महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पाद्वारे राज्यामध्ये गुंतवणूक व रोजगारवाढीस चालना; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्पाच्या (मॅग्नेट) राज्यातील प्रगतीबाबत आशियाई विकास बॅंकेच्या (एडीबी) वरिष्ठ अधिकाऱ्यांना आश्वस्त करताना या प्रकल्पाच्या अंमलबजावणीद्वारे राज्यात गुंतवणूक आणि रोजगारवाढीस चालना मिळाली असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीत मॅग्नेट प्रकल्पाच्या कामकाजासंदर्भात आढावा घेण्यात आला. यावेळी सहकार व पणन विभागाचे प्रधान […]

अधिक वाचा..

‘पुणे-लोणावळा’ रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिका प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या आर्थिक सहभाग देण्यास मंत्रीमंडळाची मान्यता 

मुंबई: पुणे ते लोणावळा दरम्यान उपनगरीय रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गाच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या आर्थिक सहभागाला राज्यमंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा दीर्घकालीन प्रश्न मार्गी लागला आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत सादर करण्यात आलेल्या या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे ५ हजार १०० कोटी […]

अधिक वाचा..

शक्तिपीठ महामार्गाच्या प्रकल्पासाठी पैसे दिले जातात मग शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नाही का

मुंबई: राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहे. दररोज शेतकरी आत्महत्या होत आहे. राज्यात यावर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या.यातील २०० प्रकरणे अपात्र ठरली असून १९४ प्रकरणांची चौकशी प्रलंबित आहे. एकीकडे शेतकरी आत्महत्या होतात त्यांना मदती ही सरकार देत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव दिला होता. […]

अधिक वाचा..

येत्या नवरात्र उत्सवात तुळजापूर विकास प्रकल्पाचे भूमिपूजन

मुंबई: श्री क्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर परिसराच्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन सन्माननीय मुख्यमंत्री श्री . देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि श्री .अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये करण्याचा मानस असून हा प्रकल्प पुढील तीन – साडेतीन वर्षात पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. असे प्रतिपादन परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. […]

अधिक वाचा..

ह्युंदाई मोटरच्या प्रोजेक्ट H२OPE अंतर्गत गडचिरोलीतील शाळांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी 

मुंबई: गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम, आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील शाळांमध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ह्युंदाई मोटरच्या ‘प्रोजेक्ट H२OPE’ (होप) उपक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे. गडचिरोली या आकांक्षित जिल्ह्याच्या दुर्गम भागातील शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून उपक्रम राबविण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानस होता. त्यांच्या दूरदृष्टीतून आलेल्या […]

अधिक वाचा..

समृद्धी भ्रष्ट महामार्ग प्रकल्पाची श्वेतपत्रिका काढा, १५ हजार कोटींचा भ्रष्टाचार उघड होईल

मुंबई: देवेंद्र फडणवीस सरकार समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन करून स्वतःची वाहवा करून घेत आहे परंतु हा महामार्ग भ्रष्टाचाराचे कुरण ठरला आहे. ५५ हजार कोटी रुपयांचा हा महामार्ग शेवटी ७० हजार कोटी रुपयांवर गेला. १५ हजार कोटी रुपयांनी प्रकल्पाचा खर्च फुगवला यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे, त्यामुळे सरकारमध्ये नैतिकता शिल्लक असेल तर समृद्धी महामार्ग […]

अधिक वाचा..

छ. संभाजीनगरची ऐतिहासिक प्रगती, कन्नडच्या औट्रम घाटात चार बोगदे आणि रेल्वेमार्गाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मंजूर

औरंगाबाद: मराठवाड्याच्या दळणवळण आणि औद्योगिक विकासासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २४१ वरील कन्नड तालुक्यातील औट्रम घाटात चार बोगदे बांधण्याचा ऐतिहासिक निर्णय नुकत्याच दिल्लीमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. या बोगद्यांपैकी एकातून रेल्वे  तर दुसऱ्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २४१ वरील वाहतूक सुरू होणार आहे. उर्वरित दोन बोगदे सुरक्षेसाठी राखीव ठेवले […]

अधिक वाचा..

ठाणे महापालिकेचा घनकचरा प्रकल्प राज्यासाठी पथदर्शी ठरेल…

ठाणे: मौजे भाईंदरपाडा (गायमुख) येथील ठाणे महापालिकेच्या जागेवर विकसित होत असलेल्या एरोबिक्स स्वयंचलित बायो कंपोस्टींग मशीन द्वारे ओल्या कचऱ्यापासून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प राज्यात पथदर्शी ठरेल असे प्रतिपादन परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी केले. ते ठाणे महापालिका हद्दीतील विकास कामांच्या पाहाणी दौऱ्याच्या प्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांच्या बरोबर महापालिका आयुक्त सौरभ […]

अधिक वाचा..

इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प, प्रदूषण नियंत्रणाचा पहिला टप्पा तत्वता मंजूर 

पुणे (प्रतिनिधी): इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने तयार केलेल्या पाचशे कोटी रुपयांच्या सुधारणा आराखड्यास राज्य सरकारच्या प्रधान सचिव, पर्यावरण विभाग स्तरावरील प्रदत्त समितीने नुकतीच तत्त्वतः मंजुरी दिली आहे. अंतिम मान्यतेसाठी हा आराखडा केंद्र सरकारच्या NRCD कडे पाठविण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, या सुधारणा आराखड्यात नदीच्या काठावर १८ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प […]

अधिक वाचा..

मायक्रॉन सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करा; नाना पटोले

मुंबई: महाराष्ट्र राज्य गुतंवणुकीसाठी देशात आघाडीचे राज्य आहे. परदेशी गुतंवणीसाठीही महाराष्ट्र आजही पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. मागील वर्षात काही महत्वाचे प्रकल्प राज्याबाहेर गेले. मात्र आता एक संधी महाराष्ट्रासाठी चालून येत आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाने २२ हजार कोटी रुपयांच्या मायक्रॉन सेमीकंडक्टर चिप निर्मिती प्रकल्पाला मंजुरी दिली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात यावर शिक्कामोर्तब होईल. मायक्रॉन […]

अधिक वाचा..