राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था (एनआयपीएचटी) येथे आता बीबीए इन ॲग्रीबिझनेस हा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाला त्रिभुवन सहकारी विद्यापीठाने मान्यता दिली असून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून ६० प्रवेशक्षमतेची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती पणन […]

अधिक वाचा..

आशाताई यांच्या निधनाने संगीतविश्वातील एका सुवर्णयुगाचा अंत; जयकुमार रावल

मुंबई: ज्येष्ठ गायिका स्व.आशाताई भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. स्व.आशाताई यांच्या रूपाने भारतीय संगीत विश्वातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून, सुरांची सम्राज्ञी काळाच्या पडद्याआड गेली आहे, अशा शब्दांत राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.   आशाताई भोसले यांचे संगीत क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या […]

अधिक वाचा..

बाजार समितीमध्ये शेतमालाच्या गोण्यांच्या चढ-उतारासाठी ५० किलोची मर्यादा; जयकुमार रावल

मुंबई: जागतिक कामगार परिषदेच्या मार्गदर्शक सूचना व राज्यातील माथाडी कामगाराची मागणी लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाच्या गोण्या – पिशव्यांच्या वजनाची मर्यादा ५० किलो पर्यंत करण्यात आली आहे. या निर्देशाची राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आदेश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. या अनुषंगाने पणन विभागाने […]

अधिक वाचा..

उद्योगांना एलपीजीचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील; जयकुमार रावल

मुंबई: महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच आहे, या भूमिकेतून राज्य शासन सर्वतोपरी काळजी घेत आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे एलपीजी गॅसच्या जागतिक तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील स्वदेशी उद्योगाबरोबर विदेशी गुंतवणुकीच्या उद्योगांना तसेच नागरिकांना गॅसचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी राज्य शासनामार्फत आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगून या संकटात कोणत्याही उद्योगाला राज्य शासन […]

अधिक वाचा..

शेतकरी केवळ ‘उत्पादक’ नव्हे तर यशस्वी ‘उद्योजक’ व्हावा; जयकुमार रावल

मुंबई: बदलत्या परिस्थितीत शेतकरी हा केवळ उत्पादक राहून चालणार नाही, तर तो उत्तम उद्योजक बनला पाहिजे. यासाठी पणन विभागाच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. याचबरोबर शेतीमालाच्या उत्पादनासोबतच त्याचे मार्केटिंग, ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि विक्री या सर्व बाबींमध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घेतला पाहिजे, असे प्रतिपादन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले. या प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी उत्पादक […]

अधिक वाचा..

मिलेटचे महत्व लक्षात घेऊन महोत्सवाची व्याप्ती राज्यभर वाढविणार; पणन मंत्री जयकुमार रावल

बोरीवली येथे तीन दिवसीय मिलेट महोत्सवाचे उद्घाटन मुंबई: राज्यात ज्वारी, बाजरी, नाचणी ही प्रमुख तृणधान्ये (मिलेट्स) आहेत. कमी पाण्यावर येणारी तसेच पर्यावरणपूरक असण्याबरोबरच आरोग्यासाठी लाभदायी असणाऱ्या मिलेट्सना शेतातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने मिलेट्स महोत्सवाचे आयोजन मुंबईत करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने मिलेट्स महोत्सव राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगत […]

अधिक वाचा..

फिलिपाईन्समध्ये मराठींचा ठसा; मंत्री जयकुमार रावल यांचा मनिल्यात संवाद, १२ कलमी उपक्रमांची घोषणा

मुंबई: मराठी समाज जगभर विखुरलेला असला तरी मातृभूमीशी त्यांचे नाते अतूट आहे. फिलिपाईन्समधील भारतीय समाज संख्येने कमी असला तरी व्यापार, उद्योग, सेवा आणि व्यावसायिक क्षेत्रात त्यांचे योगदान लक्षणीय असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी मनिला येथे केले. मनिल्यात आयोजित विशेष कार्यक्रमात त्यांनी भारतीय तसेच मराठी बांधवांशी संवाद साधला. यावेळी प्रवासी मराठी […]

अधिक वाचा..

पीक पोषण शिखर परिषदेमुळे ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेला बळ; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: ‘कन्वर्ज, कोलॅबोरेट अँड को-क्रिएट’ ही संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. इंडियन मायक्रो फर्टिलायझर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या मुंबईत आयोजित परिषदेच्या माध्यमातून या संकल्पनेला अधिक बळ मिळेल, असा विश्वास पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला. इंडियन मायक्रो फर्टिलायझर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयएमएमए) यांच्या वतीने मुंबई […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राचा अत्यंत अभ्यासू व कर्तबगार नेता हरपला; मंत्री जयकुमार रावल

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक तसेच सर्व क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात झालेले दुर्दैवी निधन अत्यंत धक्कादायक, वेदनादायी आणि मन सुन्न करणारे आहे. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राने एक अत्यंत अभ्यासू, अनुभवी, कर्तबगार, अजातशत्रू आणि लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे, अशा शब्दांत राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी शोकभावना व्यक्त केल्या. मंत्री […]

अधिक वाचा..