शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या गंभीर परिस्थितीकडे शासन व पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जयहिंद सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश वाळुंज यांनी बेमुदत सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. बुधवार (ता. १५) पासून तहसीलदार कार्यालयासमोर सुरू झालेल्या या आंदोलनामुळे शहरासह तालुक्यात चर्चेला चांगलेच […]

अधिक वाचा..

वाघोलीत रक्तरंजित सकाळ! आईकडून पोटच्या मुलाची गळा चिरून निर्घृण हत्या, मुलीवर प्राणघातक हल्ला

परिसरात खळबळ, आरोपी आई पोलिसांच्या ताब्यात पुणे (वाघोली): वाघोली परिसरातील बायफ रोडजवळील ऑलिव्ह सोसायटीलगत असलेल्या गल्लीत मंगळवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. आईनेच आपल्या ११ वर्षीय पोटच्या मुलाचा गळा चिरून निर्घृण हत्या केली असून, त्यानंतर १३ वर्षीय मुलीवरही प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र मुलगी जोरात ओरडत घराबाहेर पळाल्याने तिचा जीव वाचला. सध्या […]

अधिक वाचा..

बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त ‘एसटी संगे तीर्थाटन’ योजना; २३ जानेवारीपासून राज्यभर अंमलबजावणी

मुंबई: सर्वसामान्य माणसाच्या श्रद्धेला सुरक्षितता आणि परवडणाऱ्या खर्चाची जोड देणारी एक महत्त्वाकांक्षी लोकाभिमुख योजना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने साकारली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार आणि स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे — एसटी संगे तीर्थाटन’ या विशेष योजनेची घोषणा करण्यात आली आहे. ही योजना म्हणजे श्रद्धा, सुविधा आणि […]

अधिक वाचा..

महापालिका निकालानंतर मनोज जरांगे पाटील यांचा अजित पवारांवर हल्लाबोल; फडणवीसांनाही इशारा

मुंबई: महापालिका निवडणुकीच्या निकालात राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून शिवसेना शिंदे गटालाही चांगले यश मिळाले आहे. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला तसेच शरद पवार गटालाही मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, “यांनी बघायला काही […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात वाळू माफियाचा हैदोस; शेतकऱ्याच्या कुटुंबासह ६ महिन्यांच्या गरोदर महिलेवर जीवघेणा हल्ला…

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी–लगडवाडी परिसरात वाळू माफियांची दहशत पुन्हा एकदा उघडकीस आली असून, बेकायदेशीर वाळू वाहतुकीला विरोध केल्याच्या रागातून एका शेतकऱ्यासह त्याच्या कुटुंबीयांवर अमानुष हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत ६ महिन्यांची गरोदर महिला, वृद्ध आईसह चौघे जखमी झाले आहेत. लक्ष्मण मारुती कोळपे (वय ३९, रा. चिंचणी, ता. […]

अधिक वाचा..

शिवसेनेचा पुणे महापालिका निवडणुकीत जोरदार प्रचार शुभारंभ

महापौर निवडीत शिवसेनेची भूमिका निर्णायक; उद्योगमंत्री उदय सामंतांचा विश्वास पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना स्वबळावर उतरली असून, शिवसेना प्रचार अभियानाचा भव्य शुभारंभ पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती, नवसाला पावणारा श्रीमंत दगडूशेठ गणपती यांच्या चरणी प्रचाराचा नारळ फोडून करण्यात आला. सर्वांच्या वतीने आरती करून व जैन मंदिर येथे दर्शन घेऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली […]

अधिक वाचा..

‘स्टडी इन महाराष्ट्र’ या उपक्रमाचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते शुभारंभ*

राज्याला उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र बनविणार मुंबई:“स्टडी इन महाराष्ट्र’ या उपक्रमातून राज्याला उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र बनवण्याचे ध्येय ठेवले आहे. सदर प्रणाली ही आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून NRI/PIO/OCI/FNS/CIWGC उमेदवारांची प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व कार्यक्षम करण्यासाठी मदत करेल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले. मंत्रालयात “स्टडी इन महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या […]

अधिक वाचा..

वडिलोपार्जित जमीन होणार मालकी हक्काची; ‘स्वामित्व’ योजनेचा उद्या शुभारंभ

मुंबई: केंद्र सरकारची स्वामित्व योजना ग्रामीण भागातील लोकांसाठी मालमत्ता हक्क निश्चित करणारी महत्त्वाची योजना आहे. २७ डिसेंबरपासून महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांतील ३०,५१५ गावांमध्ये या योजनेचा शुभारंभ झाला आहे. स्वामित्व योजनेची उद्दिष्टे गावांमधील मालमत्तांची स्पष्टता निर्माण करणे. डिजिटल प्रॉपर्टी कार्डद्वारे मालमत्ता व्यवस्थापन सुलभ करणे. शेतकरी व ग्रामीण नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे. मालमत्तेसंबंधी वाद मिटवून सामाजिक सलोखा निर्माण […]

अधिक वाचा..

…म्हणून कामगारांची नोंदणी अनिवार्य करण्यासाठी मोहीम सुरू करणे आवश्यक

पुणे: भोसरी येथे पाण्याची टाकी कोसळून दुर्घटना झाली त्या ठिकाणाला शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी सांगितले की, ऐन सणासुदीच्या तोंडावर कामगारांवर जो प्रसंग ओढवला आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे. या ठिकाणी लेबर कॅम्पमधील कामगारांसाठी तकलादू पद्धतीने पाण्याची टाकी उभारली असल्याचे प्रथमदर्शनी कळते आहे. […]

अधिक वाचा..

मुंबईत ठिकठिकाणी सुरू करणार ‘हिरकणी कक्ष’; दीपक केसरकर

मुंबई: रेल्वे स्थानक, बस स्थानक, रुग्णालये, पोलिस स्टेशन अशा गर्दीच्या ठिकाणी स्तनदा माता बालकांना स्तनपान करू शकत नाहीत. हे लक्षात घेऊन मुंबई शहरामध्ये माता आणि बालकांच्या सोयीसाठी अद्ययावत हिरकणी कक्ष सुरू करण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. बाळांना दूध पिण्याच्या मूलभूत अधिकारापासून वंचित राहावे लागू नये, […]

अधिक वाचा..