राज्य सरकार उत्तराखंडमधील पर्यटकांच्या संपर्कात; 120 पर्यटकांशी संवाद

राज्यातील 31 पर्यटकांच्या संपर्कासाठी मुख्य सचिव राजेश कुमार यांनी साधला उत्तराखंडच्या मुख्य सचिवांशी संपर्क मुंबई: उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील विविध भागात 151 पर्यटक अडकलेले असल्याची माहिती नागरिक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि संबंधित यंत्रणेकडून प्राप्त झाली आहे. त्यापैकी 120 पर्यटकांशी संपर्क झाला असून ते आयटीबीपी कॅंम्पमध्ये सुरक्षित […]

अधिक वाचा..

कबूतरखाना वादामागे भाजपा युती सरकारच, ज्वलंत प्रश्नांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न

अधिका-यांच्या पोस्टिंगवरून सरकारमध्ये गँगवार, एकाच पदावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी एकाच पदावर दोन अधिका-यांची नियुक्ती  मुंबई: मुंबईच्या दादर येथील कबुतरखान्यावरून वाद सुरु असून यात राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा हिरीरीने भाग घेताना दिसत आहेत. लोढा यांच्याकडे मुंबईत खूप मोठ्या प्रमाणात जमिनी व मोठ्या इमारतीही आहेत. तसेच सरकारने अदानीला मुंबईतील ३३ टक्के जमीन दिलेली आहे. लोढा व अदानी यांनी […]

अधिक वाचा..

सर्व शेतकऱ्यांसाठी अतिमहत्वाची सरकारी सूचना; फार्मर नसल्यास ‘या’ योजनांचा लाभ मिळणार नाही

आपल्या 7/12 वर नाव आहे का मग ताबडतोब जवळच्या सीएससी केंद्रावर जा आणि तुमचा फार्मर आय.डी.काढून घ्या.ह फक्त एक ओळखपत्र नाही – तर शेतकऱ्यांसाठी शेकडो सरकारी योजनांचे प्रवेशद्वार आहे! हे कागदपत्रे लागणार आधारकार्ड (लिंक केलेला मोबाईल नंबर आवश्यक) 7/12 किंवा 8 अ उतारा आधारकार्डला जोडलेला मोबाईल नंबर (OTP साठी) फार्मर आय.डी. म्हणजे काय ज्याप्रमाणे आधारकार्ड […]

अधिक वाचा..

राज्याचे स्टार्टअप धोरण जाहीर; फडणवीस सरकारने घेतले 7 मोठे मंत्रिमंडळ निर्णय

मुंबई: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सात मोठे निर्णय घेतले आहेत. विशेष म्हणजे राज्याचे स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यताधोरण आज 5 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर करण्यात आले असून लहान चिंचोऱ्या जमीनीसंदर्भातही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कुष्ठरोगींच्या अनुदानात वाढ ते राज्य शासनाच्या छोट्या, चिंचोळ्या आकाराच्या, बांधकामास अयोग्य, उपयुक्त आकार नसलेल्या, सुलभ पोहोच मार्ग नसलेल्या किंवा […]

अधिक वाचा..

एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 

मुंबई: चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप लवकरच एसटी महामंडळ मार्फत सुरू करण्यात येत आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते मंत्रालयातील आपल्या दालनामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या ॲग्रीगेटेड पॉलिसीच्या (समुच्चयक धोरण) आधीन राहून राज्य शासनाचे यात्री ॲप बनवण्याच्या […]

अधिक वाचा..

सरकारी जागेवरील अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय

संभाजीनगर: महसूल विभागाने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयामुळे, आता १ जानेवारी २०११ पूर्वी झालेली अतिक्रमणे नियमित केली जाणार आहेत. हा निर्णय अनेक गरजू कुटुंबांना कायमस्वरूपी घर मिळवून देणारा ठरणार आहे. या निर्णयाचा उद्देश काय आहे गावांमध्ये अनेक जुन्या रस्त्यांचा वापर बंद झाला आहे, कारण नव्या पर्यायी रस्त्यांची निर्मिती झाली आहे. बंद पडलेल्या रस्त्यांवर अनेक नागरिकांनी घरं बांधून […]

अधिक वाचा..

पाणंद आणि शेतरस्त्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय! बाजूची ६+६ फूट जागा घेऊन बनवणार १२ फूट रस्ता

संभाजीनगर: ग्रामीण भागातील शेतरस्त्यांवरून अनेकदा वाद निर्माण होतात. काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी योग्य रस्ता नसतो, तर काही वेळेस इतर शेतकऱ्यांकडून रस्त्यावर अडथळा निर्माण केला जातो. हे सर्व थांबवण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.   📅 *३ ऑगस्ट २०२५ पासून लागू होणार नवा नियम* या निर्णयानुसार, जेथे शेतरस्त्यांची गरज आहे तिथे दोन्ही बाजूंनी ६-६ फूट जागा […]

अधिक वाचा..

कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून या मंत्र्यांना पवित्र करून घ्यावे

कृषिमंत्री यांचा राजीनामा न घेणे म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रती सरकार असंवेदनशील मुंबई: राज्याचे कृषिमंत्री शेतकऱ्यांविरोधात विधान करतात, विधी मंडळात कामकाज सुरू असताना रम्मीचा गेम खेळतात आणि सरकार बेजबाबदार मंत्र्यांचा राजीनामा घेत नाही, कृषिमंत्री कोकाटे यांचा राजीनामा न घेणे म्हणजे सरकार शेतकऱ्यांच्याप्रती असंनवेदनशील असल्याचे स्पष्ट झाले, अस काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. मुंबईत पत्रकार परिषदेला संबोधित […]

अधिक वाचा..

बारमधून सरकारी कारभार! दारुचे घोट रिचवत क्लिअर केल्या सरकारी फायली

नागपूर: नागपूरच्या बिअर बारमध्ये प्रशासकीय कारभार चालत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दारुचे घोट घेत महाराष्ट्र शासनच्या फाईलींवर सह्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. बिअर बारमधले ते तिघे नेमके कोण? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. काय आहे नेमकं प्रकरण रविवारी नागपूरच्या एका बारमध्ये भर दुपारी दारूचे घोट घेत तीन व्यक्ती चक्क महाराष्ट्र शासनाच्या […]

अधिक वाचा..

सरकारी अधिकारी असलेल्या पतीच्या छळाला कंटाळून शिक्षक पत्नीने संपवलं जीवन

आकुर्ली: सरकारी अधिकारी असलेल्या पतीकडून शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून शिक्षक पत्नीने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. मुंबईत म्हाडा प्राधिकरणात पती उपनिबंधक आहे. तर महिला शिक्षिका होती. आकुर्ली इथं ही घटना घडलीय. रेणु कटरे असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे तर बापू कटरे असं उपनिबंधक अधिकाऱ्याचं नाव आहे. हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्यानं रेणू यांनी […]

अधिक वाचा..