dalimb-tree

शिरूर तालुक्यात समाजकंटकाने शेतकऱ्यांची डाळिंबाची तब्बल १३०० झाडे तोडली…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : जांबुत-शरदवाडी (ता. शिरूर ) येथे अज्ञात समाजकंटकाकडून सुमारे तीन एकर क्षेत्रावरील डाळिंब बागेच्या शेतातील सुमारे १ हजार ३०० झाडे तोडून नासधूस करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत परिसरातील शेतकऱ्यानी संताप व्यक्त केला असून अशा प्रकारे नुकसान करणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जांबुत, शरदवाडी परिसरातील शेतकरी […]

अधिक वाचा..
pune-nagar-highway

छत्रपती संभाजीनगर ते पुणे नव्या महामार्गाचा मॅप व्हायरल…

शिरूर : छत्रपती संभाजीनगर ते पुणे या नव्या महामार्गाचा मॅप प्रसिद्ध होण्याआधीच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे महामार्ग ज्या भागातून जात आहे त्या भागातील जमीन खरेदी करण्यासाठी पुणे मुंबईतील व्यावसायिक आणि शहरातील बड्या श्रीमंतांची लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतातून महामार्ग जात असल्याची कसलीच माहिती नाही. तर आपल्या शेतीला काही पट भाव […]

अधिक वाचा..
Onion

शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत तलाठ्याची आरेरावीची भाषा; आत्ता जाग आली का…

शिरूर : राज्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसान पंचनामा आणि ऑनलाइन पीक पाहणी करण्यासाठी तलाठी गावात येण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. संबंधित तलाठी गावात न येता उलट मोबाईलवरून शेतकऱ्यांशी आरेरावीच्या भाषेत बोलत असल्याची तक्रार वाघाळे (ता. शिरूर) गावातील ग्रामस्थांनी केली आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की, ‘पावसामुळे आमचे पीक वाया गेले, […]

अधिक वाचा..
shirur-rain

शिरूर तालुक्यात सोळा तास उलटूनही पावसाचा कहर कायम; पिकं पाण्याखाली…

शिरूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यात गेल्या सोळा तासांपासून मुसळधार पावसाचा कहर कायम असून, शेतकऱ्यांच्या डोळ्यातील मेहनतीचे स्वप्न अक्षरशः पाण्यात वाहून गेले आहे. रविवारी (ता. १४) रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचून कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. याचबरोबर बाजरी, मका, पाले भाज्या, फळबागा, नवीन ऊस लागवड या पिकांनाही मोठा फटका बसला आहे. कांद्याची […]

अधिक वाचा..

संततधार पावसामुळे शिरूर, शिक्रापूर महावितरणकडून शेतकरी व वीजग्राहकांना काळजी घेण्याचे आवाहन

शिरूर (अरुणकुमार मोटे): गेल्या काही दिवसांपासून शिरूर तालुक्यात संततधार पावसाचा जोर कायम आहे. यामुळे शेतामध्ये व रस्त्यांवर लघुदाब व उच्चदाब वीज वाहिनीच्या तारा तुटून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच झाडे पडून वीज वाहिन्यांवर येण्याचेही प्रमाण वाढले आहे. या परिस्थितीत शेतकरी व नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. शिरूर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता […]

अधिक वाचा..

सर्व शेतकऱ्यांसाठी अतिमहत्वाची सरकारी सूचना; फार्मर नसल्यास ‘या’ योजनांचा लाभ मिळणार नाही

आपल्या 7/12 वर नाव आहे का मग ताबडतोब जवळच्या सीएससी केंद्रावर जा आणि तुमचा फार्मर आय.डी.काढून घ्या.ह फक्त एक ओळखपत्र नाही – तर शेतकऱ्यांसाठी शेकडो सरकारी योजनांचे प्रवेशद्वार आहे! हे कागदपत्रे लागणार आधारकार्ड (लिंक केलेला मोबाईल नंबर आवश्यक) 7/12 किंवा 8 अ उतारा आधारकार्डला जोडलेला मोबाईल नंबर (OTP साठी) फार्मर आय.डी. म्हणजे काय ज्याप्रमाणे आधारकार्ड […]

अधिक वाचा..

देशाला दिशा देण्याचे काम करणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कमिटी का बसवता? याच अधिवेशनात सरसकट कर्जमाफी करा मुंबई: राज्यात शेतकऱ्यांच्या, तरुणाईच्या, बेरोजगारांच्या, कामगारांच्या आत्महत्या होत आहेत. निरपराध नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. शेतकऱ्यांची व्यथा भयावह आहे. आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती आज बळीराजाची आहे. राहुलजी गांधी यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत चिंता व्यक्त केली त्यावर भाजपच्या नेते कर्नाटक आणि बाकीच्या राज्यात बघा, महाराष्ट्र चांगला आहे,” […]

अधिक वाचा..

शक्तिपीठ महामार्गाच्या प्रकल्पासाठी पैसे दिले जातात मग शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नाही का

मुंबई: राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहे. दररोज शेतकरी आत्महत्या होत आहे. राज्यात यावर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या.यातील २०० प्रकरणे अपात्र ठरली असून १९४ प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे. एकीकडे शेतकरी आत्महत्या होतात त्यांना मदती ही सरकार देत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव दिला होता. […]

अधिक वाचा..

शेतकरी कर्जमाफी व लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा

मुंबई: शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्याची आज गरज असताना भाजपा युती सरकार जाणूनबूजून टाळाटाळ करत आहे. अवकाळी पावसाने शेतकरी संकटात सापडलेला आहे, शेतमालाला हमीभाव नाही. जगाच्या पोशिंद्याचे कंबरडे मोडले असताना सरकार शेतकरी कर्जमाफी देत नाही. निवडणुकीवेळी कर्जमाफीचे आश्वासन देऊन मते घेतली व सत्ता मिळवली आणि आता कर्जमाफीबद्ल आम्ही बोललोच नाही, असे सत्ताधारी निर्लज्जपणे सांगत आहेत. शेतकरी […]

अधिक वाचा..