमंद मळा परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्यावर टाकलेल्या लाकडांच्या वादातून एका ६५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्यावर दोन शेजाऱ्यांनी हात उठवला. इतकेच नव्हे, तर डोक्यात कुदळीच्या लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे. फिर्यादी केरभाऊ गेणभाऊ पानमंद (वय ६५) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दिलेल्या […]

अधिक वाचा..

कांद्याच्या आरणीवरून वाद विकोपाला; एका शेतकऱ्यावर सात जणांचा हल्ला

शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील इचकेवाडीमध्ये शेतजमिनीच्या वादातून एका शेतकऱ्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर शेजारील सात जणांनी हल्ला केल्याची गंभीर घटना 18 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11.45 वाजता घडली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गु. र. नं. 259/2025 अन्वये गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी बाबुराव […]

अधिक वाचा..
bhimashankar-sugar-factory

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याविषयी शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी…

शिरूर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पश्चिम पट्यातील काही गावात कुकडी, चासकमान आणि घोडनदीच्या पाण्यामुळे लाखो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आल्यामुळे अनेक शेतकरी उसाची लागवड करतात. परंतु यावर्षी भीमाशंकर सहकारी साखर कारखानाच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून ऊस वावरात वाळत चालला आहे. कारखाना ऊस नेत नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने खाजगी कारखान्याला घालावा लागत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या […]

अधिक वाचा..
shirur-tehsildar

शिरूर तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी तब्बल १२९ रस्ते केले खुले…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा अडचणी समजून घेत या शेत रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देत नवीन रस्ते, रस्ते खुले करणे, पानंद रस्ते, शिव रस्ते असे एकूण तब्बल १२९ रस्ते शिरूर तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी आजपर्यंत खुले केले आहेत. शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून त्यांचे आभार मानण्यात येत आहे. शिरुर तालुक्यातील बऱ्यापैकी लोकसंख्या ही शेती क्षेत्रावर अवलंबून […]

अधिक वाचा..

एक रुपयात पीक विमा देऊन सरकार शेतकऱ्यांवर उपकार करते काय

मुंबई: भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार हे शेतकरी विरोधी आहे हे वारंवार उघड झाले आहे. शेतकऱ्याला अतिरेकी, नक्षलवादी, आंदोलनजीवी म्हणून त्यांचा अपमान केला आता राज्यातील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना भिकारी म्हणून अकलेचे तारे तोडले आहेत. कोकाटे यांचे शेतकऱ्यांबद्दलचे विधान सत्तेचा माज आल्याचे दर्शवते. शेतकरी भिकारी नाही तर शेतक-यांसह सर्वसामान्य जनतेला जीएसटीच्या माध्यमातून लुटणारे […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या नावावर कृषी विभागाने खिसे भरले, नॅनो युरीया व नॅनो डीएपी खरेदीत कोट्यावधीचा भ्रष्टाचार

मुंबई: देशातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत असताना भाजपा युतीचे सरकार मात्र त्याकडे गांभिर्याने पहात नाही. शेतकऱ्यांना भरघोस निधी दिल्याच्या घोषणा करून फक्त जाहिरातबाजी करण्यात आली. सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या निधीवर मात्र कृषी विभागातील अधिकारी व मंत्री संगनमताने खिसे भरत राहिले. शेतकऱ्यांच्या नावावर कृषी विभागाने नॅनो युरीया व नॅनो डीएपी च्या १५८ कोटींचा खरेदीत […]

अधिक वाचा..

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची भाजपा सरकारकडून फसवणूक

शेतकऱ्यांकडे अजून लाखो क्विंटल सोयाबीन पडून, सर्व सोयाबन खरेदी होईपर्यंत केंद्रे सुरु ठेवा मुंबई: राज्यातील विशेषकरून विदर्भ व मराठवाड्यातील सोयाबीन शेतकऱ्यांकडे अद्याप लाखो क्विंटल सोयाबीन पडून आहे. ६ फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन खरेदी केंद्र सुरु ठेवण्यात येणार आहेत. परंतु या कालावधीत शेतकऱ्यांकडील सर्व सोयाबीन खरेदी होणार नाही, राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांकडून सर्व सोयाबीन खरेदी करेपर्यंत ही […]

अधिक वाचा..