स्वातंत्र्य अमृत महोत्सवनिमित्त ‘हर घर तिरंगा’ जनजागृती फेरी

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याने केंद्र सरकारने “हर घर तिरंगा” च्या माध्यमातून “भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” साजरा करण्याचे आवाहन देशातील नागरिकांना केले असल्याने महावितरणच्या महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी यांनी एकत्र येऊन कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मलठण (ता. शिरुर) येथे याबाबत जनजागृती केली आहे.

शिरुर उपकार्यकारी अभियंता माने, शाखा कार्यालय ऑफिसर होळकर, मलठण गावचे लाईनमन अमोल दुधे, फोरमन घोडे मामा, मा. चेअरमन आनंदराव गायकवाड, शिरुर तालुका रामोशी संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र बोडरे, संतोष साळुंके, मंजाभाऊ वाव्हळ, महादू वाव्हळ, संजय रेणुदास, म्हस्कु वाव्हळ, नाथा गायकवाड महावितरणचे इतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.