भाजपा सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

वैजापूरच्या शेतकरी मेळाव्यात मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल; शेतकरी, महागाई, बेरोजगारी आणि स्मार्ट मीटरवरून टीका मुंबई: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. सपकाळ म्हणाले की, नरेंद्र […]

अधिक वाचा..

आईच्या संस्कारांमुळेच यशस्वी व्यक्तिमत्त्व घडते; मातृशक्तीचा गौरव समाजाचे कर्तव्य; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

मुरबाड: “प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्याच्या पाठीशी तिच्या आईचे संस्कार, तिची प्रार्थना आणि तिचे अथक कष्ट उभे असतात,” असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्ह्याच्या वतीने मुरबाड येथे आयोजित ‘आई महोत्सव-2026’ आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव […]

अधिक वाचा..

खुर्च्यांचा खेळ आणि सत्तेचा ताप

मुंबई: एका बाजूला महाराष्ट्रात पावसाचा कहर सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला सत्तेच्या दालनात मंत्रिपदांच्या खुर्च्यांचा हंगाम रंगात आला आहे. जनतेला पुराचे पाणी, शेतकऱ्यांना पिकांची चिंता आणि शहरांना विस्कळीत व्यवस्थेचा सामना करावा लागत असताना, राजकीय वर्तुळात मात्र एकच चर्चा—”यावेळी मंत्री कोण?” अधिकृत निवेदनांमध्ये शांतता दिसते; पण मंत्रालयाचे कॉरिडॉर, पक्ष कार्यालयांचे बंद दरवाजे आणि दिल्लीच्या राजकीय वर्तुळात […]

अधिक वाचा..

वोटचोरी करून भाजप सत्तेत; लोकशाहीशी खेळ करणाऱ्यांना जेलमध्ये जावे लागेल; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदार यादीत फेरफार करून महाराष्ट्रात सत्ता मिळवली असून बिहार आणि बंगालमध्येही मतदारांची नावे वगळून विजय मिळवला, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी केला. लोकशाहीची हत्या करणाऱ्या आणि मतदार यादीत घोळ करणाऱ्यांना आगामी काळात जेलमध्ये जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. राज्यात निवडणूक आयोगामार्फत राबविण्यात […]

अधिक वाचा..

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार

मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला जागतिक स्तरावर नेण्याचा निर्धार व्यक्त केला. ३६ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कलीना (सांताक्रूझ पूर्व) येथील सशस्त्र पोलीस मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला मंत्री Mangal Prabhat Lodha, गृहराज्यमंत्री […]

अधिक वाचा..

विधान परिषद की आदेशशाहीचा दरबार? धक्काबुक्कीने उघड केला सत्तेचा उन्माद!

सातारा: साताऱ्याच्या राजकारणात काल जे घडलं, ते केवळ धक्काबुक्की नव्हतं—ते लोकशाहीच्या गालावर बसलेला झणझणीत चापट होता. मात्र खरी धक्कादायक गोष्ट आज विधान परिषदेत घडली. कारण इथे फक्त एका मंत्र्याचा संताप व्यक्त झाला नाही, तर थेट संविधानाच्या चौकटीवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं. महाराष्ट्राचे मंत्री शंभूराज देसाई यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली, तसेच काही जिल्हा परिषद सदस्यांना मतदानापासून रोखण्यात […]

अधिक वाचा..

सत्तेसाठी विचाराशी तडजोड नाही, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भिवंडीत सेक्युलर फ्रंट..

मुंबई: भिवंडी महानगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवली व सर्वात जास्त ३० नगरसेवक विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या १२ नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला पण बहुमतासाठी आणखी ४ नगरसेवकांची आवश्यकता होती. भाजपा व शिंदेसेना यांच्यासोबत जायचे नाही ही काँग्रेसची भूमिका आहे त्या भूमिकेशी काँग्रेसने त़डजोड केली नाही. आता भाजपाचे काही नगरसेवक पक्षाचा आणि विचारांचा त्याग […]

अधिक वाचा..

मी आधी नास्तिक होते! रिंकू राजगुरूचा केदारनाथातील अनुभव; एका घटनेनंतर बसला ‘त्या शक्ती’वर विश्वास

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री रिंकू राजगुरू गेली दहा वर्षे सिनेइंडस्ट्रीत सक्रिय आहे. सैराट या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली रिंकू अभिनयासोबतच सोशल मीडियावरही स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. अलीकडेच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या आयुष्यातील आध्यात्मिक प्रवासाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले. “मी आधी नास्तिक होते. पण केदारनाथला गेल्यानंतर काही घटनांमुळे माझा थोडाथोडा विश्वास बसायला लागला. पूजा-पाठ, मंत्र, सण-उत्सव […]

अधिक वाचा..

भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने शिवसेना (उबाठा)ला पाठिंबा देऊन आघाडी धर्म पाळला

चंद्रपुरात शिवसेना (उबाठा)ने घेतलेली भूमिका चुकीचीच, पक्षपातळीवरून चुकीचे होणारे समर्थन काँग्रेस कदापी खपवून घेणार नाही मुंबई: चंद्रपुरात शिवसेना (उबाठा)ने भाजपाला पाठिंबा देऊन आघाडीचा धर्म पाळला नाही पण काँग्रेसने मात्र परभणी महापौरपदाच्या निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळला आहे. परभणीमध्ये शिवसेना (उबाठा)चा महापौर व काँग्रेसचा उपमहापौर झाला आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, इंडिया आघाडी, मविआ, लोकशाही तसेच संविधानासाठी […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद निवडणुकीत सत्तेचा विजय सत्याचा नाही, काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांचा टोला

नागपूर: चंद्रपूर महापालिकेत सत्तास्थापनेसाठी काँग्रेसने तयारी केली असून उद्या काँग्रेसचा महापौर होणार असं काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. चंद्रपुरात सत्तास्थापनेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि त्यांच्यासोबत असलेले १० नगरसेवक, तसेच इतर मित्रपक्षांच्या सकारात्मक भूमिकेमुळे चंद्रपुरात काँग्रेसची सत्ता येण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज […]

अधिक वाचा..