बाह्य स्त्रोताव्दारे कर्मचारी भरतीमुळे सरकारच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह…

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने बाह्ययंत्रणेकडून कामे करुन घेण्यासाठी सेवा पुरवठादार संस्थेचे, एजन्सीचे पॅनेल नियुक्ती करण्यासाठी मान्यता देणेबाबतचा शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या पुरवठादारांकडून अतिकुशल, कुशल, अर्धकुशल व अकुशल मनुष्यबळाचा पुरवठा करण्यात येणार आहे. या शासननिर्णयातील परिशिष्टामधील पदे व त्यांचे मासिक वेतन पाहिले असता काही पदांचे वेतन मुख्य सचिवांच्या वेतनापेक्षाही जास्त […]

अधिक वाचा..

सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली; अंबदास दानवे 

मुंबई: शेतकऱ्यांनी कोरोना काळात सरकारला, जनतेला तारलं होतं मात्र शिंदे-फडणविस सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसले असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली. कांद्याला व कापसाला हमी भाव न देता उलट कृषी मंत्री हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येच कारण न तपासता त्यावर धक्कादायक वक्तव्य करतात, अशा शब्दात त्यांनी सरकारला धारेवर धरले. भांडवली खर्चामध्ये जास्तीत […]

अधिक वाचा..

हे सरकार शेतकर्‍यांचे, कष्टकऱ्यांचे, कामगाराचे नाहीय हे सरकार बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरांचे आहे…

मुंबई: हे सरकार शेतकर्‍यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगाराचं नाहीय हे सरकार बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरांचे आहे अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज अर्थसंकल्पावर बोलताना केली. या सरकारची जाहिरातच अशी आहे ‘निर्णय वेगवान महाराष्ट्र गतीमान’ परंतु गतिमान होण्याऐवजी महाराष्ट्र मागे रहायला लागला आहे. महाराष्ट्राची गती कमी व्हायला लागली आहे. आणि महाराष्ट्राची […]

अधिक वाचा..

ठाणे, नागपूरातील गुन्हेगारीवरुन अंबादास दानवेंनी सरकार, गृहमंत्र्यांना घेतले फैलावर

मुंबई: ठाणे, नागपूर मधील महिला अत्याचार, हिरे व्यापाऱ्यांना धमकी प्रकरण, दिवसा ढवळ्या हत्या आदी गुन्ह्यांत मोठया प्रमाणात वाढ झाली असून या सर्व गुन्ह्यांत ठाणे, नागपूर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारला धारेवर धरले. ठाण्याचे लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री व नागपूरचे लोकप्रतिनिधी हे उपमुख्यमंत्री असूनही येथील कायदा व सुव्यवस्था ढासळली असल्याचा म्हणत […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांची वीज तोडणी बंद करा… घरगुती गॅस दरवाढ करणार्‍या सरकारचा धिक्कार असो

वीज आणि गॅस दरवाढीविरोधात महाविकास आघाडीचे आमदार तिसऱ्या दिवशी आक्रमक… मुंबई: शेतकऱ्यांची वीज तोडणी बंद करा… घरगुती गॅस दरवाढ करणार्‍या सरकारचा धिक्कार असो… शेतकरीद्रोही सरकारचा निषेध असो… शेतकऱ्यांची वीज तोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… शेतकऱ्यांना १२ तास वीज द्या नाहीतर खुर्च्या खाली करा… वीजेवाचून पंप नाही पंपावाचून पीक नाही,पिकावाचून मरतोय शेतकरी ,सरकारला देणं घेणं नाही… शेतकऱ्यांना […]

अधिक वाचा..

राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेत सरकारवर टीकास्त्र…

राज्यपालांच्या अभिभाषणाच्या माध्यमातून पाठ थोपटून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न मुंबई: महागाई, बेरोजगारी, महापुरुषांची स्मारके, महामानवांचा अवमान यासह राज्यासमोरील महत्वाच्या, गंभीर प्रश्नांचा उल्लेख राज्यपालांच्या अभिषाणात नाही. सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांचा विसर सरकारला पडला आहे. सरकारच्या सुमार कामगिरीमुळे अनेक महत्वाचे विषय अभिभाषणात टाळले आहेत. महिलांवर हल्ले होत आहेत. पत्रकारांची हत्या होत आहे. जनतेच्या पैशांवर मंत्र्यांची उधळपट्टी सुरु आहे. […]

अधिक वाचा..

देशातील शेती व शेतकरी उद्ध्वस्त करण्याचे काम भाजपा सरकारने केले…

नक्षलवादी, दहशतवादी, आंदोलजीवी संबोधून भाजापाकडून शेतकऱ्यांचा अपमान रायपूर: केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. भाजपाची धोरणे शेतकरी विरोधी असून कृषी साहित्य, खते महाग झाली आहेत तर शेतमालाला हमी भाव मिळत नाही. शेती करणे परवडत नसल्याने शेतकरी आतमहत्या वाढल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सरकारमुळे शेतीची अवस्था दयनीय झाली असून देशातील अन्नदात्याला […]

अधिक वाचा..

मोठी बातमी! औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यास केंद्र सरकारची मंजूरी…

शिंदे-फडणवीस सरकारला मोठे यश… औरंगाबाद: महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही शहरांच्या नामांतराला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. केंद्र सरकारने यापूर्वीच उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्यास केंद्राची अनुमती असल्याचे म्हटले होते. तसेच, आता औरंगाबाद शहराचेही नाव छत्रपती संभाजीनगर करण्यास केंद्राने हिरवा कंदील दाखवला आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारला मिळालेले हे मोठे यश म्हणावे लागेल.. केंद्र […]

अधिक वाचा..

शिंदे-फडणवीस सरकारने MPSC विद्यार्थ्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये…

MPSC प्रकरणातील लढ्यात काँग्रेस विद्यार्थ्यांसोबत, नोटीफिकेशन आल्याशिवाय माघार नाही… मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) नवीन अभ्यासक्रमासंदर्भात विद्यार्थ्यांना लेखी आश्वासन देऊनही अद्याप नोटीफिकेशन काढले जात नाही. शिंदे फडणीस सरकार व एमपीएससी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करत आहे. तीन दिवसांपासून विद्यार्थी पुण्यात बेमुदत आंदोलन करत आहेत परंतु राज्य सरकार त्याकडे गांभिर्याने पहात नाही. शिंदे-फडणवीस सरकारने विद्यार्थ्यांच्या सहनशिलतेचा अंत […]

अधिक वाचा..

जातेगावच्या शेतकऱ्याला शासनाकडून मिळालेला सौर पंप चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील एका शेतकऱ्याला शासनाच्या कुसुम योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी मिळालेला सौर उर्जेवर चालणारा सौर पंप चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील विजय खैरे यांना शासनाच्या कुसुम योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी सौर उर्जेवर चालणारा सौर पंप […]

अधिक वाचा..