विरोधकांचे आरोप निराधार; शेतकरीहितासाठी राज्य-केंद्राचे ठोस पाऊल; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि पूरामुळे महाराष्ट्रातील २९ जिल्हे व २५३ तालुक्यांतील तब्बल ६८ लाख ६९ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांचे पिकाशी असलेले नाते हे पोटच्या लेकरासारखे असते. मात्र या आपत्तीमुळे जमीन खरडून गेली, पुन्हा पेरणी करण्याची स्थितीच उरली नाही आणि शेतकरी आर्थिक व मानसिकदृष्ट्या उध्वस्त झाले. या गंभीर परिस्थितीची दखल घेत […]

अधिक वाचा..

पूरग्रस्तांचे पुनर्वसन व शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध; डॉ. नीलम गोऱ्हे

तुळजापूर: नवरात्र उत्सवानिमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी धाराशिव, सोलापूर आणि बीड जिल्ह्यांतील पूरस्थितीमुळे प्रभावित झालेल्या नागरिकांचे दुःख हलके व्हावे, त्यांचे प्रश्न त्वरित मार्गी लागावेत आणि योग्य पुनर्वसन व्हावे यासाठी त्यांनी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना केली. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “महाराष्ट्रातील लेकरं सुरक्षित राहावीत, त्यांना योग्य शिक्षण मिळावे, शेतकऱ्यांना […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा

मुंबई: महाराष्ट्रातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेला आहे. मे महिन्यापासून सातत्याने पडत असलेल्या पावसाने खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांना पूर्णपणे उद्ध्वस्थ केले आहे. शेतकरी संकटात असताना भाजपा युतीचे सरकार मात्र फक्त घोषणाबाजी करत आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फोटो काढून परतले पण मदतीची घोषणा केली नाही. […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या शिवारात उभे असलेले सोनेरी पीक काही क्षणांत नष्ट

सोलापूर: शेतकऱ्यांच्या शिवारात उभे असलेले सोनेरी पीक काही क्षणांत नष्ट झाले. शेतकरी डोळ्यांत अश्रू घेऊन आपला संसार उद्ध्वस्त होताना बघत आहे. शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या प्रक्रियेत अडकवून अधिक मानसिक छळ देण्यापेक्षा सरसकट नुकसानभरपाई देणे हाच योग्य मार्ग आहे. त्यामुळे एकरी किमान ₹५०,००० इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ […]

अधिक वाचा..

पैशाचे सोंग आणता येत नाही, मग शेतकऱ्यांना आत्महत्या सरकार करून देणार का?

नागपूर: मराठवाड्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी करण्यात येते आहे अस असताना अर्थमंत्री अजित पवार भडकले म्हणाले पैशाचे सोंग आणता येत नाही, तिजोरीची अवस्था आहे म्हणून शेतकरी आत्महत्या करू देणार का सरकार असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवर यांनी उपस्थित केला. मराठवाडा येथील अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री […]

अधिक वाचा..

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या, शेतकरी कर्जमाफीचे काय झाले

मुंबई: राज्यात यावर्षी सरसरीपेक्षा दुप्पट, तिप्पट पाऊस पडला आहे. ३६ जिल्हे व ३५८ तालुक्यापैकी ३० जिल्हे व जवळपास ३०० तालुके अतिवृष्टी आणि पूरग्रस्त आहेत. राज्यभरात जवळपास १४३ लाख हेक्टरवरील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पाऊस सातत्याने पडत असून शेतकरी हवालदिल झाला आहे परंतु राज्यातील महायुती सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही, पालकमंत्र्याने पाहणी सुद्धा केली नाही. मंत्रिमंडळात […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी

मुंबई: राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने तब्बल ३० जिल्ह्यात नुकसान झाले आहे. राज्यातील १७ लाख ८५ हजार ७१४ हेक्टर इतके क्षेत्र या पावसाने बाधित झाले आहे. आधीच शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही त्यात शेतातील पीक देखील हातातून गेले आहे. त्यामुळे बळीराजा अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी काँग्रेस […]

अधिक वाचा..

शेतकरी अस्मानी संकटात असताना महाराष्ट्राचे सुलतान मात्र गप्प

अतिवृष्टीमुळे उद्धवस्त शेतक-यांना रब्बी हंगामासाठी बियाणे व खते मोफत पुरवा मुंबई: राज्यात परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला असून शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे. राज्यभरातील जवळपास सर्वच भागातीलं पिकं वाया गेली आहेत, हा खरीप हंगामच वाया गेला आहे, शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्याच्याकडे पाहण्यास महायुती सरकारला वेळ नाही. शेतकरी एवढ्या प्रचंड संकटात महाराष्ट्राचे सुलतान देवेंद्र फडणवीस किंवा […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील त्या गावातील तहसिलदारांनी शेतकऱ्यांना दिलेला रस्ता नांगरला 

शिरूर (अरुणकुमार मोटे): उरळगाव (ता. शिरूर) येथील बेंद्रे वस्तीतील यादव कुटुंबीयांचा सातबारा व फेरफारवर नोंद असलेला पुर्वापार वहीवाटीचा रस्ता ट्रक्टरने नांगरून उखडून टाकण्यात आला असून यादव कुटुबियांना घरी जाण्यासाठीही रस्ता उपलब्ध नाही. या रस्त्यावरून वाद होत असल्यामुळे यादव कुटुंबाने तहसिलदार शिरूर यांच्याकडे दाद मागितली होती. तहसिलदार शिरूर यांनी सातबारा उताऱ्यावरील रस्त्याच्या नोंदीप्रमाणे सर्वांना समाईक रस्ता […]

अधिक वाचा..

Video; शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; एकीकडे बिबटया तर दुसरीकडे केबल चोरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले असुन रात्रीच्या वेळी शेतात पाणी देणे म्हणजे जीव मुठीत धरुन जाण्यासारखे झाले आहे. एका बाजूला बिबट्याचा धोका तर दुसऱ्या बाजूला चोरट्यांचा सुळसुळाट या दुहेरी संकटामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. एकीकडे बिबट्याच्या भीतीमुळे शेतकरी रात्री शेतात जाण्याचे टाळतात. तर दुसरीकडे याचाच फायदा घेत चोरटे बोरवेल व […]

अधिक वाचा..