माजी मंत्री नवाब मलिक यांना न्यायव्यवस्थेने दिलासा दिला त्याचा आनंद आम्हाला आहे…

महाराष्ट्र

मुंबई: दिर्घ प्रतिक्षेनंतर माजी मंत्री नवाब मलिक यांना आज न्यायव्यवस्थेने दिलासा दिला त्याचा आनंद आम्हाला आहे, अशा शब्दात प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना समाधान व्यक्त केले.

न्यायव्यवस्थेचा आम्ही नेहमीच आदर करत आलो आहोत. त्यामुळे दिलेल्या निर्णयावर आम्ही समाधानी आहोत असेही सुनिल तटकरे म्हणाले. गेली ३० वर्षे मुंबई शहरात आपल्या कार्यप्रणालीने एक वेगळा ठसा नवाब मलिक यांनी निर्माण केला आहे, होता आणि तो कायम राहिल, असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी बोलताना व्यक्त केला.