शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे शेतकरीविरोधी ट्रिपल इंजिन सरकार; नाना पटोले

मुंबई: पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी भाजपाप्रणित शिंदे सरकारला घेरले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्थगन प्रस्ताव आणला होता पण सरकारने शेतकऱी प्रश्नांवर बोलू दिले नाही. बोगस बियाणामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे पण सरकार फक्त कडक कायदा करु म्हणत वेळ मारुन नेत आहे.राज्यातील भाजपाप्रणित तिघाडी सरकार शेतकरी विरोधी असून शेतकऱ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे सरकार आहे, असा घणाघात […]

अधिक वाचा..

शेतकरी संकटात; सरकार मात्र सत्तेत मदमस्त

मुंबई: ​जुलैचा तिसरा आठवडा उलटूनही राज्यात अनेक भागांमध्ये पाऊस नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. दुबार तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही संकटाची घडी आहे त्यामुळे विधानसभेतील कामकाज थांबवून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तातडीने चर्चा करण्याची मागणी स्थगन प्रस्तावाद्वारे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत केली. विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बाळासाहेब थोरात यांनी […]

अधिक वाचा..

राज्याच्या सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी शासन कटिबद्ध; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: राज्याच्या सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने विविध शिफारशी केल्या आहेत. त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शीघ्र कृती समिती आणि ‘पीएम मित्रा’ च्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येईल, तसेच या ठिकाणी येणाऱ्या उद्योजकांना सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून उद्योजकांना कुठलीही अडचण […]

अधिक वाचा..

जनतेच्या प्रश्नावर शिंदे सरकारला अधिवेशनात जाब विचारु; नाना पटोले

मुंबई: पावसाळी अधिवेशनात जनतेचे प्रश्न घेऊन भाजपाप्रणित शिंदे सरकारला काँग्रेस पक्ष प्रश्न विचारेल. शेतकरी, कामगार, गरिब, महिला, कायदा व सुव्यवस्था, महागाई, तरुणांचे प्रश्न आहेत. राज्यातील सध्याचे सरकार शेतकरी विरोधी आहे. त्यांना शेतकरी व जनतेच्या प्रश्नांची त्यांना चाड नाही. महागाई वाढली आहे, शेतकऱ्यांना मदत मिळत नाही, बेरोजगारी वाढली आहे, यासह जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांवर सरकारला अधिवेशनात प्रश्न […]

अधिक वाचा..

गर्भवती महिलांना मिळणार मोफत उपचार; केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेच्या असा घ्या लाभ…

संभाजीनगर: शहरी भाग असो की ग्रामीण भाग, सरकारी योजनांचा लाभ सर्वत्र पोहोचवला जात आहे. या योजनांच्या माध्यमातून सरकार लोकांना अनेक फायदे देत आहे. विमा, पेन्शन, घर, बेरोजगारी भत्ता, शिक्षण, रेशन योजना अशा अनेक योजना ते चालवत आहे. अशीच एक योजना गरोदर महिलांसाठी चालवली जात असून तिचे नाव आहे प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व योजना. या योजनेअंतर्गत गरोदर […]

अधिक वाचा..

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मुंबई व महाराष्ट्रात महिला असुरक्षित…

मुंबई: राज्यातील राजकीय परिस्थिती, कायदा व सुव्यवस्था तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांवर काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली. पाऊस उशिरा पडल्याने दुबार पेरणीचे संकट असून शेतकऱ्याला खते, बियाणे मोफत द्यावे यासाठी सरकारकडे पाठपुरावा करु आणि वेळपडली तर राज्यपालांकडे जाऊ. पावसामुळे मंबईत सहा लोकांचा हकनाक बळी गेला, मुंबईत जागोजागी पाणी साचून मुंबईकरांची प्रचंड झाले आहे त्यामुळे खर्च केलेले […]

अधिक वाचा..

महागाईच्या मुद्द्यावर महिला काँग्रेसने मोदी सरकारला जाब विचारावा; नाना पटोले

मुंबई: नारीशक्ती ही मोठी शक्ती असून महिलांची लोकसंख्या ५० टक्के आहे. महिलांनी मतदानात सक्रीय सहभाग घेतला तर मोदी सरकारचा पराभव अटळ आहे. मोदी सरकारच्या काळात महागाई प्रचंड वाढली असून या महागाईचा सामना सर्वात आधी महिलांना करावा लागतो. महागाईने जगणे कठीण झाले आहे. महागाईच्या मुद्द्यावर महिला काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत केंद्रातील मोदी सरकारला जाब विचारला पाहिजे, […]

अधिक वाचा..

मुंबई, तुझा सरकारवर भरोसा हाय काय?

मुंबई: मागील सरकारच्या काळात मुंबई, तुझा बीएमसी वर भरोसा नाय काय नाय काय? हे गाण मुंबई तुबल्यावर  प्रसिद्ध झालं आणि मुंबईत पाणी तुंबण्यावरती खूप चर्चा झाली. मुंबईच्या सखल भागात नेहमीच पाणी साठत. समुद्रातून भरतीच्या वेळेला परत येणार पाणी आणि पावसाचं पाणी हे एकत्र होऊन मुंबई जलमय होते हे  सगळ्यांना माहिती आहे. आदित्य ठाकरे मंत्री असताना […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीसांचे भ्रष्ट सरकार उखडून टाका व काँग्रेसची सत्ता आणा; सिद्धरामय्या

मुंबई: भारतीय जनता पक्ष जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद घडवून सामाजिक शांतता भंग करत आहे तसेच संघ परिवाराचे लोकही धर्मा-धर्मात वाद लावून दंगे घडवतात आणि त्यात सामान्य जनता मात्र भरडली जात आहे. भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार म्हणजे भाजपा असे समीकरण आहे. कर्नाटकात ४० टक्के कमिशन दिल्याशिवाय कोणतेच काम होत नव्हते. कर्नाटकच्या जनतेने भ्रष्टाचारी भाजपाला […]

अधिक वाचा..

दुधाला हमीभाव व अनुदान देण्याच्या केशर पवार यांच्या मागणीला केंद्र व राज्य शासनाकडून हिरवा कंदील

शिरुर (तेजस फडके): दुग्ध व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. तरीही त्याला योग्य भाव मिळत नसल्याने दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांस उत्पादन खर्च देखील सुटत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी अडचणीत असुन सतत होणाऱ्या तोट्यामुळे व्यावसायिक दुध व्यवसाय बंद करण्याच्या मन:स्थितीत आहेत. त्यामुळे दुध उत्पादक  शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यासाठी ऊसाला ज्याप्रमाणे एफ.आर.पी. प्रमाणे दर दिला […]

अधिक वाचा..