रांजणगाव MIDC टप्पा क्रं 3 साठी करडे येथुन लाखों ब्रास मुरुमाची चोरी…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गेल्या दोन ते तीन वर्षांपासुन महसूल विभागाचे वेगवेगळे कारनामे समोर येत असुन शिरुर महसूल विभाग म्हणजे भ्रष्टाचाराचं “कुरणच” झालं आहे. गावातील कोतवाल ते तहसीलदारांपर्यंत सगळेच यात सामील असल्याने तक्रार तरी कोणाकडे करायची असा प्रश्न सर्वसामान्य व्यक्तींना पडत असुन “कुंपणचं शेत खातंय” या म्हणीचा प्रत्यय शिरुर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला येत आहे. […]

अधिक वाचा..

कोरेगाव भिमातील कंपनीची अठरा टक्क्यांची सावकारी

जगदंबा ॲटो कंपनीकडून कामगाराच्या उचलवर अठरा टक्के व्याज शिक्रापूर (शेरखान शेख): कोणत्याही कंपनीमध्ये कायम असलेल्या कामगारांना अडचणीच्या काळामध्ये कंपनीकडून उचल स्वरुपात काही पैसे दिले जात असताना कोरेगाव भीमा येथील जगदंबा ॲटो कॉम्पो लिमिटेड कंपनी कडून मात्र कामगाराला दिलेल्या उचलवर चक्क 18 टक्के व्याज लावल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून कंपनीच्या कृतीमुळे कामगारावर उपासमारीची वेळ आली […]

अधिक वाचा..

पोलीस पाटील भरती सुरु, अर्ज करा…

औरंगाबाद: छ. संभाजीनगर जिल्ह्यातील पोलीस पाटलांचे रिक्त पदे भरले जाणार असून, याबाबत जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय आदेश काढले आहेत. छ. संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण 384 पोलीस पाटलांचे रिक्त पदे भरण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी एक पत्र काढले आहेत. यासाठी 21 फेब्रुवारीपासून अर्ज मागवने सुरू झाले असून 29 मार्चला यासाठी लेखी परीक्षा होणार आहे. तसेच 15 एप्रिलला अंतिम उमेदवाराची […]

अधिक वाचा..

उद्योगपती स्व रसिकलाल धारिवाल यांच्या जयंती निमित्त 423 रक्त संकलित 

शिरुर (मुकुंद ढोबळे): उद्योगपती स्व.रसिकलाल माणिकचंद धारिवाल यांच्या जयंती निमित्त येथील शिरुर नगरपरिषदेच्या मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 423 रक्तदात्यांनी रक्तदान केले. स्व.रसिकभाऊ माणिकचंद धारिवाल यांच्या जयंतनिमित्त उद्योगपती प्रकाश रसिकलाल धारिवाल मित्र मंडळ व मोरया जीम हेल्थ क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. उद्योगपती व शिरुर नगरपरिषदेचे सभागृहनेते प्रकाश धारिवाल […]

अधिक वाचा..

मुंबईत “जनता दल (सेक्युलर) च्या वतीने वीज बिलाची होळी

मुंबई: जनता दल सेक्युलर महाराष्ट्र राज्य पक्षाच्या वतीने मुंबई प्रदेश कार्यालय या ठिकाणी महाराष्ट्र शासन व वीज महामंडळ यांच्या 37% प्रस्तावीत वीज दरवाढीच्या निर्णयाविरोधात वीज बिलाची होळी करण्यात आली. सरकार वीज बिल वाढीचा निर्णय घेणार आहे. या निर्णयामुळे समाजातील गरीब जनतेच्या खिशाला झळ पोचून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे व या 37% वीज दरवाढीचा […]

अधिक वाचा..

आपली मातृभाषा जतन करणं गरजेचं विभावरी देव याचं प्रतिपादन

शिरुर (तेजस फडके) आपण महाराष्ट्रात राहतो त्यामुळे आपली मातृभाषा ही मराठीच असुन आपल्या मातृभाषेत आपण आपल्या भावना सहजरीत्या व्यक्त करु शकतो. आज जागतिक पातळीवर जरी इंग्रजी भाषा सर्वाधिक प्रमाणात बोलली जात असेल तरीही लहानपणी मुलांना किमान पाहिली ते चौथी पर्यंत मातृभाषेतुनच शिक्षण देण्याची गरज असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्या विभावरी देव यांनी व्यक्त केले. मराठी राजभाषा […]

अधिक वाचा..

आंदोलक शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनेच्या नेत्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलीसांवर कारवाई करा…

मुंबई: सोयाबीन व कापसाला दरवाढ मिळावी, यासह शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला होता. शांततेने, अहिंसक मार्गाने सुरु असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला. आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर आणि आदेश देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करत विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते अजित […]

अधिक वाचा..

अंगणवाडी सेविका-मदतनीसांच्या आंदोलनाची दखल घेऊन त्यांचे प्रश्न तातडीने सोडवा…

मुंबई: राज्यात दोन लाखांहून अधिक अंगणवाडी सेविका-मदतनीस कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या न्याय मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाला बसल्या आहेत. या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या प्रश्नांना तातडीने न्याय देण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी यापूर्वी हिवाळी […]

अधिक वाचा..

कांदा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अंबादास दानवेंनी मांडली सभागृहात आक्रमक भूमिका

मुंबई: राज्यातील कांदा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळाला पाहिजे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडविले गेले पाहिजे, यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेत २८९ अनव्ये सर्व कामकाज बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी लावून धरली. बार्शीतील कांदा उत्पादक शेतकऱ्याला दोन रुपये चेक दिल्याची बाब दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून […]

अधिक वाचा..

गळ्यात कांद्याच्या आणि कापसाच्या माळा घालत महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक…

कांदा आणि कापूस उत्पादकांसाठी महाविकास आघाडीचा शिंदे -फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल… मुंबई: सरकार प्रचारात व्यस्त, कांदा उत्पादक शेतकरी मात्र उध्वस्त… शेतकरीद्रोही सरकारचा निषेध असो… कांद्याला भाव मिळालाच पाहिजे… कापसाला भाव मिळालाच पाहिजे… हरभऱ्याला भाव मिळालाच पाहिजे… दोन रुपयाचा चेक देणार्‍या सरकारचा निषेध असो… शेतकऱ्यांची चेष्टा करणार्‍या सरकारचा निषेध असो… गद्दार सरकार जोमात, शेतकरी मात्र कोमात… […]

अधिक वाचा..