सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा

महाराष्ट्र

१० लाख रुपयांऐवजी १५ ते २५ लाख रुपये मिळणार…

औरंगाबाद: शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असलेला विमा योजनेत मोठा बदल केला असून सरकारी कर्मचाऱ्यांना आता विमा रक्कम सरसकट १० लाख रुपयांऐवजी १५ ते २५ लाख रुपये मिळणार आहेत. गट अ अधिकाऱ्यांना २५ लाख, तर गट ब अधिकाऱ्यांना २० लाख रुपये मिळणार आहेत. गट क व ड कर्मचाऱ्यांना १५ लाख रुपये मिळणार आहेत.

अपघातात अंपगत्व आल्यास किंवा मृत्यू झाल्यास ही मदत मिळणार आहे. विम्यापोटी आकारण्यात येणाऱ्या वार्षिक वर्गणीतही वाढ होणार आहे. सरसकट ३०० रुपयांऐवजी आता कर्मचारी वर्ग निहाय वर्गणी आकारणी केली जाणार आहे. गट ‘अ’ साठी ८८५, गट ‘ब’ साठी ७०८ रुपये वर्गणी आणि गट ‘क’ व ‘ड’ साठी ५३१ रुपये वर्गणी आकारली जाणार आहे.