फुले द्विशताब्दी वर्षासाठी राज्यभर वर्षभर उपक्रम; शालेय शिक्षण विभागाचा व्यापक आराखडा जाहीर

मुंबई: महात्मा जोतीराव फुले यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त सन 2027 हे द्विशताब्दी वर्ष राज्यभर विविध उपक्रमांनी साजरे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने 11 एप्रिल 2026 ते 10 एप्रिल 2027 या कालावधीत सर्व शाळांमध्ये शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यासाठी व्यापक कृती आराखडा जाहीर केला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे […]

अधिक वाचा..

अवकाळी पावसाचा तडाखा; राज्यात हवामान बदलाची चाहूल, उन्हाळ्याबाबत नवा अंदाज

मुंबई: महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून वादळी पाऊस, गारपीट आणि विजांच्या कडकडाटामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभाग (IMD) ने एप्रिल, मे आणि जून या कालावधीसाठी हवामानाचा ताजा अंदाज जाहीर केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, एप्रिल महिन्यात राज्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. मात्र एप्रिलमध्ये पावसाचे प्रमाण तुलनेने कमी असते, […]

अधिक वाचा..

कृषी-विपणनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक सहकार्य गरजेचे; मंत्री जयकुमार रावल

मनीला येथे आशियाई विकास बँकेच्या परिसंवादात ‘विकसित महाराष्ट्र 2047’ ची प्रभावी मांडणी मुंबई: कृषी व विपणन व्यवस्थेचा वेगवान विकास साधण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले. फिलिपाईन्समधील मनीला येथे आशियाई विकास बँकेच्या मुख्यालयात आयोजित आंतरराष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या कृषी […]

अधिक वाचा..

राज्यात उष्णतेची तीव्रता वाढली; अनेक जिल्ह्यांत शाळांच्या वेळेत बदल

मुंबई: राज्यातील हवामानात मागील काही दिवसांपासून झपाट्याने बदल होत असून उष्णतेची तीव्रता वाढताना दिसत आहे. मागील आठवड्यात सोमवारी आणि मंगळवारी उत्तर कोकणासह विदर्भातील काही भागांत उष्णतेच्या लाटेची नोंद झाली होती. त्यानंतर बुधवारी काही ठिकाणी कमाल तापमानात थोडी घट झाली असली तरी आठवड्याच्या शेवटी पुन्हा उष्णतेचा प्रभाव वाढला आहे. हवामान विभागाने राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला […]

अधिक वाचा..

राज्यात पाच वर्षांत ६७५ बिबट्यांचा मृत्यू; पुणे विभागात सर्वाधिक

पुणे: राज्यात गेल्या पाच वर्षांत नैसर्गिक कारणे, रस्ते अपघात, विहिरीत पडणे, विजेचा धक्का तसेच शिकारीमुळे तब्बल ६७५ बिबट्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मृत्यूंपैकी सर्वाधिक १८१ बिबट्यांचे मृत्यू पुणे वन विभागात झाले असून नाशिक विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. वन विभागाकडून विविध उपाययोजना राबवूनही बिबट्यांचे मृत्यू तसेच बिबट्यांमुळे होणारी मनुष्यहानी कमी करण्यात अपेक्षित […]

अधिक वाचा..

एलपीजी दरवाढ व गॅस तुटवड्याविरोधात काँग्रेसचे गुरुवारी राज्यभर आंदोलन

मुंबई: केंद्र सरकारने एलपीजी गॅसच्या दरात अचानक वाढ करून महागाईने होरपळून निघालेल्या सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळल्याची टीका करत या दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाने गुरुवारी (१२ मार्च) राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ६० रुपयांनी तर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात ११५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दरवाढीबरोबरच गॅस बुकिंगचा कालावधीही वाढवण्यात आला […]

अधिक वाचा..

राज्यात गॅस टंचाईमुळे चूल विझण्याची वेळ सरकारने जनतेची दिशाभूल थांबवून वस्तुस्थिती स्पष्ट करावी; विजय वडेट्टीवार 

मुंबई: राज्यात सध्या घरगुती गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, सर्वसामान्य गृहिणींमध्ये भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण आहे. एकीकडे सरकार विकासाच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे जनतेला आपली चूल कशी पेटवायची, याची चिंता सतावत आहे. सरकारने या गंभीर परिस्थितीवर तात्काळ आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आज काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी विधानसभेत करण्यात आली. राज्यातील सद्यस्थिती […]

अधिक वाचा..

राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा अर्थसंकल्प; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया

मुंबई: महाराष्ट्राचा 2026-27 चा अर्थसंकल्प हा सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा असल्याची प्रतिक्रिया राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, शेती, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कल्याण यांना प्राधान्य देत “विकसित महाराष्ट्र 2047” या ध्येयाच्या दिशेने ठोस पावले उचलण्यात […]

अधिक वाचा..

केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने स्वतःच्या तिजोरीतून निधी द्यावा: विजय वडेट्टीवार

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे (रोहयो) वाटोळे झाले आहे. थकीत निधीमुळे महाराष्ट्रातील तब्बल ३ लाख १२ हजार कामे बंद पडली असून मजुरांच्या हाताला काम उरलेले नाही,असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केला. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांसह संपूर्ण राज्यात मजुरांची संख्या […]

अधिक वाचा..

अजित पवारांच्या विमान दुर्घटनेवर रोहित पवारांचे सवाल; राज्यात युवा नेतृत्व म्हणून ठसठशीत छाप

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक तांत्रिक मुद्दे उपस्थित केले असून सखोल आणि पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे. अपघातातील तांत्रिक बाबींवर शंका रोहित पवार यांनी ब्लॅक बॉक्सची स्थिती, विमानात अतिरिक्त इंधन होते का, अपघाताच्या शेवटच्या क्षणी ट्रान्सपॉन्डर […]

अधिक वाचा..