मुंबई: तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये सरपंच किंवा ग्रामसेवक मनमानी करतोय का? मग आता चिंता करू नका. कारण केंद्र सरकारने अशा मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी एक नवी क्रांतिकारी सुविधा सुरू केली आहे.
गावागावांत सतत तक्रारी येतात की ग्रामपंचायतीत ग्रामसभा होत नाहीत, निधीचा अपव्यय होतो, नागरिकांची कामे प्रलंबित राहतात आणि आर्थिक पिळवणूक केली जाते. पण आता हे प्रकार संपणार आहेत कारण..
१५ ऑगस्टपासून सुरू झालेल्या सभासार प्रणालीमुळे
सरपंच वा ग्रामसेवक निधीचा गैरवापर करू शकणार नाहीत.
ग्रामसभा न घेता विकास अडकवू शकणार नाहीत.
प्रत्येक निर्णयाची नोंद व तपासणी थेट केंद्राकडून होणार
AI ची करडी नजर
बैठकींचे रेकॉर्डिंग
निर्णयांची नोंद
डेटा विश्लेषण
निधीचा योग्य वापर झाला का यावर लक्ष
देशातील तब्बल 2.68 लाख ग्रामपंचायतींमध्ये ही प्रणाली लागू होणार असून ज्या राज्यांत ग्रामपंचायती जास्त आहेत तिथूनच याची सुरुवात होणार
सभासार प्रणालीचे फायदे
पारदर्शक प्रशासन
लोकाभिमुख निर्णय
निधीचा योग्य वापर
नागरिकांची होणारी होरपळ थांबणार
पुढील महिन्यापासून टप्प्याटप्प्याने ही प्रणाली देशभर लागू होणार असून आता सरपंच वा ग्रामसेवकांची मनमानी थांबणार गाव विकासाच्या नव्या युगात प्रवेश करणार