घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना तीन पावसाळे उलटले तरी घर नाही; विजय वडेट्टीवार 

मुंबई: राज्यातील घरकुल योजनेत घरे मंजूर होऊनही गेल्या तीन वर्षांपासून अनेक लाभार्थ्यांना प्रत्यक्ष घर मिळाले नसल्याचा गंभीर मुद्दा आज विधानसभेत उपस्थित करण्यात आला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात आक्रमक भूमिका घेत सरकारवर जोरदार टीका केली. “तीन पावसाळे उलटले, लोकं कुठे राहत असतील याचा विचार करा. सरकार म्हणून जनाची नाही तर किमान मनाची तरी […]

अधिक वाचा..

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात बीएसयुपी सदनिकांमध्ये घर घेणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना एक टक्के मुद्रांक शुल्कात सवलत

ठाणे विभागातील ६३४३ गरीब कुटुंबांना होणार लाभ मुंबई: ठाणे महापालिका हद्दीतील जे.एन.एन.यु. आर.एम. आणि बी.एस.यू.पी. योजनेअंतर्गत प्रकल्पबाधीतांना वैयक्तिक सदनिका करारनामा करताना एक टक्के मुद्रांक शुल्कात सवलत देतानाच त्यासाठी प्रतिदस्त १०० रुपये आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. केंद्र शासन, राज्य शासन व ठाणे महानगरपालिकेचा संयुक्त उपक्रम असलेल्या जे.एन.एन.यु.आर.एम., बी.एस.यू.पी. […]

अधिक वाचा..

विरार पूर्व इमारत दुर्घटनेत घरे गमावलेल्या नागरिकांना म्हाडाची ६० घरे तात्पुरत्या स्वरूपात मिळणार

वसई विरार मध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू होणार; उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घेतला आढावा विरार: विरारमध्ये इमारत कोसळून १७ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. राज्याचे परिवहन मंत्री व पालघर जिल्हा संपर्कमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज या दुर्घटनास्थळाला भेट दिली आणि पीडित कुटुंबांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. या कठीण काळात आम्ही […]

अधिक वाचा..

काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांवर दगड मारू नये: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शासन आपल्या दारी विशेष शिबिरातून हजारो दाखल्यांचे शिंदे यांच्या हस्ते वाटप मुंबई: काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांवर दगड मारू नये, असा इशारा शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उबाठा गटाला दिला.उबाठाच्या नेत्यांनी शिवसेना नेते रामदास कदम आणि गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्यावर अधिवेशनात आरोप केले होते. या आरोपांचा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज […]

अधिक वाचा..

ऑनर किलिंग राेखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘सुरक्षागृह’या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी

मुंबई: आंतरजातीय आणि आंतरधर्मीय जोडप्यांना लग्नानंतर सुरुवातीच्या काळात सुरक्षित निवारा महत्वाचा असतो. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अनेकदा गंभीर होत असून .अशा प्रकरणात बेदम मारहाण ते खुना पर्यंतच्या घटना घडतात. ऑनर किलिंग राेखण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात ‘सुरक्षागृह’ सुविधेचा निर्णय घेतला आहे. यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश विधानपरिषदेचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे […]

अधिक वाचा..

कान्हूर मेसाईत महिलेच्या घरातून दागिने व रक्कम चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील एका महिलेच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कान्हूर डमेसाई (ता. शिरुर) येथील पुंडे मळा येथे राहणाऱ्या सुरेखा पुंडे या 4 ऑक्टोबर रोजी घराला कुलूप लावून […]

अधिक वाचा..

आदिवासी समाजाच्या घरांसाठी काही जागा राखीव

शिरुर तालुक्यातील केंदूर ग्रामपंचायत घेणार अनोखा निर्णय शिक्रापूर: केंदूर (ता. शिरुर) येथील ठाकरवाडी येथे मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आदिवासी समाजातील एका व्यक्तीचे घर कोसळले. ५ वर्षांपूर्वी झालेल्या पावसामध्ये देखील हेच घर कोसळून एका बालकाचा मृत्यू होत बालकाचे आई व आजी जखमी झाले होते. पुन्हा एकदा या कुटुंबावर हा प्रसंग उद्भवला असल्याने अशा आदिवासी ठाकर […]

अधिक वाचा..