देशाच्या विकासात कामगार व शेतकऱ्यांचे सर्वात मोठे योगदान…

काँग्रेसकडून कामगार हिताचे रक्षण पण कामगारांना उध्वस्त करण्याचा भाजपाचा डाव मुंबई: कामगार व शेतकरी ही मोठी शक्ती असून काँग्रेस सरकारने त्यांच्या हिताचे नेहमीच रक्षण केले आहे. स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरु यांच्यापासून डॉ. मनमोहनसिंह यांच्या सरकारपर्यंत काँग्रेसने कामगार हिताचे विविध कायदे केले व त्यांना त्यांचे हक्क दिले. कामगार व शेतकरी या दोन घटकांचे देशाच्या विकासात सर्वात मोठे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक

शिक्रापूर (शेरखान शेख): निर्वी (ता. शिरुर) येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस खरेदी करुन शेतकऱ्याच्या उसाचे तब्बल 12 लाख 25 हजार रुपये शेतकऱ्यांना न देता फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे आशिष शांताराम साठे व नवनाथ सुभाष झेंडे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. निर्वी (ता. शिरुर) येथील चंद्रकांत सोनवणे यांच्या […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांची वीज तोडणी बंद करा… घरगुती गॅस दरवाढ करणार्‍या सरकारचा धिक्कार असो

वीज आणि गॅस दरवाढीविरोधात महाविकास आघाडीचे आमदार तिसऱ्या दिवशी आक्रमक… मुंबई: शेतकऱ्यांची वीज तोडणी बंद करा… घरगुती गॅस दरवाढ करणार्‍या सरकारचा धिक्कार असो… शेतकरीद्रोही सरकारचा निषेध असो… शेतकऱ्यांची वीज तोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… शेतकऱ्यांना १२ तास वीज द्या नाहीतर खुर्च्या खाली करा… वीजेवाचून पंप नाही पंपावाचून पीक नाही,पिकावाचून मरतोय शेतकरी ,सरकारला देणं घेणं नाही… शेतकऱ्यांना […]

अधिक वाचा..

आंदोलक शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनेच्या नेत्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलीसांवर कारवाई करा…

मुंबई: सोयाबीन व कापसाला दरवाढ मिळावी, यासह शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला होता. शांततेने, अहिंसक मार्गाने सुरु असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला. आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर आणि आदेश देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करत विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते अजित […]

अधिक वाचा..

देशातील शेती व शेतकरी उद्ध्वस्त करण्याचे काम भाजपा सरकारने केले…

नक्षलवादी, दहशतवादी, आंदोलजीवी संबोधून भाजापाकडून शेतकऱ्यांचा अपमान रायपूर: केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. भाजपाची धोरणे शेतकरी विरोधी असून कृषी साहित्य, खते महाग झाली आहेत तर शेतमालाला हमी भाव मिळत नाही. शेती करणे परवडत नसल्याने शेतकरी आतमहत्या वाढल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सरकारमुळे शेतीची अवस्था दयनीय झाली असून देशातील अन्नदात्याला […]

अधिक वाचा..

साप हा शेतकऱ्यांचा मित्र; शेरखान शेख

वढू बुद्रुकच्या विद्यालयात सापांबाबत जनजागृती शिक्रापूर (शेरखान शेख): साप हा शेतातील उंदीर, बेडूक नाहीसे करत असल्याने सापामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे रक्षण होत असते त्यामुळे साप हा शेतकऱ्यांसह मानवाचा मित्र असल्याचे प्रतिपादन निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेरखान शेख यांनी केले आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय येथे आयोजित साप समज […]

अधिक वाचा..

भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कांदा रस्त्यावर फेकण्याची शेतकऱ्यांवर वेळ…

कांद्याला एक रुपया भाव ही शेतकऱ्याची क्रूर थट्टा… मुंबई: भारतीय जनता पक्ष शेतकरीविरोधी असून केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी उद्ध्वस्थ झाला आहे. कापूस, सोयाबीनला भाव नाही तसेच कांद्याचे भावही घसरले आहे. कांदा काढणीच्या खर्चाएवढाही भाव बाजारात नसल्याने हजारो शेतकरी कांदा शेतातच कुजवत आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्याला आधार देण्यासाठी कांद्याची निर्यातबंदी उठवावी, कांद्याला […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अज्ञात व्यक्तीने गव्हाच्या पेंढया पेटवून केले शेतकऱ्याचे नुकसान…

शिरुर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरूर) येथील शेतकरी दत्तात्रय आप्पा पोखरकर यांनी त्यांच्या शेतातील कापणीला आलेले गव्हाचे पिक कापून मळणी करण्यासाठी गव्हाचे पेंढे एका जागेवर ठेवले होते. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याला आग लावून शेतकऱ्याचे 60 हजार रूपयांचे आर्थिक नुकसान केले आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. १९) फेबुवारी रोजी रात्री ११.३० वाजल्याच्या सुमारास […]

अधिक वाचा..

धारीवाल वीज प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांना न्याय देणार

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील धारीवाल वीज प्रकल्पामुळे बाधित शेतकऱ्यांना न्याय देणार असल्याची आग्रही भूमिका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतली. धारीवाल वीज प्रकल्पाने वीज निर्मितीसाठी आवश्यक पाणीसाठयासाठी एकच तळे बांधून साठवणूक केली. त्यामुळे जिल्ह्यातील येरुर व सोनेगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या पाणी साठा तळ्याची दानवे यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील त्या शेतकऱ्यांचा विद्युत वितरणवर मोर्चा

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) सह परिसरात विद्युत वितरणच्या अधिकाऱ्यांनी कृषी पंपाच्या वीज बिल वसुलीसाठी वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु केल्याने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जात असून काही ठिकाणी विद्युत रोहित्रच बंद केले जात असल्याने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी विद्युत वितरण कार्यालयावर मोर्चा काढून विद्युत वितरण विभागाचा निषेध नोंदवला आहे. तळेगाव ढमढेरे (ता. […]

अधिक वाचा..