मंत्रालयात लाचखोरीचा स्फोट: मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत; ‘रेटकार्ड’चा धक्कादायक दावा

मुंबई: राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारे मंत्रालयातील लाचखोरी प्रकरण आता अधिक गंभीर वळणावर पोहोचले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाशी संबंधित कामासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असताना संबंधित क्लर्कला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर या प्रकरणात नवा ट्विस्ट म्हणून राजू ढेरिंगे यांचा ५० हजारांची मागणी करतानाचा कथित […]

अधिक वाचा..

अजित पवारांच्या निधनाचा निवडणुकांवर परिणाम? सुनेत्रा पवार ९ फेब्रुवारीला मंत्रालयात प्रवेश करणार

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने राष्ट्रवादी काँग्रेससह राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवरही या घटनेचा परिणाम होण्याची शक्यता स्थानिक पातळीवर व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पवार कुटुंबीय दुःखातून सावरत हळूहळू राजकीय जबाबदाऱ्या स्वीकारताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी […]

अधिक वाचा..

अजित पवारांनंतर सत्ता-संघर्ष टोकाला! सुनेत्रा पवारांची एंट्री पण अर्थखात्याला भाजपचा ‘नकार’

अजित पवारांनंतर उपमुख्यमंत्रिपद कुणाकडे? सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तबाची शक्यता, अर्थखात्यावर भाजपचा दावा मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदाची जागा कोण घेणार आणि महत्त्वाचे अर्थखाते कुणाकडे जाणार, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची उद्या (शुक्रवारी) […]

अधिक वाचा..

मुंबईतील अब्जावधी रुपयांच्या जमिनी अदानीच्या घशात, आता मंत्रालय व विधिमंडळ कधी देणार

मुंबई: भाजप महायुतीचे सरकार जनतेपेक्षा अदानीच्या फायद्यासाठी रात्रंदिवस काम करत आहे. मुंबईचे दोन्ही विमानतळ आधीच अदानीला दिले आहेत, धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली डंपिंग ग्राऊंडची जमीन दिलेली आहे, कुर्ल्यातील मदर डेअरीची ८.५ हेक्टर जमीन दिली आहे आणि वांद्र्यातील एमएसआरडीसीच्या कार्यालयाची जागाही देऊन टाकली आहे. आता फक्त मंत्रालय, प्रशासकीय इमारत व विधिमंडळच अदानीला देण्याचे बाकी आहे, ते […]

अधिक वाचा..

मंत्रालय प्रवेशासाठी ‘फेशियल रिकग्निशन’ प्रणाली अनिवार्य; आमदारांचे स्वीय सहाय्यक अडचणीत

मुंबई: मंत्रालयीन सुरक्षा टप्पा-२ अंतर्गत प्रवेशासाठी अत्याधुनिक फेशियल रिकग्निशन (Facial Recognition) प्रणाली लागू करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला असला तरी, यामुळे आमदारांचे अधिकृत स्वीय सहाय्यक, मंत्रालयीन कर्मचारी आणि विधीमंडळ कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्वीय सहाय्यकांना मंत्रालयात प्रवेश नाकारला विधानभवनाने अधिकृतपणे ओळखपत्र दिलेले असतानाही मागील १०-१५ दिवसांपासून आमदारांचे स्वीय […]

अधिक वाचा..

अजित पवार यांनी मंत्रालयात विधी शाखेच्या विद्यार्थी व भावी वकिलांशी साधला संवाद

मुंबई: लोकशाहीचे बळकटीकरण, सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी भारतीय संविधान आणि देशाच्या नियम-कायद्यांबाबत नागरिकांमध्ये जागरुकता असणे आवश्यक आहे. ही जागरुकता निर्माण करण्यासह समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित पिडीत बांधवांना त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, न्यायप्रिय वकिल म्हणून भविष्यात महत्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत मंत्रालयात आयोजित संवादभेटी […]

अधिक वाचा..

महापौर ना मंत्रालयात केबिन द्या; आदित्य ठाकरे

मुंबई: मुंबई महानगरपालिकेतील बाजार समिती आणि शिक्षण समितीच्या केबिन पालिका प्रशासनाने पालकमंत्र्यांना दिल्या आहेत. मिंधे सरकार च्या आदेशाने महापालिका प्रशासनान मुंबईच्या पालकमंत्र्यांना स्वतंत्र केबिन दिल्या आहेत. पालिका प्रशासनाच्या या निर्णयाचा शिवसेना नेते, युवासेनाध्यक्ष, आमदार आदित्य ठाकरे यांनी कडाडून विरोध केलाय. महापालिका कायदा 1888 नुसार मुंबई महापालिका स्वतंत्र प्राधिकरणानुसार कार्यरत आहे. या कायद्याची पायमल्ली केली आहे. […]

अधिक वाचा..

वाढदिवस साजरा न करता कृषिमंत्री धनंजय मुंडे मंत्रालयात

सुट्टीच्या दिवशी मंत्रालय उघडून घेतला विभागाचा आढावा मुंबई: राज्याचे नवनियुक्त कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाची नियुक्ती होताच आज पहिल्याच दिवशी मंत्रालयात जाऊन कृषी विभागाची चार तास आढावा बैठक घेतली. धनंजय मुंडे यांचा वाढदिवस व सुट्टीचा दिवस असताना देखील मंत्रालय उघडून त्यांनी शेतकरी हितार्थ निर्णयाला प्राधान्य दिले. कृषी विभागाची मागेल त्याला शेततळे व मागेल त्याला ड्रीप […]

अधिक वाचा..

मंत्रालयात बोगस भरती प्रक्रियेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करा…

नागपूर: मंत्रालयात ‘क’ संवर्गातील लिपिकवर्गीय पदांची भरती सुरु असल्याचे खोटे सांगून मंत्रालयातील शिपाई पदावरील काही कर्मचाऱ्यांनी बोगस भरतीप्रक्रिया राबवली. या कर्मचाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवांच्या दालनात उमेदवारांच्या बोगस मुलाखतींचं नाटक घडवून आणलं. यातून अनेक युवकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. मंत्रालयात उपसचिवांच्या दालनातंच झालेल्या या बनवेगिरीची सखोल चौकशी करावी. दोषींना शिक्षा करावी आणि फसलेल्या तरुणांना […]

अधिक वाचा..