लोककल्याणकारी राज्यासाठी शिवरायांचा विचारच मार्गदर्शक

किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आधारित लोककल्याणकारी विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवनेरी येथे केले. किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे स्मरण करून राज्याच्या विकासासाठी त्यांच्या आदर्शांचा […]

अधिक वाचा..

राज्यातील अतिवृष्टीत बाधित रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य द्या; शिवेंद्रसिंहराजे भोंसले           

मुंबई: राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात रस्ते व पुलांचे नुकसान झाले आहे. विशेषतः पर्यटन व धार्मिक स्थळांना जोडणारे रस्ते तसेच मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या मार्गांच्या दुरुस्तीला तातडीने प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. मंत्रालयात पार पडलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन कामकाज आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीस […]

अधिक वाचा..

राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहायक प्राध्यापक पदभरतीला मान्यता

मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न असलेल्या मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक संवर्गातील ५ हजार १२ रिक्त पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) ची प्रभावी अंमलबजावणी, तसेच विद्यार्थ्यांच्या वाढत्या […]

अधिक वाचा..

चंद्रपूर महापौर निवडणुकीत भाजपाचा घोडेबाजार; शिवसेना भूमिकेचे पडसाद राज्यात उमटणार

मुंबई: चंद्रपूर महापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घोडेबाजार करून अवघ्या एका मताने विजय मिळवला असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीतील घटक पक्ष असूनही काँग्रेसला पाठिंबा देण्यात आला नाही, उलट भाजपाला अप्रत्यक्ष मदत झाली, असा आरोप त्यांनी केला. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसकडे ३१ नगरसेवक असताना शिवसेना […]

अधिक वाचा..

राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची मतमोजणी सुरू; पहिल्या कलात महायुतीची आघाडी

मुंबई: राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकांची मतमोजणी आज सकाळपासून सुरू झाली आहे. शनिवारी झालेल्या मतदानात जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समितींच्या 1,462 जागांसाठी मतदान पार पडलं होतं. या निवडणुकीत एकूण 7,438 उमेदवार रिंगणात होते. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांचा […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद निकाल LIVE: राष्ट्रवादीचा पहिला विजय,  भाजप-शिंदे गटाची राज्यात आघाडी

मुंबई: जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून टपाल मतमोजणी पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता ईव्हीएममधील आकडे समोर येत आहेत. या निकालांमध्ये माढा तालुक्यातून पहिला अधिकृत निकाल समोर आला आहे. माढा तालुक्यातील भोसरे जिल्हा परिषद गटातून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अश्विनी दळवी यांनी विजय मिळवला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतरची ही […]

अधिक वाचा..

लाडक्या भावासाठी बहिणींची महाआरती; राज्यभर मंदिरांत प्रार्थना

मुंबई: शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीतर्फे उद्या, ९ फेब्रुवारी रोजी राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी महाआरती व प्रार्थना करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला असून, राज्य अजूनही या दुःखातून सावरलेले नाही. या पार्श्वभूमीवर ९ फेब्रुवारी रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त कोणतेही सोहळे, कार्यक्रम अथवा उत्सव […]

अधिक वाचा..

राज्याला पहिली महिला उपमुख्यमंत्री! पवार दांपत्याचा इतिहास; भावानंतर बहिणीला मिळाले राज्यातील दुसरे सर्वोच्च पद

मुंबई: राज्याच्या राजकारणात एक नवा अध्याय लिहिला गेला असून सुनेत्रा अजित पवार यांनी आज (ता. ३१ जानेवारी) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. विशेष म्हणजे, पती अजित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या सुनेत्रा पवार या राज्यातील सर्वोच्च दुसरे पद मिळविणाऱ्या पहिल्या बहीण आणि पत्नी ठरल्या आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी जात […]

अधिक वाचा..

सरपंचाची खुर्ची रिकामी होणार! राज्यातील 14,237 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीचे आदेश

मुंबई: राज्यातील ग्रामीण राजकारणात मोठा बदल घडणार असून येत्या काळात राज्यातील तब्बल 14 हजार 237 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले जाणार आहेत. ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपत असताना निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या खुर्च्या काही काळासाठी रिकाम्या राहणार आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आधीच रखडल्या आहेत. त्याच […]

अधिक वाचा..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित आशाताई अनंतराव पवार यांचे आज बुधवार, दि. २८ जानेवारी २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने २८ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या […]

अधिक वाचा..