बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याबाबत सरकारला ८ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने रस्ता उभारण्यात आलेल्या ठिकाणी त्यांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा होऊनही तीन वर्षे उलटून गेल्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा मुद्दा विधानपरिषद सदस्य हेमंत पाटील यांनी लक्षवेधी द्वारे विधान परिषदेत उपस्थित केला होता.“हा पुतळा नेमक्या किती दिवसांत उभारला जाणार?” असा प्रश्न त्यांनी सरकारकडे केला.यावर उत्तर देताना राज्यमंत्री मेघना […]

अधिक वाचा..

सातारा बसस्थानकाबाबत महत्त्वाचा निर्णय; वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुढील बाजूने ‘आऊट गेट’चा प्रस्ताव

सातारा: सातारा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाबाहेर दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत. बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसेससाठी पुढील बाजूने (पारंगे चौक) स्वतंत्र ‘आऊट गेट’ काढण्याचा सुधारित आराखडा तातडीने तयार करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध प्रलंबित प्रश्नांवर महत्त्वाची बैठक […]

अधिक वाचा..

बिग बॉसच्या घरात जाणार का? ‘बिग बॉस मराठी संदर्भात अमृता खानविलकर हिचं स्पष्ट वक्तव्य

मुंबई: सध्या सर्वत्र ‘बिग बॉस मराठी च्या सहाव्या सिझनची जोरदार चर्चा रंगली आहे. पाचव्या आठवड्यापर्यंत स्पर्धकांनी घरात चांगलाच रंग भरला असून नुकतेच दोन स्पर्धक बाद झाल्याने खेळात अधिक चुरस निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक कलाकारांच्या संभाव्य एन्ट्रीबाबत चर्चा सुरू असताना अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar)हिने बिग बॉसच्या घरात जाण्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. एका […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर संभ्रम कायम; निर्णय एकत्र बसूनच; सुनील तटकरे

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली आहे. यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चा जोरात सुरू आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून विलिनीकरणासाठी पुढाकार घेण्यात आल्याचे चित्र आहे. मात्र अजित पवार गटातील नेत्यांमध्ये या विषयावर संभ्रम असल्याचे […]

अधिक वाचा..

कान्हूर मेसाई गावच्या पाणीप्रश्नावर महत्त्वपूर्ण बैठक; राधाकृष्ण विखे पाटील साधणार शेतकऱ्यांशी संवाद

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कान्हूर मेसाई गावातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नावर आज (दि. 4) रोजी दुपारी 2 च्या दरम्यान अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत गावातील शेतकरी बांधव आणि राज्याचे जलसंपदा मंत्री तथा ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची थेट चर्चा होणार असल्याने संपूर्ण परिसराचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे. […]

अधिक वाचा..

सुप्रीम कोर्टाने रोहित पवारांना दिला खडे बोल, एमसीए सदस्यसंख्या वाढवण्याबाबत तीव्र नाराजी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना सुप्रीम कोर्टाने तीव्र खडे बोल सुनावले आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) मधील सदस्यसंख्या वाढवण्याच्या बेकायदेशीर प्रयत्नांबाबत न्यायालयाने गंभीर नाराजी व्यक्त केली. केदार जाधव यांच्या याचिकेनुसार, रोहित पवारांनी MCAची सदस्यसंख्या 154 वरून 571 वर नेली, ज्यामध्ये त्यांच्या कुटुंबातील सदस्य, कर्मचारी आणि इतर राजकीय व शैक्षणिक व्यक्तींचा समावेश होता. या […]

अधिक वाचा..

सिंचन घोटाळ्याची फाईल आणि रहस्यमय मृत्यू! अजित पवारांच्या मृत्यूवर संसदेत संशयाचा बॉम्ब

नवी दिल्ली: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत संशय व्यक्त करत हा मुद्दा थेट संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केला. इतक्या तडफदार आणि दमदार नेत्याचा अकाली मृत्यू होणं ही अत्यंत धक्कादायक व दुर्दैवी बाब असल्याचं राऊत यांनी सांगितलं. राज्यसभेतील भाषणात संजय राऊत म्हणाले, “मला अजित पवारांची आठवण […]

अधिक वाचा..

‘मर्दानी ३’ थिएटरनंतर कुठे पाहता येणार? राणी मुखर्जीच्या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत मोठी अपडेट

मुंबई: बॉलीवूडची दमदार अभिनेत्री राणी मुखर्जी अलीकडच्या काळात मोजकेच चित्रपट करत असली, तरी तिच्या प्रत्येक चित्रपटाची खास चर्चा होते. सामाजिक विषयांवर भाष्य करणारे, वास्तववादी कथानक असलेले चित्रपट हीच राणीची ओळख बनली आहे. त्यामुळेच तिच्या चित्रपटांकडे प्रेक्षकांचे विशेष लक्ष असते. राणी मुखर्जीच्या हिट चित्रपटांमध्ये मर्दानी फ्रँचायझीचा उल्लेख आवर्जून केला जातो. मर्दानी आणि मर्दानी २ या दोन्ही […]

अधिक वाचा..

अजित पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाला जबर धक्का; घातपात की अपघात यावर तीव्र चर्चा

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभावी नेते अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात निधन झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना दाट धुक्यामुळे विमान धावपट्टीचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहितीत सांगण्यात आले असले, तरी या घटनेमागे घातपात आहे का, यावर राज्यभर तीव्र चर्चा […]

अधिक वाचा..

आभार मानायचे राहिले… पुण्यासाठी घेतलेला दादांचा तो निर्णय ठरला अखेरचा

पुणे: महापालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अक्षरशः रात्रंदिवस एक करून पुण्यात प्रचार केला. महिनाभर शहरात तळ ठोकून त्यांनी झंझावाती प्रचार केला असला, तरी पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपनंतर सर्वाधिक जागा मिळवणारा दुसरा मोठा पक्ष ठरला. या निकालानंतर महापालिकेतील विरोधी पक्षनेता पदासाठी सक्षम चेहरा निवडण्याचे अधिकार अजित पवार यांना देण्याचा […]

अधिक वाचा..