सर्वांनी एकत्रीतपणे केंद्र शासनाकडे राज्याच्या प्रलंबित प्रस्तावांबाबत पाठपुरावा करावा…

मुंबई: संसद सदस्य हे राज्याच्या विकासासाठी झटणारे आणि त्यासाठी देशाच्या सर्वोच्च सभागृहातील महाराष्ट्राचा आवाज आहेत. हा आवाज जितका बुलंद तेवढ्या विकासाच्या योजना, निधी राज्यात येणार त्यासाठी आपण सर्व एकत्र येऊन केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांबाबत पाठपुरावा करावा. सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारी यंत्रणा करतानाच महाराष्ट्र सदनातील निवासी आयुक्तांनी केंद्रीय मंत्रालय व राज्यातील विविध विभाग यातील दुवा म्हणून […]

अधिक वाचा..

एकत्रित लढा आणि सरकारला जातीनिहाय जनगणना करण्यास भाग पाडा…

दिल्ली: एकत्रित लढा आणि सरकारला जातीनिहाय जनगणना करण्यास भाग पाडा, जोपर्यंत तुम्ही तुमची एकी दाखवत नाही तोपर्यंत हे सरकार झुकनार नाही आणि म्हणूनच एकत्रित लढून येणारी जनगणना ही जातिनिहाय झाली पाहिजे असे मत आखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. कॉन्स्टिट्यूशन क्लब दिल्ली येथे ओबीसी महासभे तर्फे आयोजीत […]

अधिक वाचा..

शिंदे सरकारच्या वैधतेचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आला तर ३४ नव्हे ४० खासदार निवडून येतील…

मुंबई: ‘इंडिया टूडे सी वोटर मुड अॉफ द नेशन’ या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला ३४ जागा मिळतील असे समोर आले आहे. मात्र शिंदे – फडणवीस सरकारच्या वैधतेचा सुप्रीम कोर्टाचा निकाल जेव्हा येईल त्यावेळी हा आकडा ४० च्या आसपास जाईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केला आहे. […]

अधिक वाचा..

निमंत्रणपत्र नाही तर सरकार कसे स्थापन झाले; महेश तपासे

शपथविधी कसा झाला याचा देवेंद्र फडणवीस यांनी नव्हे तर राज्यपालांनी खुलासा करावा… मुंबई: सत्ता स्थापनेसाठी लेखी निमंत्रण दिलेले नाही हे माहिती अधिकारात उघड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करण्याऐवजी राज्यपालांनी खुलासा करायला हवा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापनेसाठी […]

अधिक वाचा..

सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा

१० लाख रुपयांऐवजी १५ ते २५ लाख रुपये मिळणार… औरंगाबाद: शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असलेला विमा योजनेत मोठा बदल केला असून सरकारी कर्मचाऱ्यांना आता विमा रक्कम सरसकट १० लाख रुपयांऐवजी १५ ते २५ लाख रुपये मिळणार आहेत. गट अ अधिकाऱ्यांना २५ लाख, तर गट ब अधिकाऱ्यांना २० लाख […]

अधिक वाचा..

केंदूरच्या सत्तर विद्यार्थ्यांचे शासकीय रेखाकला परीक्षेतील यश

३२ विद्यार्थी अ, २९ विद्यार्थी ब तर ९ विद्यार्थी क श्रेणीत उत्तीर्ण शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या विद्यालयाचा शासकीय रेखाकला एलिमेंटरी ग्रेड परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला असून 32 विद्यार्थ्यांनी अ श्रेणीत तर 29 विद्यार्थ्यांनी ब श्रेणीत आणि […]

अधिक वाचा..

शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्रच विक्रीस काढला आहे का?

मुंबई: महावितरण कंपनीवर खाजगी कंपन्यांचा डोळा असून या कंपनीचे खाजगीकरण होऊ नये म्हणूनच राज्यातील वीज कंपन्यांचे कर्मचारी संपावर गेले आहेत. महावितरण ही महत्वाची तसेच फायद्यात असलेली कंपनी अदानीसारख्या खाजगी उद्योगपतीच्या घशात घालण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा डाव आहे. महावितरणचे खाजगीकरण सुलभ व्हावे यासाठीच अंबानी-अदानीच्या मुलांची राज्याच्या आर्थिक सल्लागार मंडळावर निवड केल्याचे दिसत असून शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्रच विक्रीस […]

अधिक वाचा..

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोदी सरकारने गरिबांच्या तोंडचा घास हिरावला

मुंबई: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत गरिबांना अतिरिक्त ५ किलो अन्नधान्य पुरवणारी प्रधानमंत्री गरीब अन्न कल्याण योजना मोदी सरकारने बंद केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ८१ कोटी गरिबांना महिन्याला १० किलो धान्य मिळत होते परंतु आता फक्त ५ किलोच मिळणार आहे. मोदी सरकारने […]

अधिक वाचा..

विजयस्तंभावर येत नसल्याने सरकारची मानसीकता समजते; जितेंद्र आव्हाड

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील जयस्तंभ येथे अभिवादन करण्यासाठी माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यहे उपस्थित झाले होते. यावेळी त्यांनी जयस्तंभास अभिवादन केले. यावेळी बोलताना या ठिकाणी मानवंदना देणं चुकीच नाही, पूर्वी एवढ्या मोठ्या सैन्याना हरवणं अवघड होतं त्याचा इतिहास आहे, असे माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी […]

अधिक वाचा..

मानवंदनेसाठी शासनाचे कोणी येईल याचा विचार करत नाही…

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची खोचक टीका शिक्रापूर (शेरखान शेख): नवीन वषार्ची सुरुवात ही एका ऊर्जादायी दिवसाने तसेच कोरेगाव भीमा विजय स्तंभाला अभिवादन करत केली असून मी करणी सेने सारख्या चिल्लर लोकांवर काही बोलणार नाही आणि याठिकाणी शासनाच्या वतीने कोणी येईल की नाही याचा विचार करत नसल्याचे शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे […]

अधिक वाचा..