राष्ट्रवादीच्या विकासात्मक भूमिकेवर जनतेचे शिक्कामोर्तब

मुंबई: जाहीर झालेल्या नगरपालिका,नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुक निकालांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशामुळे राष्ट्रवादीच्या विकासात्मक, सर्वधर्मसमभावाच्या भूमिकेवर जनतेचे शिक्कामोर्तब झाल्याचे या निकालांवरून स्पष्ट झाले आहे,असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. जनतेने केवळ आश्वासनांना नाही, तर प्रत्यक्ष केलेल्या कामाला, कार्यक्षम नेतृत्वाला पसंती दिली आहे.राज्याचा सर्वांगीण विकास, विशेषतः ग्रामीण आणि […]

अधिक वाचा..

मोदींची कबर खोदण्याची स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसची कबर जनता खोदेल

पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जोरदार प्रहार मुंबई: देशावर दहशतवादी हल्ले होत असताना, भारतीय लष्कर दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत असताना आणि संपूर्ण देश एकजुटीने उभा असताना काँग्रेसचे नेते मात्र पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कबर खोदण्याची भाषा करणाऱ्यांची कबर देशाची जनता खोदेल,” असा थेट, प्रहार […]

अधिक वाचा..

लोककल्याणकारी योजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद १८ विधेयके मांडली जाणार नागपूर: मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यास शासन तयार आहे. राज्यात सद्यस्थितीत राबविण्यात येत असलेल्या लोककल्याणकारी योजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अधिवेशन जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.   हिवाळी […]

अधिक वाचा..

मंत्री प्रताप सरनाईक यांची अधिकृत वेबसाइट www.pratapsarnaik.com सर्वांसाठी खुली

Subscribe व Grievances सुविधा उपलब्ध मुंबई: आपल्या विभागाचा जनसंपर्क मजबूत करण्याच्या उद्देशाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी www.pratapsarnaik.com ही अधिकृत वेबसाइट आता सर्वांसाठी खुली केली आहे. या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या लोकप्रतिनिधींसोबत थेट संपर्क साधण्याची सोय उपलब्ध झाली आहे. वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या “Subscribe” बटणावर क्लिक करून नागरिकांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिवहन मंत्री म्हणून […]

अधिक वाचा..

कबूतरखाना वादामागे भाजपा युती सरकारच, ज्वलंत प्रश्नांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न

अधिका-यांच्या पोस्टिंगवरून सरकारमध्ये गँगवार, एकाच पदावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी एकाच पदावर दोन अधिका-यांची नियुक्ती  मुंबई: मुंबईच्या दादर येथील कबुतरखान्यावरून वाद सुरु असून यात राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा हिरीरीने भाग घेताना दिसत आहेत. लोढा यांच्याकडे मुंबईत खूप मोठ्या प्रमाणात जमिनी व मोठ्या इमारतीही आहेत. तसेच सरकारने अदानीला मुंबईतील ३३ टक्के जमीन दिलेली आहे. लोढा व अदानी यांनी […]

अधिक वाचा..

प्रेमविवाह केल्याच्या रागातून भरचौकात जावयाला बेदम मारहाण, लेकीचं अपहरण

खेड: पुण्यातील खेडमध्ये ‘सैराट’ चित्रपटासारखी धक्कादायक घटना समोर आली आहे. आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणीच्या आई आणि भावाने तिच्या नवऱ्याला भरचौकात बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांनी तरुणीला मारहाण करत तिचे अपहरण केले. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात तरुणीचे अपरहण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातल्या खेडमध्ये […]

अधिक वाचा..

महसूल सप्ताहात जनतेसाठी उपयुक्त उपक्रमांची रेलचेल – शिरूर तहसील प्रशासनाचा पुढाकार

शिरूर (अरुणकुमार मोटे):शिरूर तालुका प्रशासनाच्या वतीने दिनांक १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२५ दरम्यान ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्यात येत असून, या कालावधीत विविध लोकहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा उद्देश महसूल विभागाशी संबंधित नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवणे, माहिती उपलब्ध करून देणे आणि प्रशासनाबद्दल जनजागृती करणे हा आहे.महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व जिल्हाधिकारी पुणे यांच्या […]

अधिक वाचा..

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर दंडाचा अन्यायकारक निर्णय त्वरित मागे घ्यावा

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडप उभारणीसाठी रस्त्यावर खड्डे घेतल्यास प्रति खड्डा ₹१५,०००/- दंड आकारण्याचा घेतलेला निर्णय हा केवळ अन्यायकारक नव्हे, तर मुंबईतील लाखो गणेशभक्तांच्या श्रद्धेवर आघात करणारा आहे. मागील वर्षी हीच रक्कम ₹२,०००/- इतकी होती, ती सातपट वाढवून अचानक ₹१५,०००/- करणे म्हणजे गणेशोत्सवावर अडथळे निर्माण करणे होय. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार […]

अधिक वाचा..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे निधन

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे आज हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने प्रशासन, राजकीय वर्तुळ तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रात शोककळा पसरली आहे. कायम सर्वांना मदत करणारे आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून अर्थसंकल्पीय अधिवेशनासारख्या महत्त्वाच्या काळात सर्वात वेगवान बातम्या देण्यात त्यांचा हातखंडा होता. ते अत्यंत दिलदार, मदतगार, सर्वांशी […]

अधिक वाचा..

जनसुरक्षा कायद्याला काँग्रेस पक्षाचा विरोध, देवेंद्र फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा

जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, ब्रिटीश सरकारने १९१९ मध्ये आणलेल्या रौलेट कायद्याचे नवे रुप मुंबई: राज्यातील भाजपा युती सरकार आणू पहात असलेला जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू आहे. ब्रिटीश सरकारने १९१९ मध्ये देशात रौलेट कायदा आणला होता. कोणालाही, कसलीही चौकशी न करता थेट तुरुंगात डांबण्यासाठी हा काळा कायदा आणला होता. आता देवेंद्र फडणवीस […]

अधिक वाचा..