उपराष्ट्रपतींनी दिला तडकाफडकी राजीनामा, ‘त्या’ एका प्रस्तावामुळे सरकार चिंतेत

मुंबई: देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना रविवारी घडली. देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. ऑगस्ट 2028 पर्यंत त्यांचा कार्यकाळ असतानाही त्यांनी 21 जुलै 2025 रोजी राजीनामा सादर केला. त्यांनी आपल्या पत्रात प्रकृतीच्या कारणांचा उल्लेख केला असला, तरी हा राजीनामा काही प्रस्तावामुळे सरकारची नाराजी वाढल्याचा परिणाम आहे, अशी जोरदार चर्चा राजकीय […]

अधिक वाचा..

उद्धव ठाकरे यांच सरकार कशामुळ कोसळल; विजय वडेट्टीवार

मुंबई: एकनाथ शिंदे यांचं सरकार कशा पद्धतीने आलं याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे. हनी ट्रॅपच्या माध्यमातूनच एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं, असा खळबळजनक दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.त्यांच्या या दाव्याने राज्यात खळबळ उडाली आहे. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हनी ट्रॅपचे आरोप फेटाळून लावले, पण सरकार आणि विरोधकांकडे याविषयी […]

अधिक वाचा..

शिक्षकांसाठी सरकारकडून मोठे गिफ्ट, वेतनवाढीसाठी हिरवा कंदिल; शिक्षणमंत्र्यांची घोषणा 

मुंबई: राज्यातील खासगी विनाअनुदानित आणि अंशत: अनुदानित शाळांतील शिक्षकांना राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अखेर चांगली बातमी दिली. राज्यातील खासगी विनाअनुदानित व अंशत: अनुदानित शाळा, तुकड्या आणि त्यामध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वेतन अनुदानाच्या पुढील टप्प्यासाठी ९७०.४२ कोटी रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळाने मान्यता दिली असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिली. यासंदर्भातील […]

अधिक वाचा..

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; आता महाराष्ट्रातील ‘या’ शहराचे नाव बदलणार

मुंबई: औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि अहमदनगरचे अहिल्यानगर असे नामकरण झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील आणखी एका शहराचे नाव चेंज होणार आहे. खरंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यात यावे अशा आशयाच्या राज्य शासनाच्या प्रस्तावाला केंद्रातील सरकारकडून मंजुरी मिळाली होती. दरम्यान आज पावसाळी अधिवेशनात राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील आणखी एका मोठ्या […]

अधिक वाचा..

बोरीवली तहसिल मधील आपले सरकार सेवा केंद्र तातडीने सुरु करा

एका दाखल्यासाठी विद्यार्थ्यांना मोजावे लागतात ३ ते ४ हजार रुपये आमदार अस्लम शेख यांचा आरोप मुंबई: बोरीवली तहसिल कार्यालयातील आपले सरकार केंद्र दिड महिना बंद राहणार आहे, अशी माहिती आपल्याला मिळाली असून हे केंद्र जर एवढ्या कालावधीसाठी बंद राहिलं तर गोरगरीब विद्यार्थ्यांनी जायचं कुठे असा सवाल विचारत हे आपले सरकार सेवा केंद्र तातडीने सुरु करावे, […]

अधिक वाचा..

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई: मुंबईची लोकल म्हणजे लाखोंची लाईफलाईन. दररोज प्रवासी धक्के खात आणि प्रचंड गर्दीतून प्रवास करतात. अशा स्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र सरकारने आता सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा तास उशिरा कामावर हजर राहण्याची परवानगी दिली आहे. विधानसभेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत […]

अधिक वाचा..

फडणवीस सरकारचे जनतेला मोठे गिफ्ट, 100 युनिटच्या आतील ग्राहकांना काय दिलासा

मुंबई: एकीकडे महावितरणने वीज दर बिलात वाढ केल्याची ओरड होत असतानाच राज्य सरकारने पावसाळी अधिवेशात मोठी घोषणा केली. त्यामुळे राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. वीज दर कपातीचा मोठा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आहे. महायुती सरकारने जनतेला मोठे गिफ्ट दिले. 100 युनिट वापर असणाऱ्या ग्राहकांना याचा फायदा होईल. पुढील कित्येक वर्षे आता वीज दरात […]

अधिक वाचा..

शासन दरबारी मच्छीमार बांधवांना उद्ध्वस्त करण्याचं षड्यंत्र शिजतय का…

छत्रपती शिवाजी महाराज मंडईवर खरा अधिकार मच्छीमार बांधवांचाच मुंबई: कोळी समाज हा या मुंबईचा मुळ भूमिपुत्र असलेला समाज असताना देखील क्रॉफर्ड मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडईतून मच्छीमारांचे स्थलांतर करुन हा भूखंड विकासकाच्या घशात घातला गेला, असा आरोप करत मच्छीमार बांधवांना मुंबईतून उद्ध्वस्त करण्याचं षड्यंत्र शासन दरबारी शिजत आहे का..? असा संतप्त सवाल आमदार अस्लम […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी

मुंबई: सरकारी कर्मचाऱ्यांना 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू आहे. सातवा वेतन आयोग जानेवारी 2016 पासून लागू झाला आणि आता लवकरच आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. आतापर्यंतचा वेतन आयोगाचा इतिहास जर पाहिला तर प्रत्येक दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होतो.यामुळे नवीन आठवा वेतन आयोग एक जानेवारी 2026 पासून लागू होईल आणि 31 […]

अधिक वाचा..

अनधिकृत बांधकामांना शासन पाठीशी घालणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: मुंबईतल्या अनधिकृत बांधकामांची यादी आणि त्यांचे वर्गीकरण करण्याचे निर्देश मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना देण्यात येतील. शासन कोणत्याही अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणार नाही. जर अधिकारी अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालत असल्याचे आढळले, तर त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. याबाबत सदस्य पराग अळवणी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. […]

अधिक वाचा..