पुण्यातील ILS विधी महाविद्यालय शुल्क वसुली प्रकरणी चौकशी; विद्यार्थ्यांना 6% व्याजासह परतावा

मुंबई: विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत पुणे येथील आय.एल.एस. विधी महाविद्यालयातील बेकायदेशीर शुल्क वसुली प्रकरणी राज्य शासनाने कठोर भूमिका घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालावर आधारित कारवाई करत संबंधित विद्यार्थ्यांना वसूल केलेले शुल्क ६ टक्के व्याजासह परत करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहेत. मंत्री पाटील […]

अधिक वाचा..

साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांच्या बदल्यांवर वाद; शिवसेनेची चौकशीची मागणी

मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून आला आहे. बदलीच्या दिवशीच त्यांनी ‘पॉवर प्ले’ करत जिल्ह्यातील सहा ते सात पोलीस अधिकाऱ्यांच्या कथित नियमबाह्य बदल्या केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून शिवसेना सातारा जिल्ह्याने थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली आहे. […]

अधिक वाचा..

परिवहन विभागात बदली-वसुली रॅकेटचा आरोप; निलंबित अधिकाऱ्यांचा सहभाग? चौकशीची मागणी

मुंबई: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचार आणि छळवणुकीच्या गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश करत मोठे आरोप केले आहेत. आरटीओ विभागातील बदल्या आणि बेकायदेशीर वसुलीसाठी मोठे रॅकेट सक्रिय असून, प्रामाणिक अधिकाऱ्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवले जात असल्याचा दावा त्यांनी केला. वडेट्टीवार यांच्या मते, निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे हे या रॅकेटचे प्रमुख सूत्रधार असून, त्यांनी […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री, उशीर झाला! नाशिक भोंदू बाबा प्रकरणात चौकशीची मागणी; महिला आयोगावरही प्रश्नचिन्ह

  नाशिक : राज्यात चैत्र नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या कथित भोंदू बाबा प्रकरणामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. अंधश्रद्धा, महिलांचे कथित शोषण आणि त्याला मिळालेल्या संभाव्य राजकीय आश्रयामुळे राज्यातील वातावरण तापले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नाशिकमध्ये अशोक खरात या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचा […]

अधिक वाचा..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताची सीआयडी चौकशी पेक्षा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी व्हावी

नागपूर: समृद्धी महामार्गावर काँग्रेसच्या नगरसेवकाची बस थांबवून त्यांना धमकावण्यात आले, हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी चाकू,तलवार, बंदूक असल्याची माहिती मिळाली पोलिस या प्रकरणी तपास करत असल्याची माहिती काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी दिली. समृद्धी महामार्गावर घडलेल्या प्रकरणी कोण होत, कोणी हल्ला केला याबाबत अधिकची माहिती नाही पण पोलिस याबाबत तपास करत असल्याचे वडेट्टीवार यांनी […]

अधिक वाचा..

अपघातावर राजकारण नको! चौकशी होईलच; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्पष्ट इशारा

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूवरून राजकारण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर शब्दांत फटकारले आहे. अपघाताची चौकशी होणारच असून या दुर्दैवी घटनेला घातपाताचा रंग देणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “कोणताही अपघात घडला की त्याची चौकशी होतेच. या […]

अधिक वाचा..

शासकीय तंत्रनिकेतन, मुंबई या स्वायत्त संस्थेतील विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावरील मजकुराबाबत चौकशी

सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश मुंबई: शासकीय तंत्रनिकेतन, मुंबई या स्वायत्त संस्थेतील पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या कोर्स रजिस्ट्रेशन फॉर्म व हॉल तिकिटावर आक्षेपार्थ मजकूर छापून आल्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची तातडीने दखल घेऊन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले […]

अधिक वाचा..

टाकळी हाजी आरोग्य केंद्र प्रकरण; तिसऱ्यांदा दाखल झाली चौकशी समिती

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निवासी गैरहजेरीमुळे अनेक रुग्णांना नाहक त्रास झाल्याने परिसरातील ९ गावच्या ग्रामस्थांनी वरिष्ठांकडे लेखी तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर चौकशीसाठी समिती तिसऱ्यांदा टाकळी हाजी येथे दाखल झाली असून ग्रामस्थांनी या वेळी ठोस पुरावे व साक्षीदारांसमोर मांडणी केली. गेल्या काही महिन्यांपासून या केंद्रातील वैद्यकीय अधिकारी […]

अधिक वाचा..

अखेर टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्रात चौकशी कमिटी दाखल, चौकशी कमिटी निपक्षपणे कारवाई करणार का?

शिरूर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरूर) प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी निवासी राहत नसल्यामुळे उपचाराअभावी अपघातातील, गरोदर स्त्रीया, नवजात बालके यांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे संतापलेल्या बेट भागातील तब्बल नऊ गावांच्या ग्रामपंचायतींनी वैद्यकीय अधिकाऱ्यांविरोधात जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हाधिकारी व आरोग्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणात […]

अधिक वाचा..

इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा

मुंबई: मृत्यू हे सरकारच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत. कुंडमळा येथे पावसाळ्यात शेकडो पर्यटक येतात याची माहित असताना तो धोकादायक पुल खुला का ठेवला? असा प्रश्न विचारून हे सरकारने घेतलेले बळी आहेत, जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. इंद्रायणी पुल […]

अधिक वाचा..