गुंतवणूकदारांना राज्यात आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे विविध उपक्रम

मुंबई: देश विदेशातील गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात गुंतवणुकीकरिता आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्य शासनमार्फत आता विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. देशी-विदेशी गुंतवणुकीसाठी  गुंतवणूकदारांच्या प्रस्तावांसाठी त्यांना सल्ला व मदत देण्यासाठी “कंट्री डेस्क” या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नवीन गुंतवणूकीसाठी जागतिक व प्रादेशिक गुंतवणूक व्यापारासह सुसंगत धोरण तयार करण्यावर भर दिला जाणार […]

अधिक वाचा..

तर ‘त्या’ लाडक्या बहिणींवर गुन्हे दाखल होणार? सरकार घेणार मोठा निर्णय

महिला व बाल विकास विभागाने “लाडकी बहीण योजने”च्या लाभार्थ्यांसाठी कडक तपासणी प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. योजनेंतर्गत पात्र महिलांना त्यांच्या हक्काचा लाभ देण्याचा उद्देश असला तरी, खोटी माहिती देऊन लाभ घेणाऱ्या फसव्या अर्जदारांवर *एफआयआर दाखल* करण्याचा प्रस्ताव महिला आणि बाल विकास विभागाने केला आहे. तपासणीचे मुख्य उद्देश 1) पारदर्शकता सुनिश्चित करणे: पात्र लाभार्थ्यांना योजना मिळवून […]

अधिक वाचा..
Farmer

शेतकऱ्यांना नवीन ट्रॅक्टर खरेदीसाठी केंद्र सरकार देतय 50% पर्यंत अनुदान…

नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत एखाद्या शेतकऱ्याने ट्रॅक्टर खरेदी केल्यास त्याला 20% ते 50% अनुदान देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पीएम किसान ट्रॅक्टर योजनेचा लाभ कसा घेता येईल? या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? आणि कोणी अर्ज कसा […]

अधिक वाचा..

मतदान चोर सरकारचा निषेध म्हणून आज विधानसभा सदस्यपदाची शपथ न घेण्याचा मविआचा निर्णय

मुंबई: विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात भाजपा युतीचे सरकार आले असले तरी आपल्या मतदानाने हे सरकार आलेले नाही अशीच भावना जनतेला वाटत आहे. जनतेच्या मतांचे हे सरकार नाही. मारकडवाडीच्या लोकांची जी भावना आहे तीच राज्यातील बहुतांश जनतेची भावना आहे. जनभावनेचा आदर करत महाविकास आघाडीतील विधानसभा सदस्यांनी आज शपथ न घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे […]

अधिक वाचा..

तुमच्या शरीरावर ‘टॅटू’ असल्यास नाही मिळणार ‘या’ सरकारी नोकऱ्या…

जर तुम्ही टॅटू लव्हर असाल आणि सरकारी नोकरी करण्याची इच्छा बाळगत असाल, तर टॅटू काढण्यापूर्वी नियम समजून घ्या. भारतातील काही प्रतिष्ठित सरकारी नोकऱ्यांमध्ये शरीरावर टॅटू असलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी अपात्र मानले जाते. भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) भारतीय महसूल सेवा (IRS) भारतीय पोलीस सेवा (IPS) भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) भारतीय हवाई दल (Indian Air Force) भारतीय तटरक्षक […]

अधिक वाचा..

गुजरातधार्जिण्या नव्या भाजपा सरकारने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावू नये

मुंबई: निवडणूक आयोगाच्या मदतीने मतमोजणीत घोटाळे करुन महाराष्ट्रात जनतेच्या मतांची चोरी करणारे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. चोरीचे बहुमत असतानाही नव्या सरकारची स्थापनाच वादाने झाली असून या तीन पक्षातील अंतर्गत वादामुळे महाराष्ट्राची प्रतिमा देशात मलीन झाली आहे. महाराष्ट्राच्या माथी पुन्हा गुजरातधार्जिणे सरकार बसले असले तरी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला […]

अधिक वाचा..

लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे स्थिर सरकार देण्यासाठी आम्ही कटिबद्ध

गृहमंत्रीपदासह सर्व विषयांवर महायुतीच्या बैठकीत चर्चा करून अंतिम निर्णय घेणार सातारा (दरे):- गृहमंत्रीपदासह सर्व विषयांवर महायुतीच्या बैठकीत चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिले असून त्यांच्या आशा अपेक्षा पूर्ण करणारे स्थिर सरकार देण्याला आमचे प्राधान्य असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले. सातारा येथील […]

अधिक वाचा..

राज्यातील सत्ता स्थापनेची कोंडी फोडली

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना फोन ठाणे: महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर सत्ता स्थापनेबाबत मुख्यमंत्रीपदावरुन निर्माण झालेली कोंडी राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज फोडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवर चर्चा करुन महायुतीचे सरकार स्थापन करण्यात कोणताही अडसर नाही असे आश्वस्त केले. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह जो निर्णय घेतील […]

अधिक वाचा..

काँग्रेस महाविकास आघाडी स्पष्ट बहुमतासह सत्ता स्थापन करेल; रमेश चेन्नीथला

मुख्यमंत्रीपदावरून कोणताही वाद नाही, निकालानंतर चर्चा करुन निर्णय घेऊ मुंबई: विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेचा कौल महाविकास आघाडीलाच मिळेल व स्पष्ट बहुमतासह काँग्रेस महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे. टिळक भवनमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्रातील जनता काँग्रेस […]

अधिक वाचा..

महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष; नाना पटोले

मुंबई: विधानसभा निवडणुकीत जनतेचा दांडगा उत्साह दिसत असून महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता महाराष्ट्राच्या हिताचे सरकार निवडेल. राज्यातील जनतेचा प्रतिसाद पाहता काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून येईल. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळ्या दडगावरची रेष आहे, असा ठाम विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा […]

अधिक वाचा..