घोड धरणात 82 टक्के पाणीसाठा, उजव्या आणि डाव्या कालव्यातुन शेतीसाठी पाणी सोडल्याने शेतकऱ्यांना दिलासा 

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतीला वरदान ठरलेल्या चिंचणी (ता. शिरुर) येथील घोड धरणामध्ये 82 टक्के पाणीसाठा झाला असुन धरणाच्या उजव्या कालव्यातुन 150 क्युसेस आणि डाव्या कालव्यातून 300 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरु असल्याची माहिती शाखा अभियंता वैभव काळे यांनी दिली. चिंचणी(ता.शिरुर) येथील घोड धरणाची एकुण पाणी साठवण क्षमता ७६३८ दशलक्ष घनफुट असुन उपयुक्त […]

अधिक वाचा..

पत्रा चाळ रहिवाशांना दिलासा; भाड्यात १०% वाढीचा निर्णय

मुंबई: गोरेगावमधील पत्रा चाळ रहिवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत रहिवाशांना मिळणाऱ्या भाड्यात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार विद्या ठाकूर, खासदार रवींद्र वायकर, तसेच म्हाडाचे अधिकारी उपस्थित होते. पत्रा चाळ प्रकरणात काही रहिवाशांनी […]

अधिक वाचा..

अंशकालीन स्त्री परिचरांना दिलासा; मानधनात दुप्पट वाढ, एप्रिलपासून ६ हजार रुपये

मुंबई: सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य उपकेंद्रांमध्ये कार्यरत अंशकालीन स्त्री परिचरांच्या मासिक मानधनात दुप्पट वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. १ एप्रिल २०२६ पासून ही वाढ लागू होणार असून, यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. गाव पातळीवर, विशेषतः आदिवासी, दुर्गम व डोंगराळ भागात प्राथमिक आरोग्य सेवा तळागाळापर्यंत पोहोचवण्यात अंशकालीन स्त्री परिचरांची भूमिका महत्त्वाची आहे. […]

अधिक वाचा..

युद्धाच्या छायेत भारताला दिलासा; होर्मुझ पार करून एलपीजीचे दोन टँकर जहाजे देशात

गुजरात: पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या ऊर्जा सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या चिंतेमध्ये काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ची दोन मोठी एलपीजी वाहक टँकर जहाजे – ‘शिवालिक’ आणि ‘नंदादेवी’ – इराणजवळील धोकादायक ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ सुरक्षितपणे पार करून भारताच्या किनाऱ्यावर पोहोचली आहेत. ‘शिवालिक’ हे जहाज सोमवारी (१६ मार्च २०२६) गुजरातमधील मुंद्रा बंदरात दाखल होण्याची शक्यता […]

अधिक वाचा..

शीतगृह कंटेनर विद्युत जोडणी शुल्कात ८०% सवलत; अडकलेल्या फळ-भाजी निर्यातदारांना दिलासा

मुंबई: मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर बंदरांमध्ये अडकलेल्या फळे व भाजीपाला निर्यात कंटेनरांबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून शीतगृह कंटेनरच्या विद्युत जोडणी शुल्कात ८० टक्के सवलत देण्यात आली आहे. तसेच साठवण/थांबा कालावधी शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले असून जहाज उपलब्ध होईपर्यंत साठवणूक सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे […]

अधिक वाचा..

दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना दिलासा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तातडीची कारवाई

मुंबई: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दुबईसह यूएईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने विशेष विमानांची व्यवस्था केली आहे. इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षामुळे हवाई क्षेत्र बंद झाल्याने अनेक प्रवासी अडचणीत सापडले होते. या पार्श्वभूमीवर स्टार एअर ची दोन विशेष विमाने आज फुजैरा विमानतळावरून उड्डाण घेणार आहेत. उड्डाणाची वेळ: VT-GSO – दुपारी ३.३० वाजता टेकऑफ […]

अधिक वाचा..

घसादुखी पासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय 

घसा दुखणे ही एक अतिशय सामान्य समस्या आहे. हे अनेक कारणांमुळे होऊ शकते, जसे की सामान्य सर्दी, व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियाचा संसर्ग, ऍलर्जी, धूम्रपान, जास्त मद्यपान किंवा घशाची जळजळ. खोकला, ताप, डोकेदुखी आणि कान दुखणे. यासारख्या इतर समस्या सोबत घशात दुखणे देखील असू शकते. घसादुखीपासून आराम मिळवण्यासाठी काही सोप्या टिप्स बघूया. 1) कोमट पाण्याने गुळणी: कोमट […]

अधिक वाचा..

पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये ५४ किलोमीटर लांबीचे भुयारी रस्ते; वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा अपेक्षित

पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांचे मर्यादित रुंदीकरण आणि शहराचा झपाट्याने वाढता विस्तार लक्षात घेता, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) ५४ किलोमीटर लांबीच्या भुयारी रस्त्यांचे जाळे उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव तयार केला आहे. अंदाजे ३२ हजार कोटी रुपये खर्च असलेल्या या प्रकल्पामुळे शहरातील मुख्य वाहतूक मार्गांवर मोठा दिलासा मिळेल, असा अंदाज आहे. […]

अधिक वाचा..

२५ कोटींचा अतिवृष्टी अनुदान महाघोटाळा! सरकारी बाबूच बनले ‘शेतकरी’, ३१ जणांना अटक

जालना: नैसर्गिक आपत्तीत उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी असलेली सरकारी तिजोरीच लुटल्याचा धक्कादायक प्रकार जालना जिल्ह्यात उघडकीस आला आहे. अतिवृष्टी अनुदानाच्या नावाखाली तब्बल २४ कोटी ९० लाख ७७ हजार ८११ रुपयांचा अपहार करण्यात आल्याप्रकरणी ३१ आरोपींना जालना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या घोटाळ्यात चक्क तलाठी, तहसील कर्मचारी आणि संगणक तज्ज्ञांचा सहभाग असल्याने महसूल विभागात […]

अधिक वाचा..

बजेटनंतर बाजारात अस्थिरता, मात्र पेट्रोल-डिझेल दर स्थिर; सर्वसामान्यांना दिलासा

नवी दिल्ली: रविवार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. बजेट जाहीर होताच शेअर बाजारात मोठी अस्थिरता पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये जोरदार चढ-उतार झाले, तर सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोने-चांदीच्या दरातही मोठी घसरण नोंदवली गेली. या पार्श्वभूमीवर आठवड्याच्या सुरुवातीला, सोमवार (दि. २ फेब्रुवारी) रोजी पेट्रोल-डिझेलच्या किंमती जाहीर […]

अधिक वाचा..