विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर शासन सकारात्मक मुंबई: राज्यातील ग्रामीण, आदिवासी, डोंगरी, दुष्काळग्रस्त आणि नक्षलग्रस्त भागांतील विनाअनुदानित महाविद्यालयांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर शासन सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी स्पष्ट केले. शासनाच्या अधिकारक्षेत्रातील सर्व विषयांवर आवश्यक ती कार्यवाही करून […]

अधिक वाचा..

‘पाईप चोरी’ प्रकरणात फिर्यादी व स्वच्छता निरीक्षकांची चौकशी करा; अनिल बांडे

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषदेतील कथित पाईप चोरी प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, या प्रकरणात केवळ चोरीचा तपास न करता फिर्यादी आणि नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक दत्तात्रेय बर्गे यांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल बांडे यांनी केली आहे. यासंदर्भात शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनानुसार, […]

अधिक वाचा..

संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि हद्दपारीच्या कारवाईवर न्यायालयाच्या निरीक्षणाची जोरदार चर्चा

मुंबई: अभिव्यक्ती स्वातंत्र्य, नागरिकांचे घटनात्मक अधिकार आणि हद्दपारीच्या कारवाईसंदर्भात उच्च न्यायालयाने केलेल्या निरीक्षणांची राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. सरकारविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी करण्यात आलेल्या हद्दपारीच्या कारवाईवर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत नागरिकांचे मूलभूत अधिकार अधोरेखित केले. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती माधव जामदार यांनी “नागरिक गुलाम नाहीत” असे स्पष्ट निरीक्षण नोंदविल्याची चर्चा असून, पोलीस हे कोणत्याही सरकारचे […]

अधिक वाचा..

MPSC प्रश्नांवर सरकारने स्पष्ट उत्तर द्यावे; सतेज पाटील यांचे विधान परिषद सभापतींना पत्र

मुंबई: “लोकशाहीत प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही, तर विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देणे ही सरकारची घटनात्मक जबाबदारी आहे,” असे सांगत विधान परिषदेतील काँग्रेसचे विधिमंडळ नेते सतेज (बंटी) पाटील यांनी राम शिंदे यांना पत्र लिहून महाराष्ट्र लोकसेवा आयोग संदर्भातील सभागृहात विचारलेल्या प्रश्नांना सरकारने सविस्तर, वस्तुनिष्ठ आणि समाधानकारक उत्तरे द्यावीत, अशी मागणी केली आहे. सतेज पाटील यांनी पत्रात […]

अधिक वाचा..

एलपीजी सबसिडीबाबत नवे नियम; १० लाखांवरील उत्पन्नधारकांना अनुदान बंद

नवी दिल्ली : केंद्र सरकारने एलपीजी गॅस सिलिंडर अनुदानाच्या नियमांमध्ये मोठे बदल करत सबसिडी वितरण अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमांनुसार, वार्षिक उत्पन्न १० लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या नागरिकांना यापुढे गॅस सिलिंडरवरील अनुदान मिळणार नाही.सरकारच्या मते, अनुदानाचा लाभ केवळ गरजू आणि पात्र नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. तसेच, […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात गायरान जमिनीवर वृक्षारोपण करण्याबाबत उदघाट्न कार्यक्रमा दरम्यान वाद 

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील तब्बल ५४ एकर गायरान जमिनीवर वृक्षारोपण करण्याच्या निर्णयावरुन गावात मोठा वाद निर्माण झाला आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्स यांच्या सी एस आर फंडातून तसेच साद फाउंडेशन यांच्या माध्यमातून या गायरान जमिनीवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या उपक्रमाला आता काही ग्रामस्थांनी जोरदार विरोध दर्शवला […]

अधिक वाचा..

बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याबाबत सरकारला ८ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने रस्ता उभारण्यात आलेल्या ठिकाणी त्यांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा होऊनही तीन वर्षे उलटून गेल्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा मुद्दा विधानपरिषद सदस्य हेमंत पाटील यांनी लक्षवेधी द्वारे विधान परिषदेत उपस्थित केला होता.“हा पुतळा नेमक्या किती दिवसांत उभारला जाणार?” असा प्रश्न त्यांनी सरकारकडे केला.यावर उत्तर देताना राज्यमंत्री मेघना […]

अधिक वाचा..

सातारा बसस्थानकाबाबत महत्त्वाचा निर्णय; वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुढील बाजूने ‘आऊट गेट’चा प्रस्ताव

सातारा: सातारा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाबाहेर दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत. बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसेससाठी पुढील बाजूने (पारंगे चौक) स्वतंत्र ‘आऊट गेट’ काढण्याचा सुधारित आराखडा तातडीने तयार करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध प्रलंबित प्रश्नांवर महत्त्वाची बैठक […]

अधिक वाचा..

बिग बॉसच्या घरात जाणार का? ‘बिग बॉस मराठी संदर्भात अमृता खानविलकर हिचं स्पष्ट वक्तव्य

मुंबई: सध्या सर्वत्र ‘बिग बॉस मराठी च्या सहाव्या सिझनची जोरदार चर्चा रंगली आहे. पाचव्या आठवड्यापर्यंत स्पर्धकांनी घरात चांगलाच रंग भरला असून नुकतेच दोन स्पर्धक बाद झाल्याने खेळात अधिक चुरस निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक कलाकारांच्या संभाव्य एन्ट्रीबाबत चर्चा सुरू असताना अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar)हिने बिग बॉसच्या घरात जाण्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. एका […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर संभ्रम कायम; निर्णय एकत्र बसूनच; सुनील तटकरे

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली आहे. यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चा जोरात सुरू आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून विलिनीकरणासाठी पुढाकार घेण्यात आल्याचे चित्र आहे. मात्र अजित पवार गटातील नेत्यांमध्ये या विषयावर संभ्रम असल्याचे […]

अधिक वाचा..