दागिने हिसकावण्याच्या घटना वाढल्या; महिलांमध्ये भीतीचे वातावरण

सांगली: सांगली शहरासह उपनगरांत घराच्या दरवाजावर थाप मारून किंवा बेल वाजवून दार उघडताच महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढण्याच्या घटना वाढल्या आहेत. सकाळी–सायंकाळी फिरायला बाहेर पडलेल्या महिलांनाही लक्ष्य केले जात आहे. ग्रामीण भागातही अशा प्रकारच्या चोरींची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंता आहे. दार उघडण्यापूर्वी खात्री करा बेल वाजल्यानंतर बाहेर कोण आहे, व्यक्ती ओळखीची आहे का, […]

अधिक वाचा..

भारत-अमेरिका व्यापार करारावरून देशात खळबळ; शेतकऱ्यांमध्ये भीती, सरकारकडून अद्याप तपशील गोपनीय

मुंबई: भारत-अमेरिका व्यापार कराराची घोषणा झाल्यानंतर देशभरात राजकीय आणि आर्थिक चर्चांना उधाण आले आहे. केंद्र सरकारने या कराराला ‘ऐतिहासिक’ आणि ‘रणनीतिक’ असे संबोधले असले, तरी कराराचा अधिकृत मजकूर अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. संसदेला विश्वासात न घेता आणि शेतकरी संघटनांशी सखोल चर्चा न करता करण्यात आलेल्या घोषणेमुळे ग्रामीण भागात संभ्रमाचे वातावरण आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald […]

अधिक वाचा..

भक्तीस्थळावर भीषण रहस्य! मायंबा गडावर दोन मृतदेह सापडल्याने भीतीचे वातावरण

बीड: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील प्रसिद्ध मच्छिंद्रनाथ देवस्थान (मायंबा) परिसरात गुरुवारी सकाळी धक्कादायक घटना उघडकीस आली. गडावरील खोल व दुर्गम दरीमध्ये दोन पुरुषांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. यातील एका मृताचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला असून, दुसरा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला. गड परिसरात काही स्थानिक नागरिक सरपण […]

अधिक वाचा..

पॉलिटिकल कनेक्शनमुळे आरोपी मोकाट! सत्ताधारी पक्षाचा वरदहस्त म्हणून कायद्याचा धाक संपला का

मुंबई उच्च न्यायालयाचा पुणे पोलिसांवर संताप; शिंदे गटाच्या नेत्याच्या कुटुंबाचा अटकपूर्व जामीन फेटाळला पुणे: “सत्ताधारी पक्षाशी संबंध असल्यामुळे आरोपींना कायद्याची भीती उरलेली नाही का?” असा संतप्त सवाल करत मुंबई उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खेड येथील शिवसेना (शिंदे गट) नेते अनिल लोखंडे आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अटकपूर्व जामीन फेटाळताना न्यायालयाने अत्यंत […]

अधिक वाचा..

बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तत्वाने चालणाऱ्या पक्षात आहेत. त्यांच्या केसालाही हात लावण्याची धमक नथुराम गोडसेच्या औलादीमध्ये नाही, असे स्पष्ट करत ‘गरजनेवाले बादल बरसते नही’, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी मंत्री ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी देण्याच्या […]

अधिक वाचा..

संभाजीनगर मोंढ्यात अतिक्रमणाची कारवाई, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महापालिकेने शहराच्या विकास आराखड्यानुसार रस्ते रुंदीकरण व सर्व्हिस रोडसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत जुन्या मोंढा भागात महापालिकेने पाडापाडीच्या नोटिसा देण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. कोणाला मिळाल्या नोटिसा अनेक व्यापाऱ्यांना अनधिकृत वाढीव बांधकाम असल्यामुळे नोटिसा काही इमारतींना धोकादायक घोषित करून कारवाईचा इशारा सुमारे ५० […]

अधिक वाचा..

देशात दडपशाहीचे राज्य, संविधान व अल्पसंख्यांकांना संपवण्याचे प्रयत्न, सर्व समाज भितीच्या सावटाखाली

आम्ही भारत जोडोवाले, कुटुंब फोडणारे नाही. राज व उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच पुणे: देशात लोकशाही व संविधानाला धाब्यावर बसवून राज्य कारभार सुरु आहे. आज सर्व समाज घटक दबावाखाली, भितीखाली जगत आहे. सत्तेतील लोक घाबरवण्याचे काम करत आहेत. याला न डगमगता एकता व अखंडतेची मशाल हाती घेऊन पुढे जाऊ आणि विरोधी पक्षनेते राहुल […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात कोयत्याचा धाक दाखवत मागितली खंडणी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे येथे एका युवकाला कोयत्याचा धाक दाखवून गावामध्ये सुखरुप राहण्यासाठी खंडणीची मागणी करत लोखंडी गज व काठीने मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे केतन गोरक्ष दरेकर, यश गोरक्ष दरेकर व व्यंकटेश चांदोले या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील श्रीराम मंदिर समोरून […]

अधिक वाचा..

पंतप्रधान मोदींच्या आशिर्वादानेच LIC, SBI मधील जनतेचा पैसा बुडण्याची भिती

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाने ७० वर्षात कमावलेली संपत्ती उद्योगपती मित्र अदानीला देण्याचा सपाटा लावला आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी देशातील जनतेने मोठ्या कष्टाने कमावलेला व भविष्याची तरतूद म्हणून SBI, LIC मध्ये गुंतवलेले हजारो कोटी रुपये ही अदानीच्या कंपन्याना दिले. आता हे हजारो कोटी रुपये बुडण्याची भिती निर्माण झाली आहे. तरीही केंद्र सरकार मूग […]

अधिक वाचा..

कायदा सुव्यस्थेची लक्तरे वेशीवर, कायद्याचा गुन्हेगारांना धाक नाही: अंबादास दानवे

मुंबई: राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढारलेल्या महाराष्ट्रात कायद्याचा धाक राहिला नाही. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात आणि गृहमंत्र्यांच्या नागपुरात महिला आणि सामान्य नागरिकच सुरक्षित नाहीत तर राज्यातील जनतेची काय स्थिती असेल असा रोखठोक प्रश्न करीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर हल्ला चढविला. “महाराष्ट्रात दिवसाढवळ्या अपहरण, बलात्कार, लूटमार, फसवणुकीसारख्या घटना घडत आहेत. […]

अधिक वाचा..