‘मोदींनी चहा कुठे विकला?’; संजय राऊतांचा फडणवीसांसह भाजपवर जोरदार हल्लाबोल

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चहावाला’ या राजकीय प्रतिमेवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. मोदी ज्या काळात गुजरातमधील रेल्वे स्थानकावर चहा विकत असल्याचा दावा केला जातो, त्या काळात संबंधित रेल्वे स्थानकच अस्तित्वात नव्हते, असा दावा राऊत यांनी केला. “मोदींनी लहानपणी चहा विकल्याचा […]

अधिक वाचा..

‘छात्रों की गुंज’ला भाजपाचा विरोध; कन्हैयाकुमारांचा घणाघात

“राहुल गांधी अमित शाहांसमोर झुकले नाहीत, फडणवीसांसमोर कशाला झुकतील?” पुणे : मुलींच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केलेल्या पुण्यात उद्या, २२ ऑगस्ट रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थीनींशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते कन्हैयाकुमार यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. “भाजपाला राहुल गांधींच्या ‘छात्रों […]

अधिक वाचा..

‘धनुष्यबाण’ गोठवण्याच्या मागणीवरून शिवसेनेचा उबाठावर बोचरा प्रहार

मुंबई : शिवसेनेचे पक्षचिन्ह ‘धनुष्यबाण’ गोठवण्याची मागणी उबाठा गटाने न्यायालयात केल्यानंतर शिवसेनेने सोशल मीडियावर बोचरे व्यंगचित्र प्रसिद्ध करत उबाठा गटावर जोरदार निशाणा साधला आहे. या व्यंगचित्रात उद्धव ठाकरे न्यायालयासमोर उभे राहून, ‘यांच्याकडे बाळासाहेबांचे विचारही आहेत, तेही गोठवा,’ असे म्हणताना दाखवण्यात आले आहेत. तर दुसऱ्या बाजूला भगवा ध्वज, धनुष्यबाण आणि वाघासह शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री […]

अधिक वाचा..

‘छात्रों की गुंज’साठी पुण्यात काँग्रेसची जोरदार तयारी; भाजपवर हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

पुणे: विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ या देशव्यापी अभियानाचा चौथा कार्यक्रम येत्या शनिवार, दि. २२ ऑगस्ट रोजी पुण्यातील SSPM मैदानावर होणार आहे. विशेषतः मुलींसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी केल्यानंतर आयोजित पत्रकार […]

अधिक वाचा..

वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल; जातनिहाय जनगणना, ओबीसी आरक्षण आणि कुंभमेळ्याच्या खर्चावरून निशाणा

मुंबई: काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जातनिहाय जनगणना, ओबीसी आरक्षण, मनोहर भिडे यांच्या वक्तव्यांसह कुंभमेळ्याच्या खर्चावरून केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. जातनिहाय जनगणना हा ओबीसी समाजाच्या हक्कांचा आणि सामाजिक न्यायाचा महत्त्वाचा प्रश्न आहे. मात्र केंद्र सरकारच्या जनगणना प्रश्नावलीत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम नसेल, तर ही जनगणना अपुरी ठरेल, असे वडेट्टीवार यांनी म्हटले. केवळ […]

अधिक वाचा..

खरगेंच्या सभास्थळाचे हवन करून शुद्धीकरण; काँग्रेसचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल

मुंबई: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे घेतलेल्या सभेनंतर त्या ठिकाणी हवन करून शुद्धीकरण करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने आज राज्यभर आंदोलन केले. पुण्यात बालगंधर्व चौकात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ […]

अधिक वाचा..

RSS-BJPची तिरंगा रॅली म्हणजे केवळ फोटोसेशन; इतिहास खोटे बोलत नाही; महेश तपासेंचा घणाघात

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे प्रवक्ते महेश तपासे यांनी RSS-BJPच्या तिरंगा रॅलीवर जोरदार टीका केली आहे. तिरंगा रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रवादाचे प्रदर्शन केले जात असून, RSSच्या इतिहासातील काही घटनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप तपासे यांनी केला. तपासे म्हणाले की, “भाजप आणि त्यांची मातृसंस्था RSS तिरंगा यात्रेच्या नावाखाली फोटोसेशन करतात आणि देशाला देशभक्तीचे […]

अधिक वाचा..

‘१९ गुन्हे दाखल असलेला माणूस मंत्री कसा?’; सुषमा अंधारेंचा जयकुमार गोरेंवर घणाघात

सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार हल्लाबोल केला आहे. गोरे यांच्यावर सुमारे १९ गुन्हे दाखल असल्याचा दावा करत, “एखाद्यावर चार-पाच गुन्हे दाखल झाले तर मोक्काची कारवाई होते. मग दाखल गुन्हे पाहता मोक्काची कारवाई होऊ नये म्हणून गोरे भाजपमध्ये दाखल झाले का?” असा […]

अधिक वाचा..

धर्माच्या राजकारणात ओबीसींना अडकवून हक्कांचे प्रश्न दडपण्याचा डाव; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात

चंद्रपूर: धर्म आणि भावनेच्या राजकारणात बहुजन-ओबीसी समाजाला अडकवून त्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. तरुणांच्या हाताला रोजगार नाही, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या पुरेशा संधी नाहीत, शेतकरी आर्थिक संकटात आहे आणि ओबीसींच्या आरक्षणासह संविधानिक हक्कांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. त्यामुळे भावनिक राजकारणाला बळी न पडता बहुजन-ओबीसी […]

अधिक वाचा..

भंडाऱ्यातून मंडल यात्रेला प्रारंभ; ओबीसी जनगणना, निधी आणि आरक्षणावरून वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

भंडारा: सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने आयोजित मंडल यात्रा २०२६ ला आज भंडारा येथून उत्साहात प्रारंभ झाला. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी यात्रेला हिरवा झेंडा दाखवत ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी सरकारवर जोरदार टीका केली. वडेट्टीवार म्हणाले की, मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आणि ओबीसी समाजाला त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी ही यात्रा गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने काढली […]

अधिक वाचा..